शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
5
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
6
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
7
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
8
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
9
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
10
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
11
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
12
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
13
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
14
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
15
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
16
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
17
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
18
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
19
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
20
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...

राज ठाकरेंच्या संताप मोर्चावर गुन्हा दाखल, जमावबंदीचा आदेश मोडल्याचा मनसेवर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2017 8:26 PM

संताप मोर्चा काढून रेल्वे प्रशासन आणि सरकारचा निषेध नोंदवल्याप्रकरणी या मोर्चाच्या आयोजकांवर  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई - एलफिन्स्टन रोड येथील दुर्घटनेविरोधात संताप मोर्चा काढून रेल्वे प्रशासन आणि सरकारचा निषेध नोंदवल्याप्रकरणी या मोर्चाच्या आयोजकांवर  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी मनसेवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एल्फिन्स्टन रोड येथे चेंगराचेंगरी होऊन 23 प्रवाशांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी गुरुवारी दक्षिण मुंबईतील मेट्रो सिनेमा चौक ते चर्चगेट या मार्गावर संताप मोर्चा काढला होता. या मोर्चात मनसैनिकांसह सर्वसामान्य नागरिक मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते. 

गुरुवारी काढण्यात आलेल्या संताप मोर्चानंतर उपस्थितांना संबोधित करताना राज ठाकरे यांनी रेल्वे प्रशासन आणि सरकारवर घणाघात केला होता. मात्र या मोर्चाला पोलिसांनी शेवटपर्यंत परवानगी दिली नव्हती. मात्र रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका घेतलेल्या मनसेने जमावबंदी झुगारत मोर्चा काढला होता. त्यामुळे मोर्चा संपल्यानंतर मनसेवर जमावबंदी मोडल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. 14.30 ते 15.10 वा चे दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्याची कायदेशीर परवानगी न घेता ' रेल्वे "प्रशासनाचा धिक्कार असो, रेल्वे प्रशासन मुर्दाबाद' अशी घोषणाबाजी करून मेट्रो सिनेमा चौक ते चर्चगेट असा पायी मोर्चा काढून सार्वजनिक रहदारीस अडथळा करून जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. गुरुवारी सकाळी आयोजित करण्यात आलेल्या या मोर्चानंतर उपस्थितांना संबोधित करताना  भारतीय रेल्वेसारख्या सरकारी यंत्रणांनी आपल्या कामात सुधारणा केली नाही, तर पुढचा मोर्चा शांततेत निघणार नाही, असे सांगत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मनसेची गाडी पुन्हा खळखट्याकचा मार्ग अवलंबेल असा सूचक इशारा दिला होता. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींवर घणाघाती टीका करताना राज ठाकरे यांनी तुम्ही सगळ्या भारतीय जनतेचा विश्वासघात केला आहेत, तुमच्याइतका खोटारडा पंतप्रधान मी बघितला नाही, असा आरोप केला. पश्चिम व मध्य अशा दोन्ही रेल्वे स्थानकांच्या भोवतालच्या परिसरात असलेल्या फेरीवाल्यांचा दाखला देत 15 दिवसांच्या आत जर हे फेरीवाले हटवले गेले नाहीत तर ते काम माझ्या पक्षाचे कार्यकर्ते करतील, असा इशाराही राज यांनी दिला आहे.

राज ठाकरे यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे -

- इतक्या वर्षांचे प्रलंबित प्रश्न आजही सुटत नाहीत. आधीच्या सरकारमध्ये जी परिस्थिती तीच आजच्या सरकारमध्ये. त्यामुळे हा संताप आहे.    ज्याच्यावर कधी विश्वास टाकला नाही त्यांनी घात केला तर वाईट वाटत नाही. पण ज्यावर विश्वास टाकला तेच घात करतायत. म्हणून माझा मोदींवर राग आहे. या देशाने इतकं प्रेम दिलं, विश्वास टाकला त्यांच्यासाठी काय करताय? 

- भाषणादरम्यान राज ठाकरेंची नितीन गडकरीवरही टीका, अच्छे दिन म्हणजे गळ्यात अडकलेले हाडूकचा दिला संदर्भ. याचा अर्थ अच्छे दिन येणार नाहीत हे निश्चित असा आरोप.

- सुरेश प्रभूंनी बुलेट ट्रेनला विरोध केला म्हणूनच त्यांचं खात बदललं. त्यांच्या जागी पियुष गोयलांना आणला. या गोयलांना काय कळतं रेल्वेचं. या गोयलांच्या पियूषपेक्षा आमच्या दादरच्या आस्वाद, प्रकाशचा पियूष बरा. 

- मुठभरांसाठी बुलेट ट्रेन आणणार, त्यांच्यासाठी लाख कोटीचे कर्ज काढणार आणि अख्खा देश हे कर्ज फेडत बसणार, हे चालणार नाही.

- मुंबईतल्या मूठभर व गुजरातमधल्या मुठभर गुजरात्यांसाठी बुलेट ट्रेनचा डाव असून हा मुंबई महाराष्ट्रापासून तोडून गुजरातला जोडण्याचा डाव आहे. 

- माझा व्यक्ती म्हणून मोदींना विरोध नाही....पण त्यांच्या भूमिकांना विरोध आहे, आधी वेगळे बोलत होते आता मोदींची भाषा बदलली आहे. तुमच्याशी आमचं घेणदेण नाही. तुमच्या चुकीच्या भूमिकांना विरोध.

- यावेळी मेट्रो परीसरातील वीज गेली, यावेळी ते म्हणाले की, वीज घालवून काही होणार नाही, विरोधाचा सूर्य हा उगवणारच. 

- बुलेट ट्रेनला पहिल्यांदा विरोध करणारा माणूस मीच होतो, नंतर बाकीचे पोपट बोलायला लागले- सुरेश प्रभूंनी बुलेटट्रेनला विरोध केला म्हणून त्यांना काढून टाकलं. फक्त २-३ माणसं देश चालवणार का?- सर्व संपादकांना माझी विनंती आहे की या सरकारला वठणीवर आणा- न्यायालयांसह सर्व संविधानिक संस्थांना माझी विनंती आहे की दबावाखाली निर्णय घेऊ नका- देशातल्या घराघराचा कानोसा घ्या या; लोकं सरकारला शिव्या घालताहेत- देशातले सर्व प्रश्न माहित होते असा यांचा दावा मग साडेतीन वर्ष फुकट का घालवलीत

- रतन टाटांच्या सांगण्यावरून मी गुजरातेत गेलो, परंतु आता कळतंय तो मुखवटा होता. खरा विकास झालेला नाही.

- भाजपामधले लोकपण हा सगळा खोटा मुखवटा असल्याचं खासगीत सांगतात.

- आजचा मोर्चा शांततेत निघाला, परंतु पुढचा मोर्चा शांततेत नसेल.

 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरे