शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

मुंबईतील लोकल ट्रेन पुन्हा बंद होणार का? रेल्वे अधिकाऱ्यांनी केले स्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2021 12:35 IST

राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील विविध यंत्रणांमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर मुंबईची लाइफलाइन असणाऱ्या लोकल ट्रेनला (Mumbai Local Train) पुन्हा ब्रेक लागण्याची चर्चा सुरू झाली आहे. तसेच लोकल ट्रेन सुरू झाल्यामुळे मुंबईत कोरोनाचा प्रभाव पुन्हा वाढू लागल्याची एक शक्यता बोलून दाखवण्यात येत आहे

ठळक मुद्देकोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लोकल ट्रेन संदर्भात चर्चारेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिले स्पष्टीकरणरेल्वे आणि महापालिकेकडून संयुक्तरित्या जगजागृती

मुंबई : राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील विविध यंत्रणांमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर मुंबईची लाइफलाइन असणाऱ्या लोकल ट्रेनला (Mumbai Local Train) पुन्हा ब्रेक लागण्याची चर्चा सुरू झाली आहे. तसेच लोकल ट्रेन सुरू झाल्यामुळे मुंबईत कोरोनाचा प्रभाव पुन्हा वाढू लागल्याची एक शक्यता बोलून दाखवण्यात येत आहे. (railway clarify on will the local train in mumbai to be closed again)

सध्या सर्व प्रवाशांना सकाळच्या पहिल्या लोकलपासून सकाळी ७ वाजेपर्यंत तसेच दुपारी १२ पासून दुपारी ४ पर्यंत आणि रात्री ९ पासून शेवटच्या लोकलपर्यंत प्रवास करता येतो. सर्वसामान्य प्रवाशांना सकाळी ७ ते दुपारी १२ व दुपारी ४ ते रात्री ९ या कालावधीत उपनगरीय रेल्वे सेवांत प्रवास करता येत नाही. गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने पुन्हा मुंबईची लाइफलाइन बंद होणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे. मुंबईत १ फेब्रुवारीपासून सर्वसामान्य प्रवाशांना निर्धारित वेळेत प्रवास करण्याची मुभा देण्यात आली असून, दिवसाला ४० लाखाहून अधिक प्रवाशी लोकलचा प्रवास करतात. यावर रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. 

राज्यात दिवसभरात काेराेनाचे ६,२१८ रुग्ण; रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.९६ टक्क्यांवर

काय म्हणतात रेल्वेचे अधिकारी?

सामान्य नागरिकांना मर्यादित वेळेत लोकल ट्रेनने प्रवास करण्याची मुभा देण्यात आल्यानंतर साहजिकच लोकल ट्रेनमधील गर्दी वाढली. मुंबईतील लोकल ट्रेन पुन्हा बंद होणार का या प्रश्नावर पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, पश्चिम रेल्वेकडून कोरोना रोखण्यासाठी सर्व उपाय योजनांचे काटेकोरपणे पालन केले जात आहे. आम्ही पुन्हा एकदा ट्रेन सॅनिटाइज करायला सुरुवात केली आहे. प्रवाशांची गर्दी होऊ नये, यासाठी ३०० तिकीट खिडक्या सुरू करण्यात आल्या आहेत. आताच्या घडीला पश्चिम रेल्वेवर दिवसाला १३०० फेऱ्या चालवल्या जात आहेत. राज्य सरकारच्या सर्व निर्देशांचे पालन केले जात असल्याचे पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. 

संयुक्तरित्या जनजागृती

प्रवाशांनी मास्क घालावा, यासाठी रेल्वे आणि महापालिकेकडून संयुक्तरित्या जगजागृती आणि कारवाई सुरू आहे. तसेच रेल्वेने अवैधपणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्याची मोहीम उघडली आहे, अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य प्रवक्ते शिवाजी सुतार यांनी लोकमत ऑनलाईनशी बोलताना दिली आहे.

दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयातील कार्यालयीन वेळ दोन शिफ्ट्समध्ये कशा रीतीने बसवता येतील तसेच वर्क फ्रॉम होमच्या माध्यमातून किती विभागांना पूर्ण क्षमतेने काम करता येईल याचे तात्काळ नियोजन करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्य सचिवांना दिल्या.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसlocalलोकलrailwayरेल्वेRailway Passengerरेल्वे प्रवासी