शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2025 12:41 IST

Maharashtra Lightning News: राज्यात पावसाचा जोर वाढू लागला असून शनिवारी वीज पडून ९ जणांचा मृत्यू झाला.

राज्यात पावसाचा जोर वाढू लागला असून शनिवारी वीज पडून ९ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील चौघांचा समावेश आहे. रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर येथे ढगफुटीसदृश पाऊस झाला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात  वीज पडून दोन सख्ख्या भावांसह चारजणांचा मृत्यू झाला असून  ७ जण भाजले आहेत.

यश राजू काकडे (वय १४), रोहित राजू काकडे (२१, रा. सारोळा), रंजना बापूराव शिंदे (५०, रा. मोंढा बु.) व शिवराज सतीश गव्हाणे (३१, रा. पिंपळदरी) अशी मयतांची नावे आहेत. परभणी जिल्ह्यातील पिंप्राळा येथे वीज पडून माणिक महादराव मिरासे (४७) यांचा मृत्यू झाला. धुळे जिल्ह्यातील ताजापुरी नथ्थू हरचंद सनेर (६३) तर जळगाव जिल्ह्यात मोहित जगतसिंग पाटील (२५, रा. खेडगाव नंदीचे ता. पाचोरा) व शांताराम शंकर कठोरे (४४, रा. पूर्णाड ता. मुक्ताईनगर) यांचा मृत्यू झाला.  तुरखेड (जि. अमरावती)येथील पवन  कोल्हे (२५) हा मरण पावला.

राजापुरात ढगफुटीसदृश पाऊसराजापूर (जि. रत्नागिरी) तालुक्यात शुक्रवारी रात्री काेसळलेल्या मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आला आहे. या पुराच्या पाण्याचा तालुक्यातील अनेक गावांना फटका बसला असून, तालुक्यातील प्रसिद्ध आडिवरे येथील श्रीदेवी महाकाली मंदिराच्या आवारात पुराचे पाणी शिरले हाेते. तब्बल ३७ वर्षांनंतर मंदिराच्या आवारात पुराचे पाणी शिरले हाेते. ठाणे, कल्याण, भिवंडी परिसरात सायंकाळी जोरदार पाऊस झाला.

रत्नागिरीला रेड अलर्ट; मुंबईला यलो अलर्टमुंबई : मान्सूनच्या प्रवासात प्रगती नसली तरी राज्याच्या बहुतांश भागात, विशेषत: मध्य महाराष्ट्र आणि कोकण पट्ट्यात काही ठिकाणी मात्र तो कोसळत आहे. पावसाचा हा ट्रेंड असाच सुरू राहणार आहे. त्यामुळे हवामान खात्याने रविवारी रत्नागिरीला तर सोमवारी सिंधुदुर्गासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे या जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तर कोकणातील उर्वरित जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट असून आणि मुंबईला येलो अलर्ट आहे. त्यामुळे मुंबई वगळता उर्वरित जिल्ह्यांत पावसाचा अंदाज कायम आहे.

४० वर्षांत प्रथमच जूनमध्येच भरले सीना धरणसीना नदीचे उगमस्थान तसेच प्रवाह परिसरात मे महिन्यातच वारंवार जोरदार पाऊस झाल्याने यंदा प्रथमच अहिल्यानगर जिल्ह्यातील निमगाव गांगर्डा येथील सीना धरण जूनमध्येच भरले असून सांडव्यातून पाणी वाहू लागले आहे.  गेल्या ४० वर्षांत प्रथमच मान्सूनच्या प्रारंभी जूनमध्येच धरण भरले आहे. सीना धरण भरले असल्याची अधिकृत माहिती तहसीलदार गुरू बिराजदार यांनी दिली. २.४० टीएमसी क्षमता असलेल्या सीना धरणातून दुपारी १२ वाजता २२० क्युसेक वेगाने नदी पात्रात विसर्ग सोडल्याची माहिती सीना धरणाचे सहायक अभियंता संभाजी पवार यांनी दिली. कर्जत तालुक्यातील २१ गावांना लाभदायी ठरणारे सीना धरण भरल्याने शेतकरी सुखावला आहे.   

टॅग्स :RainपाऊसMaharashtraमहाराष्ट्र