शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

"राज ठाकरेंनी उघडपणे अमित शाहांची भेट घेतली, काही जण..."; नीलम गोऱ्हेंचा रोख कुणावर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2024 16:51 IST

MNS in BJP-Shivsena Allaince: मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि महायुतीतील नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. अमित शाह, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्यातील बैठकामुळे मनसे महायुतीत सहभागी होईल अशा चर्चांना वेग आला आहे. 

मुंबई - Neelam Gorhe on Raj Thackeray ( Marathi News ) मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे महायुतीत सहभागी होणार यावर सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. अमित शाह यांच्या भेटीनंतर आज राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांची एका हॉटेलमध्ये भेट झाली. यावरून विरोधकांनी टीका सुरू केली. त्यावरून शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी खोचक टोला लगावला आहे. राज ठाकरेंनी उघडपणे अमित शाहांची भेट घेतली, काही जण गुपचूप भेटी घेतात असं त्यांनी म्हटलं आहे. 

मुंबईत पत्रकारांशी गोऱ्हे यांनी संवाद साधला. त्या म्हणाल्या की, ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण हे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे धोरण होते. यातून अनेकदा एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत राज ठाकरेंच्या भेटी झाल्या आहेत. राज ठाकरेंनी नेहमीच सरकारला सकारात्मक सल्ला देण्याचं काम केलंय. काही सरकारने त्यांना सन्मान दिला. काहींनी त्यांचे ऐकलं नाही. या पार्श्वभूमीवर ही भावनिक, सामाजिक आणि राजकीय भेट आहे. त्याच्यातून आत्ताच कुठलाच निष्कर्ष काढणे शक्य नाही. परंतु बेरजेचे राजकारण जो शब्द यशवंतराव चव्हाणांनी तयार केला. काही लोकांचे राजकारण उण्याचे असते. कुणाला तरी उतरवून, काढून टाकू असं असतं. त्यात महाराष्ट्राचे हित नाही असं त्यांनी सांगितले. 

तसेच राजकारण संवाद, समन्वय, सहकार्य आणि मुद्द्यांवर एकजूट आवश्यक असते. राज ठाकरेंनी मराठी भाषेच्या प्रश्नासाठी कायमच आग्रहाची भूमिका घेतली पाहिजे. अमित शाह यांच्यासोबत राज ठाकरेंनी उघडपणे भेट घेतली आहे. काहीजण गुपचूप भेटी घेतात. राजकारणात कुणी कुणाला भेटू शकते. राजकारणाचा तो पाया आहे. राज ठाकरेंशी संवाद आणि त्यातून महाराष्ट्रासाठी काही चांगले झाले तर त्याचे मी स्वागतच करते असंही नीलम गोऱ्हे यांनी राज ठाकरेंच्या महायुतीतील सहभागावर प्रतिक्रिया दिली. 

दरम्यान, लोकसभेची निवडणूक जाहीर झालीय. बाळासाहेब ठाकरे यांचा ज्या मुद्द्यांवर भर होता ते म्हणजे रामजन्मभूमी, कलम ३७० हटवणे त्याचसोबत काश्मीरमध्ये लाल चौकात तिरंगा उभारला पाहिजे हे सगळं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली सरकारकडून झालेले आहे. आज बेरजेचे राजकारण करण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीसांकडून सुरू आहे. बाळासाहेबांच्या विचारांना नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न शिंदे करतायेत असं गोऱ्हे यांनी म्हटलं. 

...पण त्यांचे भूत लवकरच उतरेल

शिवसेनेची पहिली यादी दिल्लीत भाजपा हायकमांडकडे पाठवली आहे अशी सूत्रांच्या हवाल्याने बातमी येते असा प्रश्न नीलम गोऱ्हेंना पत्रकारांनी विचारला असता त्यावर सूत्रांनुसार ज्या बातम्या दिल्या जातात त्या तपासून पाहायला हव्यात. कारण काही वेळा ही सूत्रे असंतुष्ट आत्मे असतात. तो असंतुष्ट आत्मा काहीतरी बडबड असेल. पण त्याचे भूत लवकरच उतरेल असा खोचक टोला लगावला आहे. 

टॅग्स :Neelam gorheनीलम गो-हेRaj Thackerayराज ठाकरेAmit Shahअमित शाहMahayutiमहायुतीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४