शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
3
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
4
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
5
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
6
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
7
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
8
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
9
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
10
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
11
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
12
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
13
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
14
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
15
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
16
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
17
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
18
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...
19
Smartphones: २४ जीबी रॅम, ७५०० mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; जबरदस्त फोन लॉन्च!
20
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले

"राहुल गांधी पूर्वजांची पापं लपवण्यासाठी सावरकरांसंदर्भात वक्तव्य करत आहेत," रणजित सावरकर यांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2024 18:10 IST

"राहुल गांधी यांनी हीच विधाने सार्वजनिक मंचावर करावीत, म्हणजे, त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करता येईल."

राहुल गांधी आपल्या पूर्वजांची पापं लपवण्यासाठी सावरकरांसंदर्भात वक्तव्ये करत आहेत आणि मुस्लिम व्होट बँकेचे राजकारण करत आहेत. राहुल गांधी यांनी संसदेत केलेले वक्तव्य हे खोटे आणि दिशाभूल करणारे आहे, असे म्हणत स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे नातू रणजीत सावरकर यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर थेट हल्ला चढवला आहे. ते पत्रकारांसोबत बोलत होते.

रणजीत सावरकर राहुल गांधी यांना आव्हान देत म्हटले, "राहुल गांधी यांनी हीच विधाने सार्वजनिक मंचावर करावीत, म्हणजे, त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करता येईल. राहुल गांधी यांनी जो कागद वाचला, तो त्यांना कोणत्या गटारात सापडला, माहीत नाही. त्यांच्या पूर्वजांची, प्रामुख्याने नेहरू यांनी जी पापं केली आहेत, ती लपवण्यासाठी अशी विधाने केली जात आहेत."

रणजित सावरकर पुढे म्हणाले, "वीर सावरकरांचा संविधान आणि लोकशाहीवर पूर्ण विश्वास होता. त्यांनी 1945 मध्ये एक मसुदा तयार केला होता. त्यात कोणताही भेदभाव न करता देश चालवला जावा, असे म्हणण्यात आले होते. यात धर्म ही खाजगी बाब मानून लोकांना आपापल्या घरात धर्माचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले होते." एवढेच नाही, तर गांधी आणि नेहरूंवर हल्ला करत रणजित सावरकर म्हणाले की, ते संविधानविरोधी होते आणि काँग्रेस हा सर्वात घटनाविरोधी पक्ष आहे.

...म्हणून उद्धव ठाकरे यांचे राजकीय पतन -यावेळी रणजित सावरकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेवरही निशाणा साधला. ते म्हणाले, उद्धव ठाकरे यांचा पक्ष सावरकरांच्या विचारांपासून दूर जात आहे. पूर्वी सावरकरांचे समर्थन करणारे शिवसेनेचे खासदार आता गायब झाले आहेत. एवढेच नाही तर, पक्षाने बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडल्यानेच उद्धव ठाकरे यांचे राजकीय पतन झाल्याचेही ते म्हणाले.

संसदेत सावरकरांसंदर्भात काय म्हणाले होते राहुल? -संसदेत संविधानावरील चर्चेदरम्यान राहुल गांधी यांनी केंद्र सरकारबरोबरच स्वातंत्र्यवीर सावरकरांवरही निशाणा साधला. सावरकरांना माफी वीर म्हणत ते म्हणाले, "सावरकर इंग्रजांशी तडजोड करून माफी मागणारे होते. सावरकर मनुस्मृती मानत होते. जे संविधानाच्या विरोधात आहे. इंदिरा गांधींचा उल्लेख करत ते म्हणाले, सावरकरांनी संविधानात भारतीयत्व बघितले नाही." त्यांच्या या विधानावर सभागृहात गदारोळ झाला. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीVinayak Damodar Savarkarविनायक दामोदर सावरकरParliamentसंसदcongressकाँग्रेसBJPभाजपा