शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

पृथ्वीराज चव्हाण,अजित पवारांच्या नाराजीमुळे मंत्रिमंडळ विस्तार लांबला: निलेश राणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2019 15:04 IST

यावेळी त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सुद्धा निशाणा साधला.

मुंबई: विधानसभेचे हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर मंत्रीमंडळ विस्तार आणि शपथविधी डिसेंबर महिन्याच्या अखेरीस होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र मंत्रिमंडळ विस्तार हे महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षातील नेत्यांच्या नाराजीमुळे लांबल्याचा दावा भाजपचे नेते निलेश राणे यांनी केला आहे.

राज्यातील महाविकास आघाडीचे मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर 30 डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचा दावा सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी केला आहे. मात्र यापुढेही मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख पुढे गेली, तर नवल वाटायला नको, कारण तीन पक्षाच्या सरकारमध्ये अंतर्गत अनेक वाद आहेत, बाहेरुन काही दिसलं तरी अनेक विषयांवर वाद असल्याने महाविकास आघाडीची खरी परिस्थिती लवकरच कळेल, असा दावा निलेश राणेंनी केला आहे.

तर पुढे बोलताना ते म्हणाले की, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह तिन्ही पक्षातील अनेक प्रमुख नेते नाराज आहेत, त्यामुळेच मंत्रिमंडळ विस्तार लांबला आहे. सत्ताधारी पक्षातील नेते आपल्या नेत्यांची नाराजी बाहेर येऊ देत नसले तरीही सर्व सत्य लवकरच बाहेर येईल असेही राणे म्हणाले.

तसेच यावेळी त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सुद्धा निशाणा साधला. उद्धव ठाकरे यांना प्रत्येक निर्णय हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना विचारूनच घ्यावा लागत आहे. त्यामुळे पवार म्हणाले उठा, तर उठणार आणि बसा म्हणाले तर बसणार. तर मुख्यमंत्री ठाकरे म्हणजे शरद पवार यांच्या हातातील कठपुतली असल्याचा घणाघात निलेश राणेंनी केला.

 

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारNilesh Raneनिलेश राणे Uddhav Thackerayउद्धव ठाकरेAjit Pawarअजित पवारPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणPoliticsराजकारण