राज्यातील 1,054 गावांत मिळणार शुद्ध पाणी

By Admin | Updated: July 20, 2014 00:41 IST2014-07-20T00:41:53+5:302014-07-20T00:41:53+5:30

राज्यातील दूषित पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आह़े पाणीपुरवठा विभागाने केलेल्या एका पाहणीत कोरडय़ा दुष्काळाने होरपळणा:या महाराष्ट्रातील अनेक गावांतील पाणी नमुने दूषित आढळले आहेत़

Pure water will be available in 1,054 villages in the state | राज्यातील 1,054 गावांत मिळणार शुद्ध पाणी

राज्यातील 1,054 गावांत मिळणार शुद्ध पाणी

नारायण जाधव - ठाणो
राज्यातील दूषित पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आह़े पाणीपुरवठा विभागाने केलेल्या एका पाहणीत कोरडय़ा दुष्काळाने होरपळणा:या महाराष्ट्रातील अनेक गावांतील पाणी नमुने दूषित आढळले आहेत़ यामुळे पाणीपुरवठा विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या बैठकीत राज्यातील दूषित पाण्याने बाधित असलेल्या 1क्54 गावांसह वाडय़ा-वस्त्यांच्या ठिकाणी पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे, याकरिता पाणी शुद्धीकरण यंत्रणा बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आह़े यानुसार, राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत चालू वर्षात पहिल्या टप्प्यात 499 गावे/वाडय़ा-वस्त्यांत ही पाणी शुद्धीकरण यंत्रणा बसवण्यात येणार आह़े
ठाणो जिल्ह्यातून घेतलेल्या 3,966 पाणी नमुन्यांपैकी तब्बल 228 ठिकाणचे पाणी दूषित आढळले आहे राजधानी मुंबईची तहान भागवणा:या धरणांचा जिल्हा म्हणून परिचित असलेल्या ठाणो जिल्ह्यातील पाणी नमुन्यांची ही अवस्था असेल तर मग राज्यातील इतर ग्रामीण भागांतील पाणीप्रश्न किती गंभीर असेल, याचा अंदाज येतो़
दूषित पाण्याने बाधित गावांत शुद्धीकरण यंत्रणा बसवण्यासाठी शासनाने संचालक, पाणी व स्वच्छता सहायक संस्था, बेलापूर, नवी मुंबई यांची नियुक्ती केली असून त्यांच्याच अध्यक्षतेखाली निविदा प्रक्रिया करण्यासाठी सात सदस्यीय तांत्रिक समितीसुद्धा गठीत करण्यात आली आह़े  
 
4गावांची निवड राज्यातील त्या-त्या जिल्ह्यातील जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी करणार आहेत़ ज्या संस्थेची ही शुद्धीकरण यंत्रणा बसवण्यासाठी निवड केली जाणार आहे, त्यांनीच पुढची सात वर्षे तिची देखभाल व दुरुस्तीचा खर्च करण्याची अट घालण्यात येणार आह़े यानंतर जनतेला परवडेल, अशा दराने शुद्ध पाण्याचा पुरवठा होऊ शकेल.
 
4नैसर्गिक, भौगोलिक परिस्थिती, लोकसंख्या विचारात घेऊन योग्य पाणी शुद्धीकरण यंत्रणोची निवड करावयाची आह़े ही यंत्रणा बसवताना त्यांच्या क्षमता परिस्थितीनुरूप 5क्क् ते 4क्क्क् एलपीएच अर्थात लीटर पर अवर असायला हवी, अशा अटी घालण्यात आल्या आहेत़ 

 

Web Title: Pure water will be available in 1,054 villages in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.