शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

Maharashtra Election 2019 : पावसामुळे उमेदवारांच्या छुप्या भेटींवर मर्यादा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2019 12:14 IST

पावसामुळे नियोजनात असलेल्या मतदारांपर्यंत पोहोचणे उमेदवारांना कठिण झाले आहे. अशा मतदारांना न भेटता निवडणुकीला सामोरे जाताना उमेदवारांच्या मनातील धाकधुक वाढत आहे. एकंदरीत पावसामुळे उमेदवारांची धाकधूक वाढली आहे.

मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा शनिवारी सायंकाळी थंडावल्या. त्याचवेळी राज्यभरात पावसांने जोर धरला आहे. उद्या मतदान असून मतदानावर देखील पावसाचे सावट आहे. त्यामुळे मतांच्या टक्केवारीत घट येण्याची शक्यता आहे. आपल्या मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी उमेदवारांना कष्ट घ्यावे लागणार आहे. तर पावसामुळे उमेदवारांच्या छुप्या भेटीगाठींवर मर्यादा आल्या आहेत.

शनिवारी सकाळपासूनच महाराष्ट्रात पावसाने जोर धरला आहे. तर अनेक ठिकाणी शुक्रवारी देखील मुसळधार पाऊस झाला. शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी साताऱ्यात मुसळधार पाऊस सुरू असताना केलेली सभा चर्चाचा विषय ठरली होती. त्यानंतर अनेक नेत्यांनी पावसाची तमा न बाळगता सभा घेतल्या.

दरम्यान पाऊस रविवारीही सुरू असल्याने अनेक नेत्यांचे नियोजन बिघडले आहे. प्रचार थंडावल्यानंतर छुप्या गावभेटी घेऊन मतदारांनी आपल्याला मतदान करण्याचे आवाहन करण्याचे नियोजन नेत्यांनी केले होते. त्यासाठी कार्यक्रमही ठरला होता. परंतु, पावसामुळे या भेटींवर मर्यादा आल्या आहेत.

ग्रामीण भागात एखाद्या ठिकाणी छोटेखाणी बैठकींचे आयोजन करण्यात येते. यामध्ये नेते मतदारांना मतदानाचे आवाहन करत असतात. परंतु, पावसामुळे नियोजनात असलेल्या मतदारांपर्यंत पोहोचणे उमेदवारांना कठिण झाले आहे. अशा मतदारांना  न भेटता निवडणुकीला सामोरे जाणे उमेदवारांच्या मनातील धाकधुक वाढवणारी बाब आहे. एकंदरीत पावसामुळे उमेदवारांची धाकधूक वाढली आहे.