शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
2
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
3
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
4
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
5
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
6
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
7
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
8
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
9
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
10
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
11
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
12
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
13
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
14
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
15
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
16
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
17
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
18
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
19
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
20
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?

जालनात पोहचताच आंदोलकांनी अडवला ताफा; राज ठाकरे थेट कारमधून उतरले अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2023 12:00 IST

आंदोलनकर्त्यांनी राज यांचा ताफा सोडल्यानंतर ते अंतरवाली सराटी या गावात पोहचले. त्याठिकाणी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली

जालना – जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या गावात सुरु असलेल्या मराठा आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला, त्यात अनेक आंदोलक जखमी झाले. यावेळी पोलिसांनी गोळीबारही केल्याचा आंदोलकांचा आरोप आहे. जालनातील या घटनेमुळे राजकीय वातावरण तापले आहे. विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांनी जालना येथे जात आंदोलकांची भेट घेतली. त्यात शरद पवार, उद्धव ठाकरे, उदयनराजे यांच्यासारख्या नेत्यांचा समावेश आहे. त्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही जालनात जाऊन आंदोलकांची भेट घेतली.

छत्रपती संभाजीनगर विमानतळावरून राज ठाकरे जालनाच्या दिशेने निघाले. तेव्हा वाटेतच मराठा आंदोलकांनी राज ठाकरेंचा ताफा अडवला. आंदोलनाला पाठिंबा द्यावा अशी त्यांची मागणी होती. तेव्हा राज ठाकरे थेट कारमधून उतरले आणि म्हणाले की, या राजकारण्यांच्या विनाकारण नादी लागू नका. या घोषणांनी तुम्हा सगळ्यांना वेडे केले आणि रस्त्यावर आणले. या लोकांना तुमची फक्ते मते पाहिजेत. तुमच्यासाठी काही करायचे नाही. मला जे काही बोलायचे ते मी आंदोलनस्थळी बोलेन. तुम्ही सगळे तिथे या असं राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना सांगताच आंदोलकांनी मनसे, राज ठाकरे यांच्या विजयाच्या घोषणा दिल्या.

राज ठाकरेंची आंदोलनस्थळी भेट

आंदोलनकर्त्यांनी राज यांचा ताफा सोडल्यानंतर ते अंतरवाली सराटी या गावात पोहचले. त्याठिकाणी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. त्यांच्याकडून सर्व माहिती जाणून घेत राज ठाकरे यांनी म्हटलं की, मी तुमच्यासमोर भाषण करायला नाही तर विनंती करायला आलोय. ज्या लोकांनी तुमच्यावर काठ्या उचलायला सांगितल्या, ज्यांनी गोळीबारी करायला सांगितली त्या सर्वांना आधी मराठवाडा बंदी करून टाका. केलेल्या गोष्टीची माफी मागत नाही तोवर कुणालाही पाऊल ठेवायला लावू नका. झालेल्या गोष्टीचे राजकारण करू नये असं देवेंद्र फडणवीस म्हणतात, तुम्ही विरोधात असता तर काय केले असते? असा सवाल राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना विचारला.

दरम्यान, माता भगिनींवर ज्या काठ्या बसत होत्या, त्या मला बगवले नाही. मी लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन या सर्व गोष्टी कानावर घालीनच. मागे मोर्चे निघत होते तेव्हाही मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही हे मी सांगितले होते. हे सगळे राजकारणी तुमचा वापर करून घेतील. मते पाडून घेतील आणि तुमच्याकडे दुर्लक्ष करतील. हा सुप्रीम कोर्टातला तिढा आहे. थोड्या गोष्टी कायद्यानेही समजून घ्या. आरक्षणाचे आमिष दाखवून तुमचा वापर करणार. विरोधी पक्षात मोर्चा काढतात आणि सत्तेत आल्यानंतर तुमच्यावर गोळ्या झाडणार. पोलिसांना दोष देऊ नका, पोलिसांना ज्यांनी आदेश दिलेत त्यांना दोष द्या. सतत आरक्षणाचे राजकारण करायचे. मते पदरात पाडून घ्यायची. मते मिळाली त्यानंतर तुम्हाला वाऱ्यावर सोडून द्यायचे अशी टीका राज यांनी केली.

टॅग्स :marathaमराठाRaj Thackerayराज ठाकरेMaratha Reservationमराठा आरक्षण