शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
4
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
5
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
6
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
7
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
8
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
9
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
10
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
11
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
12
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
13
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
14
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
15
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
16
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
17
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
18
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
19
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
20
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा

पंतप्रधान मोदी देश तोडू पाहत आहेत, देशाचे संविधान बदलू पाहत आहेत; नाना पटोलेंचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2021 18:27 IST

ज्या देशाला मागील 70 वर्षांत काँग्रेसने प्रगतीपथावर आणले. त्या देशाला तोडण्याचे पाप देशात कोरोना सारखे संकट आणणारे नरेंद्र मोदी करत असतील, तर ते आम्ही कदापी होऊ देणार नाही.

मुंबई- भारताच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोलेमुंबईकाँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्या नेतृत्वाखाली मुंबई काँग्रेसतर्फे व उत्तर पश्चिम मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जोगेश्वरी पश्चिम येथील ओशिवरा मेगा मॉल ते वर्सोवा,चार बंगला, अशी भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली. (Prime Minister Narendra Modi is trying to break the country, change the constitution of the country says Nana Patole) 

तिरंगा गौरव यात्रेमध्ये नाना पटोले व भाई जगताप यांच्या समवेत मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा, मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष व माजी खासदार संजय निरुपम, ऑल इंडिया महिला काँग्रेसच्या सचिव जेनेट डिसुझा, माजी आमदार अशोक जाधव, मुंबई काँग्रेसचे कोषाध्यक्ष भूषण पाटील, सहकोषाध्यक्ष अतुल बर्वे, सरचिटणीस संदेश कोंडविलकर, जिल्हाध्यक्ष क्लाइव्ह डायस, उत्तर पश्चिम मुंबई जिल्हा काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळेस मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नाना पटोले म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आता देश तोडू पाहत आहेत, देशाचे संविधान बदलू पाहत आहेत. ज्या देशाला मागील 70 वर्षांत काँग्रेसने प्रगतीपथावर आणले. त्या देशाला तोडण्याचे पाप देशात कोरोना सारखे संकट आणणारे नरेंद्र मोदी करत असतील, तर ते आम्ही कदापी होऊ देणार नाही. ज्या स्वातंत्र्यवीरांनी या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले, त्यांच्या कर्तृत्वाला सलाम करणे व त्यातून जनतेने प्रेरणा घेणे हेच या तिरंगा यात्रेचे उद्दिष्ट आहे 

यावेळी भाई जगताप म्हणाले की, ज्या स्वातंत्र्यवीरांनी व थोर महात्म्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिले, त्यांना अभिवादन करण्यासाठी आज काँग्रेसतर्फे तिरंगा गौरव यात्रेचे आयोजन आपण केले आहे. 

मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष व माजी खासदार संजय निरुपम यावेळेस बोलताना म्हणाले की, आज आपल्या देशाच्या 75 व्या स्वातंत्र्यदिना दिवशी ही तिरंगा गौरव यात्रा काढण्याचे कारण म्हणजे, इंग्रजांशी लढा देऊन देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात काँग्रेस पक्षाचे मोठे योगदान आहे. गेली 70 वर्षे काँग्रेसने हे स्वातंत्र्य अबाधित ठेवले आहे, हे या मुंबई शहराला आणि देशातील जनतेला सांगण्यासाठीच काँग्रेसतर्फे ही तिरंगा गौरव यात्रा काढण्यात आली आहे. आणि या स्वातंत्र्याला गालबोट लावण्याचा कुणी प्रयत्न केला, तर ते वाचविण्यासाठी आम्ही काँग्रेस कार्यकर्ते उभे आहोत.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसIndependence Dayस्वातंत्र्य दिनMumbaiमुंबईbhai jagtapअशोक जगतापNarendra Modiनरेंद्र मोदी