शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

जगण्यायोग्य शहरांच्या यादीत पुणे अव्वल; बघा मुंबई, ठाण्याचा कितवा नंबर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2018 17:34 IST

केंद्रीय गृहनिर्माण आणि नगरविकास खात्याकडून यादी जाहीर

मुंबई: देशातील जगण्यायोग्य शहरांच्या यादीत पुण्यानं अव्वल क्रमांक पटकावला आहे. तर या यादीत देशाची आर्थिक राजधानी मुंबई तिसऱ्या स्थानी आहे. जगण्यालायक शहरांच्या यादीत नवी मुंबईनं दुसरं स्थान मिळवलं आहे. जगण्याच्या दृष्टीनं सर्वात योग्य असणारी देशातील पहिली तीन शहरं महाराष्ट्रातील आहेत. केंद्रीय गृहनिर्माण आणि नगरविकास खात्यानं ही यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीत देशाची राजधानी दिल्ली 65 व्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रातील तब्बल चार शहरांचा समावेश जगण्यायोग्य असलेल्या देशातील पहिल्या दहा शहरांमध्ये झाला आहे. पुणे, नवी मुंबई आणि मुंबईनं पहिले तीन क्रमांक पटकावल्यावर या यादीत ठाण्यानं सहावा क्रमांक मिळवला आहे. मात्र उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, तमिळनाडू आणि कोलकात्यामधील एकाही शहराला पहिल्या दहा शहरांमध्ये स्थान मिळालेलं नाही. विशेष म्हणजे विधानसभा निवडणूक होऊ घातलेल्या मध्य प्रदेश आणि छत्तीसगढच्या राजधान्यांचा समावेशदेखील पहिल्या दहा शहरांच्या यादीत आहे. छत्तीसगडची राजधानी रायपूर या यादीत सातव्या, तर मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ दहाव्या क्रमांकावर आहे. मध्य प्रदेशमधील इंदूरला जगण्यायोग्य शहरांच्या यादीत आठवं स्थान मिळालं आहे. केंद्रशासित प्रदेशांचा विचार केल्यास केवळ चंदिगडला पहिल्या दहा शहरांमध्ये स्थान मिळवण्यात यश आलं आहे. चंदिगडला पाचवा क्रमांक मिळाला आहे. आंध्र प्रदेशातील तिरुपती आणि विजयवाडा ही शहरंदेखील पहिल्या दहांमध्ये आहेत. त्यांना अनुक्रमे चौथा आणि नववा क्रमांक मिळवण्यात यश आलं आहे. देशातील शहरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांचं जीवनमान सुधारावं, यासाठी केंद्रीय गृहनिर्माण आणि नगरविकास खात्याकडून जगण्यायोग्य शहरांची यादी प्रसिद्ध केली जाते. शहरातील संस्था, प्रशासन, मूलभूत सुविधांचा दर्जा लक्षात घेऊन जगण्यायोग्य शहरांची यादी तयार केली जाते.  

टॅग्स :PuneपुणेMumbaiमुंबईNavi Mumbaiनवी मुंबई