शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जालनात पोहचताच आंदोलकांनी अडवला ताफा; राज ठाकरे थेट कारमधून उतरले अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2023 12:00 IST

आंदोलनकर्त्यांनी राज यांचा ताफा सोडल्यानंतर ते अंतरवाली सराटी या गावात पोहचले. त्याठिकाणी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली

जालना – जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या गावात सुरु असलेल्या मराठा आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला, त्यात अनेक आंदोलक जखमी झाले. यावेळी पोलिसांनी गोळीबारही केल्याचा आंदोलकांचा आरोप आहे. जालनातील या घटनेमुळे राजकीय वातावरण तापले आहे. विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांनी जालना येथे जात आंदोलकांची भेट घेतली. त्यात शरद पवार, उद्धव ठाकरे, उदयनराजे यांच्यासारख्या नेत्यांचा समावेश आहे. त्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही जालनात जाऊन आंदोलकांची भेट घेतली.

छत्रपती संभाजीनगर विमानतळावरून राज ठाकरे जालनाच्या दिशेने निघाले. तेव्हा वाटेतच मराठा आंदोलकांनी राज ठाकरेंचा ताफा अडवला. आंदोलनाला पाठिंबा द्यावा अशी त्यांची मागणी होती. तेव्हा राज ठाकरे थेट कारमधून उतरले आणि म्हणाले की, या राजकारण्यांच्या विनाकारण नादी लागू नका. या घोषणांनी तुम्हा सगळ्यांना वेडे केले आणि रस्त्यावर आणले. या लोकांना तुमची फक्ते मते पाहिजेत. तुमच्यासाठी काही करायचे नाही. मला जे काही बोलायचे ते मी आंदोलनस्थळी बोलेन. तुम्ही सगळे तिथे या असं राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना सांगताच आंदोलकांनी मनसे, राज ठाकरे यांच्या विजयाच्या घोषणा दिल्या.

राज ठाकरेंची आंदोलनस्थळी भेट

आंदोलनकर्त्यांनी राज यांचा ताफा सोडल्यानंतर ते अंतरवाली सराटी या गावात पोहचले. त्याठिकाणी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. त्यांच्याकडून सर्व माहिती जाणून घेत राज ठाकरे यांनी म्हटलं की, मी तुमच्यासमोर भाषण करायला नाही तर विनंती करायला आलोय. ज्या लोकांनी तुमच्यावर काठ्या उचलायला सांगितल्या, ज्यांनी गोळीबारी करायला सांगितली त्या सर्वांना आधी मराठवाडा बंदी करून टाका. केलेल्या गोष्टीची माफी मागत नाही तोवर कुणालाही पाऊल ठेवायला लावू नका. झालेल्या गोष्टीचे राजकारण करू नये असं देवेंद्र फडणवीस म्हणतात, तुम्ही विरोधात असता तर काय केले असते? असा सवाल राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना विचारला.

दरम्यान, माता भगिनींवर ज्या काठ्या बसत होत्या, त्या मला बगवले नाही. मी लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन या सर्व गोष्टी कानावर घालीनच. मागे मोर्चे निघत होते तेव्हाही मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही हे मी सांगितले होते. हे सगळे राजकारणी तुमचा वापर करून घेतील. मते पाडून घेतील आणि तुमच्याकडे दुर्लक्ष करतील. हा सुप्रीम कोर्टातला तिढा आहे. थोड्या गोष्टी कायद्यानेही समजून घ्या. आरक्षणाचे आमिष दाखवून तुमचा वापर करणार. विरोधी पक्षात मोर्चा काढतात आणि सत्तेत आल्यानंतर तुमच्यावर गोळ्या झाडणार. पोलिसांना दोष देऊ नका, पोलिसांना ज्यांनी आदेश दिलेत त्यांना दोष द्या. सतत आरक्षणाचे राजकारण करायचे. मते पदरात पाडून घ्यायची. मते मिळाली त्यानंतर तुम्हाला वाऱ्यावर सोडून द्यायचे अशी टीका राज यांनी केली.

टॅग्स :marathaमराठाRaj Thackerayराज ठाकरेMaratha Reservationमराठा आरक्षण