शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
4
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
5
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
6
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
7
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
8
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
9
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
10
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
11
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
12
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
13
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
14
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
15
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
16
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
17
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
18
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
19
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
20
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
Daily Top 2Weekly Top 5

लोकसेवकांची चौकशी संमतीशिवाय नाही!

By admin | Updated: June 10, 2015 01:41 IST

ग्रामपंचायतींचे सरपंच ते मुख्यमंत्र्यांपर्यंतचे लोकनियुक्त पदाधिकारी, सरकारी कर्मचारी आणि अधिकारी यांच्या चौकशीपूर्वी सक्षम प्राधिकाऱ्याची संमती आता घ्यावी लागणार आहे.

मुंबई : ग्रामपंचायतींचे सरपंच ते मुख्यमंत्र्यांपर्यंतचे लोकनियुक्त पदाधिकारी, सरकारी कर्मचारी आणि अधिकारी यांच्या चौकशीपूर्वी सक्षम प्राधिकाऱ्याची संमती आता घ्यावी लागणार आहे. त्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १५६(अ)मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारच्या बैठकीत घेण्यात आला. यापूर्वी कोणत्याही लोकसेवकाविरुद्ध न्यायालयात तक्रार दाखल झाल्यानंतर फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३च्या १५६(३) व कलम १९०नुसार दंडाधिकारी हे संबंधित लोकसेवकाच्या चौकशीचे थेट आदेश देऊ शकत असत. अशा आदेशानंतर पोलिसांकडून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येत असे. प्रामाणिक लोकसेवकांना त्याचा मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागल्याचीही उदाहरणे होती. सर्वोच्च न्यायालयाने अनिलकुमार विरुद्ध एम.के. अयप्पा या प्रकरणातील सुनावणीत कलम १५६(३) व कलम १९०मध्ये सुधारणा करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार मंत्रिमंडळाने आज निर्णय घेतला. आता लोकसेवकाच्या व्याख्येत मोडणाऱ्या प्रत्येक पदाच्या चौकशीस संमती देणारे सक्षम प्राधिकारी (कॉम्पिटंट अ‍ॅथॉरिटी) कोण असतील, हे राज्य सरकार निश्चित करेल. त्यासंबंधीचे विधेयक येत्या पावसाळी अधिवेशनात विधिमंडळात मांडण्यात येणार आहे. त्याला विधिमंडळाने मान्यता दिली तर ते अंतिम मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठविले जाणार आहे. लोकसेवक कर्तव्यावर असताना काही गुन्हा घडला असेल तर त्याच्या चौकशीसाठी सक्षम प्राधिकाऱ्याची संमती घ्यावी, अशी तरतूद कलम १९७मध्ये आधीपासूनच होती. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार त्याची अंमलबजावणी करावी लागणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. आजच्या निर्णयाने काही शंकांना वाव मिळाला आहे. सक्षम प्राधिकाऱ्याला संमतीचे अधिकार हे चौकशी टाळण्यासाठी वा मुद्दाम चौकशी लावण्यासाठी वापरले जाणार नाहीत ना, अशी शंका आहे. चौकशी टाळण्यासाठी वा ती करण्यासाठी सत्तापक्षाकडून दबावही येऊ शकतो. राजपत्रित अधिकारी महासंघाने आजच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. ऊठसूट चौकशी लावण्यास या निर्णयाने चाप बसेल, असे महासंघाचे नेते ग.दि. कुलथे म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)राज्यपालांचे अधिकार कायममंत्री, आमदारांच्या चौकशीला संमती देण्याचे अधिकार राज्यपालांना आहेत. नवीन व्यवस्थेत या दोघांबाबत सक्षम प्राधिकारी तेच असतील, असेही सूत्रांनी स्पष्ट केले.