शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईकर म्हणून आज मला लाज वाटतेय... आणखी विकास नको; महेश मांजरेकरांचा उद्विग्न सवाल, खंतही व्यक्त...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 09:30 IST

Raj Thackeray Uddhav Thackeray Interview news : मुंबईतील 'एअर क्वालिटी इंडेक्स' (AQI) १८३ वर गेल्याचा दाखला देत मांजरेकर म्हणाले की, "मुंबई आता 'डिकंपोज' कधी होणार? विकासाच्या नावाखाली शहराचा श्वास कोंडला जात आहे.

मुंबई: "मी जेव्हा आज घरातून बाहेर पडतो, तेव्हा मला मुंबईकर म्हणून लाज वाटते. माझी मुले याच शहरात वाढणार आहेत, याचा विचार केला की भीती वाटते," अशा अत्यंत टोकदार आणि भावनिक शब्दांत प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी मुंबईच्या सद्यस्थितीवर आपली खंत व्यक्त केली. 'सामना'च्या विशेष मुलाखतीत त्यांनी मुंबईतील वाढते प्रदूषण आणि ढासळत्या पायाभूत सुविधांवरून प्रशासनाला धारेवर धरले.

मुंबईतील 'एअर क्वालिटी इंडेक्स' (AQI) १८३ वर गेल्याचा दाखला देत मांजरेकर म्हणाले की, "मुंबई आता 'डिकंजेस्ट' कधी होणार? विकासाच्या नावाखाली शहराचा श्वास कोंडला जात आहे. मुंबई आता विकास करण्याच्या लायकीची राहिली नाहीये, कारण इथे आता जागाच उरलेली नाही." लोंढे थांबवण्याची गरज व्यक्त करताना त्यांनी मुंबईच्या वाढत्या गर्दीवरही बोट ठेवले.

उद्धव ठाकरेंचा सरकारवर प्रहार

महेश मांजरेकरांच्या प्रश्नांना उत्तर देताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सध्याच्या सरकारवर 'नियोजनशून्य विकासा'चा आरोप केला. ठाकरे म्हणाले, "सध्याच्या सरकारची विकासाची गती नाही, तर विनाशाची गती सुरू आहे. सगळीकडे एकाच वेळी रस्ते उकरून ठेवले आहेत. मेट्रो, इमारती आणि रस्ते यांची कामे एकाच वेळी काढल्यामुळे धूळ आणि प्रदूषण वाढले आहे. आम्हीही विकास केला, पण तो नियोजित होता. मुंबईकर प्रामाणिकपणे कर भरतात, पण त्यांना बदल्यात काय मिळते? थेट हॉस्पिटलला जाणारे रस्ते? हे विकासाचे लक्षण नाही."

पुणे की मुंबई? मांजरेकरांचा अनुभव

मुंबईतील गर्दीला कंटाळून सहा महिन्यांसाठी पुण्याला शिफ्ट झालो होतो, पण सहा महिन्यांत पुन्हा मुंबईतच परतलो. मात्र, आताची परिस्थिती पाहता मुंबईतील कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण जागतिक स्तरावर चिंताजनक असल्याचे मांजरेकर यांनी नमूद केले.

English
हिंदी सारांश
Web Title : Mahesh Manjrekar ashamed to be Mumbaikar, questions unchecked development.

Web Summary : Director Mahesh Manjrekar expressed shame over Mumbai's deteriorating environment and infrastructure. He criticized unchecked development, pollution, and overcrowding. Uddhav Thackeray accused the government of unplanned development, leading to increased pollution and hardship for Mumbaikars.
टॅग्स :Mahesh Manjrekarमहेश मांजरेकर Raj Thackerayराज ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरेBMC Electionsमुंबई महापालिका निवडणूक २०२६Municipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६Shiv Senaशिवसेना