शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
2
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
3
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
4
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
5
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
6
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा
7
Iran Israel Conflict Explained: युद्धाच्या आगीत तेल पेटणार, भारतावर कसा परिणाम होणार?
8
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
9
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
10
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
11
"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!
12
NEET परीक्षा का बरे होत नसेल हो नीट?
13
इस्रायल सोडा अमेरिका-युरोपलाही घाबरत नाही; पण 'या' गटासमोर इराणला झुकावेच लागते!
14
‘त्या’ बेकायदा कृत्यांमध्ये कायद्याचे रक्षकच सहभागी; वसई-विरारमधील बांधकामप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले
15
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
16
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
17
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
18
Maharashtra Rainfall: पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस, विदर्भात अजून प्रतीक्षा
19
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
20
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’

पंतप्रधान मोदी देश तोडू पाहत आहेत, देशाचे संविधान बदलू पाहत आहेत; नाना पटोलेंचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2021 18:27 IST

ज्या देशाला मागील 70 वर्षांत काँग्रेसने प्रगतीपथावर आणले. त्या देशाला तोडण्याचे पाप देशात कोरोना सारखे संकट आणणारे नरेंद्र मोदी करत असतील, तर ते आम्ही कदापी होऊ देणार नाही.

मुंबई- भारताच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोलेमुंबईकाँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्या नेतृत्वाखाली मुंबई काँग्रेसतर्फे व उत्तर पश्चिम मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जोगेश्वरी पश्चिम येथील ओशिवरा मेगा मॉल ते वर्सोवा,चार बंगला, अशी भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली. (Prime Minister Narendra Modi is trying to break the country, change the constitution of the country says Nana Patole) 

तिरंगा गौरव यात्रेमध्ये नाना पटोले व भाई जगताप यांच्या समवेत मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा, मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष व माजी खासदार संजय निरुपम, ऑल इंडिया महिला काँग्रेसच्या सचिव जेनेट डिसुझा, माजी आमदार अशोक जाधव, मुंबई काँग्रेसचे कोषाध्यक्ष भूषण पाटील, सहकोषाध्यक्ष अतुल बर्वे, सरचिटणीस संदेश कोंडविलकर, जिल्हाध्यक्ष क्लाइव्ह डायस, उत्तर पश्चिम मुंबई जिल्हा काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळेस मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नाना पटोले म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आता देश तोडू पाहत आहेत, देशाचे संविधान बदलू पाहत आहेत. ज्या देशाला मागील 70 वर्षांत काँग्रेसने प्रगतीपथावर आणले. त्या देशाला तोडण्याचे पाप देशात कोरोना सारखे संकट आणणारे नरेंद्र मोदी करत असतील, तर ते आम्ही कदापी होऊ देणार नाही. ज्या स्वातंत्र्यवीरांनी या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले, त्यांच्या कर्तृत्वाला सलाम करणे व त्यातून जनतेने प्रेरणा घेणे हेच या तिरंगा यात्रेचे उद्दिष्ट आहे 

यावेळी भाई जगताप म्हणाले की, ज्या स्वातंत्र्यवीरांनी व थोर महात्म्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिले, त्यांना अभिवादन करण्यासाठी आज काँग्रेसतर्फे तिरंगा गौरव यात्रेचे आयोजन आपण केले आहे. 

मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष व माजी खासदार संजय निरुपम यावेळेस बोलताना म्हणाले की, आज आपल्या देशाच्या 75 व्या स्वातंत्र्यदिना दिवशी ही तिरंगा गौरव यात्रा काढण्याचे कारण म्हणजे, इंग्रजांशी लढा देऊन देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात काँग्रेस पक्षाचे मोठे योगदान आहे. गेली 70 वर्षे काँग्रेसने हे स्वातंत्र्य अबाधित ठेवले आहे, हे या मुंबई शहराला आणि देशातील जनतेला सांगण्यासाठीच काँग्रेसतर्फे ही तिरंगा गौरव यात्रा काढण्यात आली आहे. आणि या स्वातंत्र्याला गालबोट लावण्याचा कुणी प्रयत्न केला, तर ते वाचविण्यासाठी आम्ही काँग्रेस कार्यकर्ते उभे आहोत.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसIndependence Dayस्वातंत्र्य दिनMumbaiमुंबईbhai jagtapअशोक जगतापNarendra Modiनरेंद्र मोदी