शहरं
Join us  
Trending Stories
1
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
2
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
3
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
4
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
5
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
6
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
7
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
8
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

राज्यभरात मुसळधार; कोल्हापूर, सांगली, साताऱ्यात अतिवृष्टी; दरडी कोसळल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2021 5:35 AM

जाेरदार काेसळणाऱ्या पावसामुळे राजापूर तालुक्यातील अर्जुना आणि कोदवली नद्यांना आलेल्या पुरामुळे शहर बाजारपेठेला पुराने वेढा दिला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या २४ तासात वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक १६१ मि.मी. पाऊस पडला आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कमुंबई :  कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांत अतिवृष्टी झाली असून, दरडी कोसळल्याने अनेक ठिकाणी वाहतूक विस्कळीत बनली.  पुढील तीन दिवस रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापुरात मुसळधार पाऊस कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात धो-धो पाऊस  सुरू आहे. यामुळे धरणांतील पाणीसाठा वेगाने वाढू लागला आहे. कोयना धरणाची पाणी पातळी दिवसभरात ३ टीएमसीने वाढली आहे. तापोळा-महाबळेश्वर रस्त्यासह अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या असून, त्याचा वाहतुकीवर परिणाम होत वाहतूक विस्कळीत झाली. मलकापूरमध्ये ढगफुटीसदृश पाऊस पडल्याने पुणे-बंगळुरू महामार्गावर पाणी आल्याने वाहतूक विस्कळीत झाली. सांगलीतही सर्वत्र धुवाधार पाऊस सुरू असून, इस्लामपूर, सांगलीत अतिवृष्टी झाली आहे. 

जाेरदार काेसळणाऱ्या पावसामुळे राजापूर तालुक्यातील अर्जुना आणि कोदवली नद्यांना आलेल्या पुरामुळे शहर बाजारपेठेला पुराने वेढा दिला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या २४ तासात वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक १६१ मि.मी. पाऊस पडला आहे.

मराठवड्यातील परभणीच्या सोनपेठ तालुक्यातील शेळगाव ते उक्कडगाव या रस्त्यावरील पुलावर पाणी आल्याने परिसरातील सात गावांचा संपर्क काही काळासाठी तुटला होता. औरंगाबाद शहरासह जिल्ह्यातही तुरळक पाऊस पडला. जोरदार पावसाने रायघोळ आणि पूर्णा नदीला पूर आला होता. विदर्भातील यवतमाळ, वर्धा, भंडारा, चंद्रपूर आणि बुलडाणा जिल्ह्यात गुरुवारी दमदार पावसाने हजेरी लावली. यवतमाळ तालुक्यातील अकोला बाजार येथे अडाण नदीच्या पुरात वाहून गेल्याने देवराव प्रल्हाद मेश्राम (६२) यांचा मृत्यू झाला.

टॅग्स :Rainपाऊस