शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

"अजित दादांच्या जाहीरनाम्यात 'प्रिंटिंग मिस्टेक', एक ओळ छापायची राहून गेली!"; काय म्हणाले अमोल कोल्हे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2024 16:51 IST

कोल्हे म्हणाले, "राज्यावर तब्बल साडे आठ कोटींचे कर्ज असताना अडीच वर्षात ज्या पद्धतीने, असंवैधानिक पद्दतीने पक्ष फोडून विकासासाठी जातो म्हणून सरकार स्थापन करण्याचा जो काही प्रयत्न करतण्यात आला, यानंतर एवढ्या गोष्टी पूर्ण करण्याच्या राहून गेल्या असतील, तर महत्वाचा प्रश्न निर्माण होतो की, मग हे सर्व केलं कशासाठी?"

अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने नुकताच आपला जाहीरनामा जाहीर केला आहे. यात त्यांनी जनतेला अनेक आश्वासने दिली आहेत. यासंदर्भात बोलताना, "मला वाटते त्यात प्रिंटिंग मिस्टेक आहे. एक ओळ छापायची राहून गेली की, आम्ही तुम्हाला चंद्र आणून देऊ," अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते तथा खासदार अमोल कोल्हे यांनी अजित पवार गटावर निशाणा साधला आहे. ते पुण्यात पत्रकारांसोबत बोलत होते. 

कोल्हे म्हणाले, "राज्यावर तब्बल साडेआठ लाख कोटींचे कर्ज असताना अडीच वर्षात ज्या पद्धतीने, असंवैधानिक पद्दतीने पक्ष फोडून विकासासाठी जातो म्हणून सरकार स्थापन करण्याचा जो काही प्रयत्न करतण्यात आला, यानंतर एवढ्या गोष्टी पूर्ण करण्याच्या राहून गेल्या असतील, तर महत्वाचा प्रश्न निर्माण होतो की, मग हे सर्व केलं कशासाठी?" एवढेच नाही तर, "या पद्धतीने पक्ष फोडून, चिन्ह पळवून, पक्षाचं नाव पळवून जे काही मिळालं, जे काही करण्याचा प्रयत्न केला गेला, त्यातून काय साध्य झाले?" असा सवालही त्यांनी यावेळी केला. 

"लोकसभेला मतांची झाली कडकी, म्हणून आता बहीण झाली लाडलकी" -लाडकी बहिण योजेवर बोलताना कोल्हे म्हणाले, "आपल्याला तर लाडकी बहीण योजनेच्या बाबतीत ठोस माहिती आहे की, यामध्ये लोकसभेला मतांची झाली कडकी, म्हणून आता बहीण झाली होती लाडलकी. लाडकी बहीण योजनेची घोषणा करताना, त्याचे बजेटमध्ये हेड आहे का? इथून सुरुवात आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठीची पेन्शनची योजना आहे... योजनेला कुठलाही विरोध नाही. मात्र, वस्तस्थिती काय आहे, याकडे बघणे अत्यंत आवश्यक आहे."

"गेल्या दोन-अडीच महिन्यांत आपण बघितले की, अनेक योजनांचा निधी, हा ठराविक योजनांकडे वळवण्यात आला आणि सर्व योजना वाऱ्यावर सोडण्यात आल्या. यानंतर, काही जीवनावश्यक वस्तूंचे दर स्थीर ठेवण्याचे जे आश्वासन देण्यात आले, ते तर एवढे हासयस्पद आहे की, महाराष्ट्राचे अर्थमंत्री एकाही जीएसटी परिषदेला उपस्थित राहिलेले नाहीत. तर मग ते कोणत्या जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थीर ठेवणार आहेत." असा सवालही कोल्हे यांनी यावेळी केला.  

"महायुतीचे हे आश्वास हा केवळ पोकळ दावा आहे. सत्तेत येणार नाही, हे माहीत असल्याने, वाट्टेल ती आश्वासने द्या, हेच या जाहीरनाम्यातून स्पष्ट दिसते." असेही कोल्हे यावेळी म्हणाले.

 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Dr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हेAjit Pawarअजित पवार