शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

गुड न्यूज! सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाचे दिवस वाढतील; बॅड न्यूज! राज्याचं तापमान 2 अंशांनी वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2022 08:58 IST

तीस वर्षांच्या अभ्यासावरून पुढच्या तीस वर्षांचे अनुमान; हवामान बदल, तापमानवाढीचा फटका

- सचिन लुंगसे/निशांत वानखेडेमुंबई/नागपूर : हवामान बदल, जागतिक तापमानवाढीचा महाराष्ट्रावर काय परिणाम होईल? १९९० पासूनच्या अभ्यासावरून सेंटर फॉर सायन्स, टेक्नॉलॉजी ॲण्ड पॉलिसी या संशोधन संस्थेने अनुमान काढले आहे. यात राज्यातील तापमान पुढच्या तीस वर्षांत १ ते २ डिग्रीने वाढले. तर प्रदूषण असेच राहिले तर सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाचे दिवस वाढतील.इंटरगव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज (आयपीसीसी) साठी भारतीय हवामान खात्याच्या मदतीने या संस्थेने पश्चिम भारतातील राजस्थान, गुजरात, गोवा, महाराष्ट्राचा अभ्यास केला असून पावसाचे दिवस वाढल्याचा फायदा दुष्काळी जिल्ह्यांना होईल. अधिक पाऊस पडणाऱ्या जिल्ह्यांमध्ये मात्र अतिवृष्टीचे संकट येईल.प्रदूषण असेच वाढत राहिले तर २०५० पर्यंत सर्वाधिक तापमान वाढ अकोला २.५ , अमरावती २.९, औरंगाबाद २.९, भंडारा २.६ , बुलडाणा २.३, धुळे २.२, गोंदिया २.१, हिंगोली २.२, जळगाव २.५, जालना २.७, नागपूर २.२, नंदुरबार २.५, नाशिक २.४, वर्धा २.१, वाशिम २.३ डिग्रीने वाढेल.साधारण परिस्थितीत १ अंशापेक्षा अधिक तापमानवाढीचे जिल्हेभंडारा २.० । अकोला १.३ । अमरावती १.६ । औरंगाबाद १.१ । बीड १.२। बुलडाणा १.४ । धुळे १.१ । गोंदिया १.१ । हिंगोली १.२ । जळगाव १.३ । लातूर १.४ । नागपूर १.१ । नंदुरबार १.६ । उस्मानाबाद १.४ । वर्धा १.१ । वाशिम १.२ । यवतमाळ १.१प्रदूषणामुळे तापमानवाढीचा गंभीर धोकाप्रदूषणाला आळा घातला तर महाराष्ट्रात पुढील तीस वर्षांत साधारणपणे १ ते २ डिग्री अंश सेल्सिअस इतके तापमान वाढेल. परंतु, तो आळा घालण्यात अपयश आले तर मात्र अनेक जिल्ह्यांमध्ये त्यापेक्षा दुपटीने वाढ होईल. बहुतेक जिल्ह्यांमधील तापमान दोन ते तीन डिग्रीने वाढलेले असेल. या वाढीचे गंभीर परिणाम महापूर, शेती, वने, वन्यजीव, आरोग्य आणि विकास कामांवर होणार आहे. आज वाढलेले जागतिक तापमान कितीही प्रयत्न केला तरी पुन्हा पुढे १० वर्षे कमी होणार नाही. परंतु वृक्षारोपण करणे, जंगलाचे प्रमाण वाढविणे, लहान बंधारे, तळे इत्यादी जलसाठे वाढविणे, निसर्गपूरक जीवनशैली अंगीकारणे अशा अनेक प्रयत्नांनंतरच हवामान बदल रोखला जाऊ शकतो. त्यासाठी शासनाने राज्य पातळीवर हवामान बदल किती झाला त्याचा अभ्यास करावा, कृती आराखडा आखून त्याची अंमलबजावणी करावी, असा उपाय सुचविण्यात आला आहे.पावसाचे दिवस वाढले तर दुष्काळी जिल्ह्यांना फायदाकार्बन उत्सर्जन व प्रदूषण असेच राहिले तर महाराष्ट्रातील राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाचे २ ते ८ दिवस वाढतील.वाशिम जिल्ह्यात सर्वाधिक ८, मुंबई उपनगरात ७, अहमदनगर, चंद्रपूर, गडचिरोली, जालना व सातारा जिल्ह्यात प्रत्येकी ६, अकाेला, बुलडाणा, नंदुरबार, उस्मानाबाद, पुणे, सांगली व वर्धा जिल्ह्यात प्रत्येकी ५ दिवस तर उर्वरित सर्व जिल्ह्यांमधध्ये २ ते ४ दिवस अशी ही वाढ राहील.प्रदूषणाला आळा घातला गेला तर मात्र यवतमाळ वगळता अन्य सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाचे २ ते ९ दिवस वाढतील.पश्चिम महाराष्ट्रात पावसाची सरासरी गाेंदियात किमान १ टक्का तर पुण्यात कमाल २९ टक्क्यांनी वाढेल. प्रदूषण वाढले तर मात्र गाेंदियाची सरासरी ३ तर पुण्याची ३४ टक्क्यांनी वाढेल.