शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Raj Thackeray: पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिले ३ मंत्र; राज ठाकरेंनी सांगितला किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2022 10:59 IST

माझे आजोबा हे कडवट हिंदुत्ववादी होते. एका पुस्तकावरून आजोबांचं चित्र उभं करू नका. कर्मकांडांच्या विरोधात आजोबा होते. देव-धर्माच्या विरोधात नाही

मुंबई – राज ठाकरेंची बहिण जया ही आमची मैत्रिण होती. मात्र राज ठाकरे तिचा भाऊ आहे मला माहित नव्हतं. राज ठाकरेंनी सुरुवातीला मला पाहिलं होतं. त्यांनीच प्रपोज केला होता असा किस्सा शर्मिला ठाकरे यांनी सांगितला. राज आणि माझ्या वयात २ वर्षाचं अंतर आहे. मी राज ठाकरेंपेक्षा २ वर्षाने मोठी आहे. परंतु बाळासाहेब आणि माझे वडील एकमेकांचे चांगले मित्र होते. आमच्या नात्याला कुठलाही विरोध झाला नाही असंही शर्मिला ठाकरेंनी सांगितले.

एबीपी माझावरील महाकट्टा कार्यक्रमात राज ठाकरे(Raj Thackeray) आणि शर्मिला ठाकरे यांची मुलाखत होती. यावेळी राज ठाकरे म्हणाले की, माझा पहिला मोर्चा होता, त्यावेळी मी भाषण करत नव्हतो. मोर्चाला माँ आल्याचं सांगितले. माँ गाडीत येऊन माझं भाषण ऐकायला बसली होती. गाडीजवळ मी गेलो, ती म्हणाली काकांना भेटायला जायचं आहे. दुपारी २-३ वाजता बाळासाहेबांना भेटायला गेलो. जे मैदान असेल त्या मैदानाची भाषा बोल. आपण किती हुशार आहोत हे भाषणातून सांगू नको. लोकं किती हुशार आहेत ते बोल. मी भाषणात काय बोललो त्याऐवजी भाषणातून काय दिलं याचा विचार कर असं काकांनी मला सांगितले.

तसेच माझे आजोबा हे कडवट हिंदुत्ववादी होते. एका पुस्तकावरून आजोबांचं चित्र उभं करू नका. कर्मकांडांच्या विरोधात आजोबा होते. देव-धर्माच्या विरोधात नाही. जे मला सल्ले देत आहेत त्यांनी प्रबोधनकार ठाकरे नीट वाचावे. ज्याचं धर्मावर प्रेम आहे तोच माणूस त्या धर्मातील चुकीच्या गोष्टी सांगू शकतो. माझे आजोबा ब्राह्मणदोषी असल्याचं सांगितले. माझे विचार हे आजोबांच्या विचारसरणीशी जुळते आहेत. संध्याकाळच्या प्रार्थनेनंतर आजोबा मला लिमलेटची गोळी द्यायची. मी ४ वर्षाचा होतो असंही राज ठाकरेंनी सांगितले.

नीट राहायला सांग, नाहीतर...  

सुरुवातीच्या काळात मोबाईल नव्हते, राज ठाकरे दौऱ्यावर जायचे तेव्हा आम्हाला चिंता वाटायची. आजही खूप चिंता वाटते. आम्ही कदम मेन्शनमध्ये राहायला असताना राज ठाकरेंना धमकी देणारा फोन दुबईवरून आला होता. नीट राहायला सांग असं सांगितले. त्याकाळी शिवसेनेत राज ठाकरे खूप सक्रिय होते. विद्यार्थी सेनेची धुरा त्यांच्या खांद्यावर होती. राज ठाकरेंना पहिल्यांदा सुरक्षा आली, पोलिसांची गाडी बघूनही आश्चर्य वाटलं. याची सवय नव्हती असंही शर्मिला ठाकरेंनी सांगितले.

सभेच्या दिवशी हाता-पायाला घाम फुटतो

ज्या दिवशी सभा असते तेव्हा कुणालाही राज ठाकरेंच्या खोलीत प्रवेश नसतो. सभेत कधीही भाषण वाचून म्हणत नाही. राज ठाकरे चिंतन करत असतात. सभेच्या दिवशी हातापायाला घाम फुटलेला असतो. मला १०० गोष्टी माहिती असल्या तरी व्यासपीठावर मी काय बोलणार आहे हे मी ठरवत नाही. अनेक मुद्दे काढलेले असतात. परंतु माईकसमोर उभं राहेपर्यंत हाताला घाम येतो. सभेत बोलताना समोर काही दिसत नाही. जे काही असते ते मांडत असतो. एक विषय नसतो. एखादा मुद्दा मांडला तर त्याचे अनेक पैलू असतात. ते सगळे मांडत बसत नाही. काही ठरलेले नसते. मी बोलता बोलता विषय मांडत असतो. काही विषय राहिला तर शिदोरे चिठ्ठी पाठवून कळवतात असं राज ठाकरेंनी सांगितले.  

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेsharmila thackerayशर्मिला ठाकरे