शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
2
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
3
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
4
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
5
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
6
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
7
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
8
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
9
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
10
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
11
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
12
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
13
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
14
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
15
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
16
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
17
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
18
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
19
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
20
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा

'प्रधानमंत्री नोकरी दो'! मुंबईत काँग्रेसचे संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2018 18:49 IST

 भाजप सरकार सुशिक्षित तरुणांना नोकऱ्या देण्यास असमर्थ आणि अपयशी ठरलेले आहे. आज दिवसाला ५५० तरुण बेरोजगार होत आहेत आणि भविष्यात परिस्थिती अजून कठीण होत जाणार आहे.

मुंबई -  भाजप सरकार सुशिक्षित तरुणांना नोकऱ्या देण्यास असमर्थ आणि अपयशी ठरलेले आहे. आज दिवसाला ५५० तरुण बेरोजगार होत आहेत आणि भविष्यात परिस्थिती अजून कठीण होत जाणार आहे. नरेंद्र मोदी सरकारने अर्थव्यवस्था बरबाद केली. भविष्यात नजीकच्या काळात ६५ टक्के बेरोजगारी वाढणार आहे आणि हे भाजपा सरकार या बाबत काहीच ठोस पाऊल उचलत नाही आहे. हे सरकार फक्त जुमलेबाजी मध्ये व्यस्त आहे. हि जुमलेबाजी बंद करा. मंत्रालयात बसलेले लोक फक्त खोटे बोलत आहेत, म्हणून आम्ही आज बेरोजगार तरूणांना घेऊन मंत्रालयावर “प्रधानमंत्री नोकरी दो” आंदोलन केले, असे मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम म्हणाले. 

संजय निरुपम पुढे म्हणाले की आम्ही शांतपणे आंदोलन करणार होतो पण आम्हाला पोलिसांनी प्रचंड प्रमाणात फौज फाटा लावून अडवले. मंत्रालयावर जाऊ दिले नाही. या सरकारच्या काळात विरोधकांना आंदोलन हि करू दिले जात नाही आहे. हि दडपशाही आहे आणि मी याचा निषेध करतो. आज आम्हाला मंत्रालयात जाऊ दिले जात नाही आहे, भविष्यात जनताच त्यांना मंत्रालयातून बाहेर काढतील. भाजपच्या ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमातून एक हि नवीन रोजगार उपलब्ध झाला नाही. एक हि गुंतवणूक झालेली नाही. हा कार्यक्रम संपूर्णतः फेल झालेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी तरुणांना नोकऱ्या देण्याऐवजी पकोडे विकायला सांगतात. पकोडे विकणे हे वाईट नाही आहे परंतु या देशात उच्च शिक्षित लाखो तरुण आहेत त्यांनी काय पकोडेच विकायचे ? हा त्यांचा आणि त्यांच्या शिक्षणाचा अपमान आहे, असे संजय निरुपम म्हणाले.

“प्रधानमंत्री नोकरी दो” आंदोलन करताना संजय निरुपम व बेरोजगार तरूणांना आणि कॉंग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. या आंदोलनामध्ये शेकडो बेरोजगार तरुण, माजी आमदार चरणसिंग सप्रा, सरचिटणीस भूषण पाटील व संदेश कोंडविलकर यांच्यासह काही नगरसेवक सहभागी झाले होते.

टॅग्स :Sanjay Nirupamसंजय निरुपमcongressकाँग्रेसMumbaiमुंबईjobनोकरी