शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

जालनात पोहचताच आंदोलकांनी अडवला ताफा; राज ठाकरे थेट कारमधून उतरले अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2023 12:00 IST

आंदोलनकर्त्यांनी राज यांचा ताफा सोडल्यानंतर ते अंतरवाली सराटी या गावात पोहचले. त्याठिकाणी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली

जालना – जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या गावात सुरु असलेल्या मराठा आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला, त्यात अनेक आंदोलक जखमी झाले. यावेळी पोलिसांनी गोळीबारही केल्याचा आंदोलकांचा आरोप आहे. जालनातील या घटनेमुळे राजकीय वातावरण तापले आहे. विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांनी जालना येथे जात आंदोलकांची भेट घेतली. त्यात शरद पवार, उद्धव ठाकरे, उदयनराजे यांच्यासारख्या नेत्यांचा समावेश आहे. त्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही जालनात जाऊन आंदोलकांची भेट घेतली.

छत्रपती संभाजीनगर विमानतळावरून राज ठाकरे जालनाच्या दिशेने निघाले. तेव्हा वाटेतच मराठा आंदोलकांनी राज ठाकरेंचा ताफा अडवला. आंदोलनाला पाठिंबा द्यावा अशी त्यांची मागणी होती. तेव्हा राज ठाकरे थेट कारमधून उतरले आणि म्हणाले की, या राजकारण्यांच्या विनाकारण नादी लागू नका. या घोषणांनी तुम्हा सगळ्यांना वेडे केले आणि रस्त्यावर आणले. या लोकांना तुमची फक्ते मते पाहिजेत. तुमच्यासाठी काही करायचे नाही. मला जे काही बोलायचे ते मी आंदोलनस्थळी बोलेन. तुम्ही सगळे तिथे या असं राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना सांगताच आंदोलकांनी मनसे, राज ठाकरे यांच्या विजयाच्या घोषणा दिल्या.

राज ठाकरेंची आंदोलनस्थळी भेट

आंदोलनकर्त्यांनी राज यांचा ताफा सोडल्यानंतर ते अंतरवाली सराटी या गावात पोहचले. त्याठिकाणी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. त्यांच्याकडून सर्व माहिती जाणून घेत राज ठाकरे यांनी म्हटलं की, मी तुमच्यासमोर भाषण करायला नाही तर विनंती करायला आलोय. ज्या लोकांनी तुमच्यावर काठ्या उचलायला सांगितल्या, ज्यांनी गोळीबारी करायला सांगितली त्या सर्वांना आधी मराठवाडा बंदी करून टाका. केलेल्या गोष्टीची माफी मागत नाही तोवर कुणालाही पाऊल ठेवायला लावू नका. झालेल्या गोष्टीचे राजकारण करू नये असं देवेंद्र फडणवीस म्हणतात, तुम्ही विरोधात असता तर काय केले असते? असा सवाल राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना विचारला.

दरम्यान, माता भगिनींवर ज्या काठ्या बसत होत्या, त्या मला बगवले नाही. मी लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन या सर्व गोष्टी कानावर घालीनच. मागे मोर्चे निघत होते तेव्हाही मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही हे मी सांगितले होते. हे सगळे राजकारणी तुमचा वापर करून घेतील. मते पाडून घेतील आणि तुमच्याकडे दुर्लक्ष करतील. हा सुप्रीम कोर्टातला तिढा आहे. थोड्या गोष्टी कायद्यानेही समजून घ्या. आरक्षणाचे आमिष दाखवून तुमचा वापर करणार. विरोधी पक्षात मोर्चा काढतात आणि सत्तेत आल्यानंतर तुमच्यावर गोळ्या झाडणार. पोलिसांना दोष देऊ नका, पोलिसांना ज्यांनी आदेश दिलेत त्यांना दोष द्या. सतत आरक्षणाचे राजकारण करायचे. मते पदरात पाडून घ्यायची. मते मिळाली त्यानंतर तुम्हाला वाऱ्यावर सोडून द्यायचे अशी टीका राज यांनी केली.

टॅग्स :marathaमराठाRaj Thackerayराज ठाकरेMaratha Reservationमराठा आरक्षण