शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

लोकहितासाठी राबविली कंत्राट प्रक्रिया; ‘महाजनको’ची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2019 4:23 AM

वाहतुकीचे कंत्राट देताना राबविण्यात आलेल्या प्रक्रियेत कुठलाही गैरप्रकार झालेला नसून लोकहित डोळ््यासमोर ठेवूनच हे पाऊल उचलण्यात आल्याची भूमिका ‘महाजनको’तर्फे मांडण्यात आली आहे.

नागपूर : वाहतुकीचे कंत्राट देताना राबविण्यात आलेल्या प्रक्रियेत कुठलाही गैरप्रकार झालेला नसून लोकहित डोळ््यासमोर ठेवूनच हे पाऊल उचलण्यात आल्याची भूमिका ‘महाजनको’तर्फे मांडण्यात आली आहे. ‘महाजनकोने ‘टेंडर’विनाच दिली वाहतुकीची कंत्राटे’ ही बातमी ‘लोकमत’ने ३० जानेवारी २०१९ रोजी प्रकाशित केली होती. यासंदर्भात ‘महाजनको’ने आपली बाजू स्पष्ट केली आहे. तांत्रिक अडचण असल्याने मुख्यालयाच्या परवानगीनंतरच निविदा प्रक्रिया न राबविता वाहतुकीची कंत्राटे देण्यात आली, असे स्पष्ट करण्यात आले आहे.‘ई-टेंडरिंग’ची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच एप्रिल २०१८ मध्ये वाहतुकीचे पहिले कंत्राट देण्यात आले, असे ‘महाजनको’ने स्पष्टीकरण दिले आहे. कोळसा सहायक कंपनी मार्च २०१९ पर्यंत पाच लाख टन कोळशाचा पुरवठा करण्यासाठी तयार असल्याचे ‘वेकोलि’ने नोव्हेंबर २०१८ मध्ये कळविले होते. ‘ई-टेंडरिंग’च्या प्रक्रियेला ९० ते १०० दिवस लागत असल्याने मार्च २०१९ पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करणे शक्य नव्हते. त्यामुळे ‘महाजनको’ने एप्रिल २०१८ ला प्राप्त झालेल्या सर्वात कमी दर ४.४० रुपये प्रति टन प्रति किमीला प्राधान्य दिले व त्यांनाच वाहतुकीचे कंत्राट देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार निविदा प्रक्रिया न राबविता कंत्राट देण्यात आले. ही प्रक्रिया ‘महाजनको’चे मुख्यालयाची परवानगी तसेच वाहतूक करणाऱ्या कंत्राटदरांच्या संमतीनंतरच पूर्ण करण्यात आली. ‘महाजनको’चा प्रकल्प बंद होऊ नये व लोकहित लक्षात घेऊन प्रायोगिक तत्त्वावर ही प्रक्रिया राबवली, असे ‘महाजनको’ने स्पष्टीकरणात नमूद केले आहे.