शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

गुड न्यूज! सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाचे दिवस वाढतील; बॅड न्यूज! राज्याचं तापमान 2 अंशांनी वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2022 08:58 IST

तीस वर्षांच्या अभ्यासावरून पुढच्या तीस वर्षांचे अनुमान; हवामान बदल, तापमानवाढीचा फटका

- सचिन लुंगसे/निशांत वानखेडेमुंबई/नागपूर : हवामान बदल, जागतिक तापमानवाढीचा महाराष्ट्रावर काय परिणाम होईल? १९९० पासूनच्या अभ्यासावरून सेंटर फॉर सायन्स, टेक्नॉलॉजी ॲण्ड पॉलिसी या संशोधन संस्थेने अनुमान काढले आहे. यात राज्यातील तापमान पुढच्या तीस वर्षांत १ ते २ डिग्रीने वाढले. तर प्रदूषण असेच राहिले तर सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाचे दिवस वाढतील.इंटरगव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज (आयपीसीसी) साठी भारतीय हवामान खात्याच्या मदतीने या संस्थेने पश्चिम भारतातील राजस्थान, गुजरात, गोवा, महाराष्ट्राचा अभ्यास केला असून पावसाचे दिवस वाढल्याचा फायदा दुष्काळी जिल्ह्यांना होईल. अधिक पाऊस पडणाऱ्या जिल्ह्यांमध्ये मात्र अतिवृष्टीचे संकट येईल.प्रदूषण असेच वाढत राहिले तर २०५० पर्यंत सर्वाधिक तापमान वाढ अकोला २.५ , अमरावती २.९, औरंगाबाद २.९, भंडारा २.६ , बुलडाणा २.३, धुळे २.२, गोंदिया २.१, हिंगोली २.२, जळगाव २.५, जालना २.७, नागपूर २.२, नंदुरबार २.५, नाशिक २.४, वर्धा २.१, वाशिम २.३ डिग्रीने वाढेल.साधारण परिस्थितीत १ अंशापेक्षा अधिक तापमानवाढीचे जिल्हेभंडारा २.० । अकोला १.३ । अमरावती १.६ । औरंगाबाद १.१ । बीड १.२। बुलडाणा १.४ । धुळे १.१ । गोंदिया १.१ । हिंगोली १.२ । जळगाव १.३ । लातूर १.४ । नागपूर १.१ । नंदुरबार १.६ । उस्मानाबाद १.४ । वर्धा १.१ । वाशिम १.२ । यवतमाळ १.१प्रदूषणामुळे तापमानवाढीचा गंभीर धोकाप्रदूषणाला आळा घातला तर महाराष्ट्रात पुढील तीस वर्षांत साधारणपणे १ ते २ डिग्री अंश सेल्सिअस इतके तापमान वाढेल. परंतु, तो आळा घालण्यात अपयश आले तर मात्र अनेक जिल्ह्यांमध्ये त्यापेक्षा दुपटीने वाढ होईल. बहुतेक जिल्ह्यांमधील तापमान दोन ते तीन डिग्रीने वाढलेले असेल. या वाढीचे गंभीर परिणाम महापूर, शेती, वने, वन्यजीव, आरोग्य आणि विकास कामांवर होणार आहे. आज वाढलेले जागतिक तापमान कितीही प्रयत्न केला तरी पुन्हा पुढे १० वर्षे कमी होणार नाही. परंतु वृक्षारोपण करणे, जंगलाचे प्रमाण वाढविणे, लहान बंधारे, तळे इत्यादी जलसाठे वाढविणे, निसर्गपूरक जीवनशैली अंगीकारणे अशा अनेक प्रयत्नांनंतरच हवामान बदल रोखला जाऊ शकतो. त्यासाठी शासनाने राज्य पातळीवर हवामान बदल किती झाला त्याचा अभ्यास करावा, कृती आराखडा आखून त्याची अंमलबजावणी करावी, असा उपाय सुचविण्यात आला आहे.पावसाचे दिवस वाढले तर दुष्काळी जिल्ह्यांना फायदाकार्बन उत्सर्जन व प्रदूषण असेच राहिले तर महाराष्ट्रातील राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाचे २ ते ८ दिवस वाढतील.वाशिम जिल्ह्यात सर्वाधिक ८, मुंबई उपनगरात ७, अहमदनगर, चंद्रपूर, गडचिरोली, जालना व सातारा जिल्ह्यात प्रत्येकी ६, अकाेला, बुलडाणा, नंदुरबार, उस्मानाबाद, पुणे, सांगली व वर्धा जिल्ह्यात प्रत्येकी ५ दिवस तर उर्वरित सर्व जिल्ह्यांमधध्ये २ ते ४ दिवस अशी ही वाढ राहील.प्रदूषणाला आळा घातला गेला तर मात्र यवतमाळ वगळता अन्य सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाचे २ ते ९ दिवस वाढतील.पश्चिम महाराष्ट्रात पावसाची सरासरी गाेंदियात किमान १ टक्का तर पुण्यात कमाल २९ टक्क्यांनी वाढेल. प्रदूषण वाढले तर मात्र गाेंदियाची सरासरी ३ तर पुण्याची ३४ टक्क्यांनी वाढेल.