शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
2
Nitin Shete: मोठी बातमी! शनि शिंगणापूर संस्थानचे सीईओ नितीन शेटे यांनी संपवलं आयुष्य
3
"अल्लाह हू अकबर, विमानात बॉम्ब, मी तो उडवून देईन", प्रवाशाच्या धमकीनंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग
4
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
5
IND vs ENG: "शुबमन गिलने जर शतक केलं नसतं तर..."; प्रशिक्षक गौतम गंभीरने ठणकावून सांगितलं
6
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
7
Shravan Somvar 2025: महादेवाला केतकीची फुले वाहू नये; त्यामागे आहे एक पौराणिक कथा!
8
'बॉर्डर २'मध्ये वरुण धवनसोबत झळकणार 'ही' अभिनेत्री, मेकर्सने केली अधिकृत घोषणा
9
एक फोन कॉल लीक, शिव मंदिरासाठी शत्रू बनले शेजारी; आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू
10
Pune Video: लाज लज्जाच सोडली! पुण्यात जोडप्याचे दुचाकीवरच अश्लील चाळे; व्हिडीओ व्हायरल 
11
अरे बापरे! फक्त डोळ्यांनाच नाही तर त्वचेसाठीही घातक आहे फोनच्या स्क्रीनमधून येणारी ब्लू लाईट
12
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
13
बारामती हळहळलं ! २४ तासात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, वडिलांनी देखील घेतला अखेरचा श्वास
14
Nag Panchami 2025: नागपंचमीला आठवणीने 'या' ८ नागांचे स्मरण करा; अकाली मृत्युचे भय घालवा!
15
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
16
शाहरुख-सलमानच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी, पण आमिरच्या का नाही? अभिनेता म्हणाला...
17
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
18
VIDEO: शटल कॉक घेऊन उभा राहिला अन् जोरात कोसळला…; २५ वर्षाच्या तरुणाचा धक्कादायक मृत्यू
19
Shreyasi Joshi : पुण्याच्या लेकीची कमाल; आशियाई रोलर स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल जिंकणारी पहिली भारतीय
20
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...

जालनात पोहचताच आंदोलकांनी अडवला ताफा; राज ठाकरे थेट कारमधून उतरले अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2023 12:00 IST

आंदोलनकर्त्यांनी राज यांचा ताफा सोडल्यानंतर ते अंतरवाली सराटी या गावात पोहचले. त्याठिकाणी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली

जालना – जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या गावात सुरु असलेल्या मराठा आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला, त्यात अनेक आंदोलक जखमी झाले. यावेळी पोलिसांनी गोळीबारही केल्याचा आंदोलकांचा आरोप आहे. जालनातील या घटनेमुळे राजकीय वातावरण तापले आहे. विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांनी जालना येथे जात आंदोलकांची भेट घेतली. त्यात शरद पवार, उद्धव ठाकरे, उदयनराजे यांच्यासारख्या नेत्यांचा समावेश आहे. त्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही जालनात जाऊन आंदोलकांची भेट घेतली.

छत्रपती संभाजीनगर विमानतळावरून राज ठाकरे जालनाच्या दिशेने निघाले. तेव्हा वाटेतच मराठा आंदोलकांनी राज ठाकरेंचा ताफा अडवला. आंदोलनाला पाठिंबा द्यावा अशी त्यांची मागणी होती. तेव्हा राज ठाकरे थेट कारमधून उतरले आणि म्हणाले की, या राजकारण्यांच्या विनाकारण नादी लागू नका. या घोषणांनी तुम्हा सगळ्यांना वेडे केले आणि रस्त्यावर आणले. या लोकांना तुमची फक्ते मते पाहिजेत. तुमच्यासाठी काही करायचे नाही. मला जे काही बोलायचे ते मी आंदोलनस्थळी बोलेन. तुम्ही सगळे तिथे या असं राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना सांगताच आंदोलकांनी मनसे, राज ठाकरे यांच्या विजयाच्या घोषणा दिल्या.

राज ठाकरेंची आंदोलनस्थळी भेट

आंदोलनकर्त्यांनी राज यांचा ताफा सोडल्यानंतर ते अंतरवाली सराटी या गावात पोहचले. त्याठिकाणी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. त्यांच्याकडून सर्व माहिती जाणून घेत राज ठाकरे यांनी म्हटलं की, मी तुमच्यासमोर भाषण करायला नाही तर विनंती करायला आलोय. ज्या लोकांनी तुमच्यावर काठ्या उचलायला सांगितल्या, ज्यांनी गोळीबारी करायला सांगितली त्या सर्वांना आधी मराठवाडा बंदी करून टाका. केलेल्या गोष्टीची माफी मागत नाही तोवर कुणालाही पाऊल ठेवायला लावू नका. झालेल्या गोष्टीचे राजकारण करू नये असं देवेंद्र फडणवीस म्हणतात, तुम्ही विरोधात असता तर काय केले असते? असा सवाल राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना विचारला.

दरम्यान, माता भगिनींवर ज्या काठ्या बसत होत्या, त्या मला बगवले नाही. मी लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन या सर्व गोष्टी कानावर घालीनच. मागे मोर्चे निघत होते तेव्हाही मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही हे मी सांगितले होते. हे सगळे राजकारणी तुमचा वापर करून घेतील. मते पाडून घेतील आणि तुमच्याकडे दुर्लक्ष करतील. हा सुप्रीम कोर्टातला तिढा आहे. थोड्या गोष्टी कायद्यानेही समजून घ्या. आरक्षणाचे आमिष दाखवून तुमचा वापर करणार. विरोधी पक्षात मोर्चा काढतात आणि सत्तेत आल्यानंतर तुमच्यावर गोळ्या झाडणार. पोलिसांना दोष देऊ नका, पोलिसांना ज्यांनी आदेश दिलेत त्यांना दोष द्या. सतत आरक्षणाचे राजकारण करायचे. मते पदरात पाडून घ्यायची. मते मिळाली त्यानंतर तुम्हाला वाऱ्यावर सोडून द्यायचे अशी टीका राज यांनी केली.

टॅग्स :marathaमराठाRaj Thackerayराज ठाकरेMaratha Reservationमराठा आरक्षण