शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
मुंबई, पुणे, कोल्हापूर, लातूरचे १०० जण अडकले नेपाळमध्ये; प्रवास टाळा, राज्यातील पर्यटकांना सरकारच्या सूचना 
3
नेपाळचं नेतृत्व करण्यास सज्ज झालेल्या सुशीला कार्की यांनी नरेंद्र मोदी आणि भारताबाबत केलं मोठं विधान, म्हणाल्या... 
4
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
5
भयंकर! ज्या प्रियकराच्या मदतीनं पतीच्या हत्येचा रचला कट; त्याचाच मृतेदह झाडाला लटकलेला आढळला
6
"त्यांचं रिलेशनशिप टॉक्झिक होतं", कुमार सानू आणि कुनिकाच्या अफेअरबद्दल लेक अयान म्हणाला- "आई आजही..."
7
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
8
Stock Markets Today: सुस्त सुरुवातीनंतर शेअर बाजारात पुन्हा खरेदी, Nifty २५,००० च्या जवळ; Adani Ports, TCS, NTPC टॉप गेनर्स
9
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
10
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
11
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
13
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
14
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
15
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
16
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
17
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
18
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
19
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
20
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?

"अजित दादांच्या जाहीरनाम्यात 'प्रिंटिंग मिस्टेक', एक ओळ छापायची राहून गेली!"; काय म्हणाले अमोल कोल्हे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2024 16:51 IST

कोल्हे म्हणाले, "राज्यावर तब्बल साडे आठ कोटींचे कर्ज असताना अडीच वर्षात ज्या पद्धतीने, असंवैधानिक पद्दतीने पक्ष फोडून विकासासाठी जातो म्हणून सरकार स्थापन करण्याचा जो काही प्रयत्न करतण्यात आला, यानंतर एवढ्या गोष्टी पूर्ण करण्याच्या राहून गेल्या असतील, तर महत्वाचा प्रश्न निर्माण होतो की, मग हे सर्व केलं कशासाठी?"

अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने नुकताच आपला जाहीरनामा जाहीर केला आहे. यात त्यांनी जनतेला अनेक आश्वासने दिली आहेत. यासंदर्भात बोलताना, "मला वाटते त्यात प्रिंटिंग मिस्टेक आहे. एक ओळ छापायची राहून गेली की, आम्ही तुम्हाला चंद्र आणून देऊ," अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते तथा खासदार अमोल कोल्हे यांनी अजित पवार गटावर निशाणा साधला आहे. ते पुण्यात पत्रकारांसोबत बोलत होते. 

कोल्हे म्हणाले, "राज्यावर तब्बल साडेआठ लाख कोटींचे कर्ज असताना अडीच वर्षात ज्या पद्धतीने, असंवैधानिक पद्दतीने पक्ष फोडून विकासासाठी जातो म्हणून सरकार स्थापन करण्याचा जो काही प्रयत्न करतण्यात आला, यानंतर एवढ्या गोष्टी पूर्ण करण्याच्या राहून गेल्या असतील, तर महत्वाचा प्रश्न निर्माण होतो की, मग हे सर्व केलं कशासाठी?" एवढेच नाही तर, "या पद्धतीने पक्ष फोडून, चिन्ह पळवून, पक्षाचं नाव पळवून जे काही मिळालं, जे काही करण्याचा प्रयत्न केला गेला, त्यातून काय साध्य झाले?" असा सवालही त्यांनी यावेळी केला. 

"लोकसभेला मतांची झाली कडकी, म्हणून आता बहीण झाली लाडलकी" -लाडकी बहिण योजेवर बोलताना कोल्हे म्हणाले, "आपल्याला तर लाडकी बहीण योजनेच्या बाबतीत ठोस माहिती आहे की, यामध्ये लोकसभेला मतांची झाली कडकी, म्हणून आता बहीण झाली होती लाडलकी. लाडकी बहीण योजनेची घोषणा करताना, त्याचे बजेटमध्ये हेड आहे का? इथून सुरुवात आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठीची पेन्शनची योजना आहे... योजनेला कुठलाही विरोध नाही. मात्र, वस्तस्थिती काय आहे, याकडे बघणे अत्यंत आवश्यक आहे."

"गेल्या दोन-अडीच महिन्यांत आपण बघितले की, अनेक योजनांचा निधी, हा ठराविक योजनांकडे वळवण्यात आला आणि सर्व योजना वाऱ्यावर सोडण्यात आल्या. यानंतर, काही जीवनावश्यक वस्तूंचे दर स्थीर ठेवण्याचे जे आश्वासन देण्यात आले, ते तर एवढे हासयस्पद आहे की, महाराष्ट्राचे अर्थमंत्री एकाही जीएसटी परिषदेला उपस्थित राहिलेले नाहीत. तर मग ते कोणत्या जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थीर ठेवणार आहेत." असा सवालही कोल्हे यांनी यावेळी केला.  

"महायुतीचे हे आश्वास हा केवळ पोकळ दावा आहे. सत्तेत येणार नाही, हे माहीत असल्याने, वाट्टेल ती आश्वासने द्या, हेच या जाहीरनाम्यातून स्पष्ट दिसते." असेही कोल्हे यावेळी म्हणाले.

 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Dr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हेAjit Pawarअजित पवार