शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

Raj Thackeray, Chaitya Bhoomi : "राज ठाकरे घराजवळ असलेल्या चैत्यभूमीवर आजवर का गेले नाहीत?"; Jitendra Awhad यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2022 19:46 IST

"इतिहास कुणाच्याही नावावर खपवता येत नाही"

Raj Thackeray, Chaitya Bhoomi : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सभा घेत आहेत. या सभांमध्ये ते राज्यातील राजकारणावर भाष्य करताना दिसले आहेत. नुकत्याच झालेल्या एका सभेत राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती. शरद पवार हे शाहू-फुले-आंबेडकर यांचे नाव घेतात, पण छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेत नाही, असा थेट आरोपच राज यांनी त्यांच्यावर केला होता. त्यास शरद पवार यांनी सूचक उत्तर दिलेच. पण आज या आरोपावर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही उत्तर दिले. तसेच, राज ठाकरेंनाही एक प्रश्न विचारला.

"राज ठाकरे असा आरोप करताना दिसले की शरद पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतले नाही. मला याबाबत असं विचारावंसं वाटतंय की राज ठाकरे यांचं घर मुंबईत आहे. ते स्वत: चैत्यभूमीपासून अगदी जवळ सुमारे पाच मिनिटांच्या अंतरावर राहतात. मग असे असूनही ते आजवर चैत्यभूमीवर का गेले नाहीत? ते शाहू-फुले-आंबेडकरांचे नाव का घेत नाहीत?", असा थेट सवाल जितेंद्र आव्हाड यांनी राज यांना केला.

आव्हाड यांनी आपल्या भाषणात इतिहास सांगण्याबाबतचा मुद्दाही समाविष्ट केला. "राजकीय पुढाऱ्यांनी समाजातील महागाई, गरिबी, रोजगार, शेतकऱ्यांबद्दल बोलले पाहिजे. पण काही नेते हे विषय सोडून विनाकारण चुकीचा इतिहास सांगून आणि तो तरुणांच्या माथी मारून महाराष्ट्र पेटवण्याचा प्रयत्न करत आहेत. हा प्रयत्न होणार असेल तर आम्ही कधीही ते यशस्वी होऊ देणार नाही", असे इशारा त्यांनी दिला.

"युवा पिढीला चुकीचा इतिहास सांगू नका. इतिहासावर मी कुणाशीही चर्चा करण्यासाठी तयार आहे. वर्तमान इतिहासकारांनाही हे संदर्भ माहीत आहेत. त्यामुळे एक लक्षात घ्या की इतिहास हा असा कुणाच्याही नावावर खपवता येत नाही. चुकीचा इतिहास सांगू नका. मुद्दामहून अपप्रचार करुन महाराष्ट्र पेटवण्याचे कारस्थान काही लोक करत आहेत. असं करून महाराष्ट्र पेटवण्याचा प्रयत्न केलात, तर आम्ही तुमचे प्रयत्न हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही", असेही आव्हाड यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेJitendra Awhadजितेंद्र आव्हाडSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसMNSमनसे