शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
3
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
4
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
5
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
6
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
7
मुंबई इंडियन्सच्या संघात अंशुल कंबोजची एन्ट्री! टॉस जिंकून २३ वर्षीय ऑल राऊंडरला दिली संधी, जाणून घ्या कोण आहे तो
8
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
9
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
10
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
11
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
12
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
13
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
14
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
15
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
16
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
17
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
18
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
19
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
20
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  

पक्षी स्थलांतराचे कोडे अद्याप न उलगडलेले!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2019 2:36 AM

मागोवा घेण्याचे काम सुरू; ‘पाणथळ जागा व स्थलांतरित पक्षी’ यावर आंतरराष्ट्रीय परिषद

लोणावळा : पक्ष्यांचे स्थलांतर अद्यापही न उलगडलेले कोडे आहे, असे मत बर्ड लाइफ इंटरनॅशनलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पँट्रीशिया झुरीटा यांनी व्यक्त केले. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीतर्फे लोणावळा येथे १८ ते २२ नोव्हेंबर दरम्यान ‘पाणथळ जागा व स्थलांतरित पक्षी’ या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी दुपारी या परिषदेचे उद्घाटन झुरीटा यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. या वेळी त्या बोलत होत्या. पक्ष्यांच्या जीवनातील स्थलांतर हा अत्यंत अविभाज्य भाग असून, पक्ष्यांच्या स्थलातराच्या प्रश्नांचा मागोवा घेण्याचे काम जगभरात सुरू झाले आहे, असेही त्या म्हणाल्या.आंतरराष्ट्रीय परिषदेच्या मंचावर बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे अध्यक्ष होमी खुसरोखान, संचालक डॉ. दीपक आपटे उपस्थित होते. या परिषदेला केंद्रीय पर्यावरण व वन मंत्रालय, राज्य शासन व मन्ग्रोव्ह फाउंडेशन यांचे सहकार्य मिळाले आहे.पँट्रीशिया झुरीटा या वेळी म्हणाल्या, पक्ष्यांच्या जीवनातील स्थलांतर हा अत्यंत अविभाज्य भाग आहे. याबाबतचे तंत्रज्ञान प्रगत झाले आहे. पक्ष्यांंचे उड्डाणमार्ग समजू लागले आहेत. पण आर्क्टिक टर्नसारखा शंभर ग्रॅम वजनाचा पक्षी १९ हजार मैलांचे अंतर पार करतो तेव्हा थक्क होण्यास होते. हे तो कसे करतो, कशासाठी करतो यासह अनेक प्रश्नांचा मागोवा घेण्याचे काम जगभरात सुरू आहे. समृद्ध पाणथळीबाबत बोलताना त्या म्हटल्या की, या जागा संपन्न पर्यावरणाचे द्योतक आहे.डॉ. दीपक आपटे म्हणाले, पक्षी स्थलांतर अभ्यासाची बीएनएचएसला नऊ दशकांची परंपरा आहे. या विषयावर दीर्घ संशोधन सुरू आहे. या विषयाचे महत्त्व सरकारी पातळीवर नेऊन पाणथळ जागांचे संवर्धन करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आज देशातील एकोणीस राज्यांतील पाणथळींचा अभ्यास सुरू असून त्यासाठी राष्ट्रीय कृती आराखड्याची स्थापना झाली आहे. दरम्यान, होमी खुसरोखान यांनी बीएनएचएसच्या वाटचालीचा आढावा घेतला. या पाच दिवसांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी ४५ राष्ट्रीय व २८ आंतरराष्ट्रीय वक्ते उपस्थित आहेत. याशिवाय अनेक पक्षी अभ्यासकही येथे उपस्थित आहेत.पाणथळी जागा अमूल्य असे वरदान!नेदरलँड्स येथील वेटलँड इंटरनॅशनलचे वरिष्ठ तांत्रिक अधिकारी आणि पक्षी अभ्यासक डॉक्टर तेज मुंडकुर म्हणाले, समृद्ध पाणथळी जागा या स्थलांतरित पक्ष्यांसाठी अमूल्य, असे वरदान आहे. जगभरातील पाणथळी जागा बिकट अवस्थेत आहेत. सांडपाणी, पाणीप्रदूषण, वेगाने होणारे शहरीकरण, धरणे, हवामान बदलासह अनेक बाबींमुळे ही बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे.या सर्वांचा फटका स्थलांतरित पक्ष्यांना बसत आहे. गेल्या काही वर्षांतील अभ्यासातून ही बाब पुढे आली आहे. लोकसंख्या वाढ, पक्ष्यांच्या अभ्यासाबाबत अनास्था, स्थलांतराबाबत अपुरी माहिती, दोन देशांत या विषयाबाबत समन्वय नसणे, अपुरी साधनसामग्री यावरही त्यांनी विवेचन केले.