शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
3
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
4
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
5
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
6
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
7
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
8
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
9
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
10
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
11
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
12
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
13
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
14
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
15
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
16
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
17
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
18
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
19
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
20
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...

'श्रमिक एक्सप्रेस' ची प्रक्रिया एवढी सोपी असते का ? एक रेल्वेगाडी सोडण्यापाठीमागे असतो कितीतरी मोठा व्याप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2020 16:07 IST

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्यात व त्यांच्या समर्थकांमध्ये सध्या श्रमिक रेल्वेमुळे ट्विटर युद्ध सुरु आहे.

ठळक मुद्देमोठी यंत्रणा असते राबत : पुणे शहरातून ३२ रेल्वे उत्तर प्रदेश, बिहारला रवाना

पुणे : संपूर्ण देश अचानक लॉकडाऊन केल्याने देशभरातील मोठ्या शहरांमध्ये लाखो कामगार व अन्य नागरिक अडकून पडले़ लॉकडाऊनला ५० दिवस झाल्यानंतर राज्यांनी एकमेकांशी ठरवून या कामगारांसाठी विशेष श्रमिक एक्सप्रेस सुरु करण्याची परवानगी केंद्र सरकारने दिली. केवळ पुणे शहरातून आतापर्यंत तब्बल ३२ रेल्वे गाड्या उत्तर प्रदेश, बिहारला रवाना झाल्या आहेत. एका रेल्वेगाडीतून जवळपास १४०० प्रवासी जात असतात. पुणे विभागांचे रेल्वे  व्यवस्थापक यांना प्रवाशांची यादी दिल्यानंतर ती मंजूर केली जाते व प्रवासी त्या गाडीत बसून आपल्या गावाला रवाना होतात. मात्र, हे करताना अगोदर एक मोठी प्रक्रिया करावी लागते.  

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्यामध्ये व त्यांच्या समर्थकांमध्ये सध्या श्रमिक रेल्वेमुळे ट्विटर युद्ध सुरु आहे. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एक रेल्वेगाडी सोडण्यासाठी किती मोठा व्याप करावा लागतो, याची कल्पना अनेकांना नसते.पुणे शहराचे समन्वयक पोलीस उपायुक्त सारंग आवाड यांनी ही सर्व प्रक्रिया किती किचकट आणि प्रचंड मनुष्यबळाची गरज असलेली कशी आहे हे नेमक्या शब्दात सांगितले. गेल्या १५ दिवसांपासून शहरातील सर्व पोलीस ठाण्यात परप्रांतियांना त्यांच्या गावी जाण्यासाठी यादी करण्यास सुरुवात केली. प्रत्येक व्यक्तीने पोलीस ठाण्यात येण्याऐवजी त्यांनी १५ ते २० जणांचा ग्रुप करुन त्या गटप्रमुखामार्फत सर्वांनी फार्म भरुन घेतले जातात.त्यानंतर त्यांची राज्य व जिल्ह्यानुसार वर्गवारी करुन ते पोलीस उपायुक्तांकडे पाठविले जातात. शहरातील सर्व उपायुक्तांकडे आलेल्या प्रवाशांची यादी एकत्रित केली जाते. त्यानुसार एका राज्यातील विशिष्टभागात जाणारे १४०० प्रवाशांची संख्या झाल्यावर त्यांनी एक स्वतंत्र यादी बनविली जाते. ही यादी संबंधित राज्याच्या नोडल अधिकार्‍यांना पाठविले जाते व त्या प्रवाशांना त्यांच्या राज्यात परत येण्याची परवानगी मागितली जाते. त्याच बरोबर ही प्रवाशांची एक यादी स्थानिक रेल्वे अधिकार्‍यांना पाठवून त्यांच्याकडे रेल्वेची मागणी केली जाते. संबंधित राज्याने परवानगी दिल्यानंतर रेल्वेला काही वेळा प्रवासी तारीख कळविले जाते. त्यानंतर रेल्वेकडून विशेष गाडी मंजूर झाल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील नोडल अधिकारी त्यासाठी लागणारे आवश्यक निधी रेल्वेकडे जमा करतात. त्यानंतर रेल्वे त्यांचे तिकीट इश्यू करण्यास परवानगी देते. हे सर्व झाल्यावर पोलिसांकडून प्रत्येक प्रवाशांना टोकन दिले जाते. त्यानंतर प्रत्यक्ष रेल्वेगाडी कधी सुटणार याची माहिती आधल्या दिवशी कळविले जाते. त्यामुळे या सर्व १४०० प्रवाशांना रेल्वे स्टेशनलाआणण्यासाठी शहरात काही ठिकाणे निश्चित केले जातात. तेथे गाडी सुटण्याच्या चार तास आधी प्रवाशांना बोलविण्यात येते. पीएमपीच्या साधारण ७० बस गाड्यामधून त्यांना स्थानिक पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी घेऊन रेल्वे स्टेशनला येतात. रेल्वे स्टेशनवर रेल्वे कर्मचार्‍यांच्या मदतीने सर्वांकडून टोकन घेऊन त्यांना तिकीट देतात. त्यानंतर सर्व प्रवासीत्यांच्या गावाला रवाना होतात. त्यानंतर पुन्हा गाडी पुण्यातून रवाना झाली असून त्यातून या जिल्ह्यातील इतके प्रवासी प्रवास करीत असल्याची माहिती संबंधित राज्याच्या नोडल अधिकार्‍याला दिली जाते.

पुणे शहरातून जाणार्‍या प्रत्येक परप्रांतीय प्रवाशांना २ पाण्याच्या बाटल्या, फुड पॅकेट, गुळची ढेप, एक बाटली दुध दिले जाते. सर्व ठिकाणी फिजिकल डिस्टन्सिंग पाळून हे सर्व करण्यात पोलिसांचे मोठे मनुष्यबळ त्याकामी लावावे लागते.रेल्वेच्या स्थानिक अधिकार्‍यांना सर्व प्रथम यादी दिल्याशिवाय विशेष श्रमिक एक्सप्रेसचे प्रक्रियाच सुरु होऊ शकत नाही. ही मोठी प्रक्रियअसते. यादी दिल्यानंतर रेल्वेला त्या मार्गावरील सर्व विभागांना त्याचीमाहिती द्यावी लागते व त्यानंतर तिचा मार्ग, त्यावेळची मार्गावरील उपलब्धतता ठरवून मग गाडीची तारीख, वेळ निश्चित केली जाते. त्यामुळे अनेकदा रेल्वे आदल्या दिवशी गाडी कधी सुटणार हे सांगते.

टॅग्स :PuneपुणेMigrationस्थलांतरणrailwayरेल्वेState Governmentराज्य सरकारCentral Governmentकेंद्र सरकारCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसUddhav Thackerayउद्धव ठाकरेpiyush goyalपीयुष गोयल