राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 13:05 IST2025-06-12T13:02:28+5:302025-06-12T13:05:40+5:30

"यांनी कितीही जोड-तोड केलं, तरीही महायुतीला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पराभव पत्करावाच लागेल. जनतेचा हाच कौल राहणार आहे..."

Raj-Fadnavis met, increasing the tension of the opposition What did congress leader Nana Patole say about this meeting on the eve of the municipal elections | राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?

राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?

राज्यात लवकरच महापालिका निवडणुका होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीव मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा संपूर्ण राज्यभरात रंगत आहेत. मात्र असे असतानाच मनसे प्रमुख राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अचानकपणे वांद्रे येथील ताज लँड्स अँडमध्ये भेटल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान रज-फडणवीस भेटीसंदर्भात काँग्रेस नेते नाता पटोले यांनी भाष्य केले आहे.

पटोले म्हणाले, "भाजप हा चोवीस तास राजकारण करणारा पक्ष आहे. सत्तेवर कसे यावे? यावर त्यांचे काम चालते आणि सत्तेवर आल्यानंतर, लुटपाट करून आपली घरे कसे भरता येतील? यावर काम करणारा हा पक्ष आहे. दुसऱ्याच्या घरी आग लावणे दुसऱ्याचे घर तोडणे, त्यात भाजप एक्सपर्ट आहे. कालपर्यंत हे राज ठाकरे यांना शिव्या घालत होते. कारण राजठाकरे यांनी, 'ऑपरेशन सिंदूर'संदर्भात जी काही भूमिका मांडली होती, त्यावरून त्यांना ट्रोल करणारी भाजपचीच मंडळी होती. राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. महागाई वाढत आहे. राज्यात हाहाकार आहे. मात्र त्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे वेळ नाही आणि ते पॉलिटिकल पोळ्या शेकायचेच काम करत असतील तर, त्यावर फार काही बोलावे असे मला वाटत नाही." ते टीव्ही९सोबत बोलत होते.

पटोले पुढे म्हणाले, त्यांच्या (भाजप) डोक्यात २४ तास राजकारण सुरू असते. सत्ता कशी घेता येईल? यावर त्यांचे काम सुरू असते आणि मोजी असोत अथवा फडणवीसजी ते २४ तास तेच करत असतात. यासंदर्भात फार काही चर्चा करावी असे मला वाटत नाही. यामुळे मी या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करतो.

महायुतीला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पराभव पत्करावाच लागेल -
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात बोलताना पटोले म्हणाले, या सरकारने जोड-तोड करण्याचे कितीही प्रयत्न केले तरी काहीही होणार नाही. महाराष्ट्रातील जनता या भ्रष्ट आणि धोकेबाज महायुतीच्या सरकारपासून त्रासलेली आहे. यामुळे राज्यातील जनतेने निर्णय केलेला आहे. या निवडणुका चारवर्षांनंतर होत आहेत. माननीय सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्याच्या आत निवडणुका घ्याव्यात अशी सूचना देऊनही, या निवडणुकीला ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता आहे. यामुळे माननीय सर्वोच्च न्यायालयाचेही ऐकायचे नाही. निवडणुका आपल्या सोयीप्रमाणे करायच्या, अशापद्धतीचे हे काम आहे. मात्र, यांनी कितीही जोड-तोड केलं, तरीही महायुतीला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पराभव पत्करावाच लागेल. जनतेचा हाच कौल राहणार आहे.


 

Web Title: Raj-Fadnavis met, increasing the tension of the opposition What did congress leader Nana Patole say about this meeting on the eve of the municipal elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.