शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
2
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
3
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
4
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
5
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
6
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
7
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
8
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
9
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
10
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
11
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
12
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
13
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
14
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
15
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
16
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
17
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
18
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
19
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
20
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन

पंतप्रधान मोदी देश तोडू पाहत आहेत, देशाचे संविधान बदलू पाहत आहेत; नाना पटोलेंचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2021 18:27 IST

ज्या देशाला मागील 70 वर्षांत काँग्रेसने प्रगतीपथावर आणले. त्या देशाला तोडण्याचे पाप देशात कोरोना सारखे संकट आणणारे नरेंद्र मोदी करत असतील, तर ते आम्ही कदापी होऊ देणार नाही.

मुंबई- भारताच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोलेमुंबईकाँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्या नेतृत्वाखाली मुंबई काँग्रेसतर्फे व उत्तर पश्चिम मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जोगेश्वरी पश्चिम येथील ओशिवरा मेगा मॉल ते वर्सोवा,चार बंगला, अशी भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली. (Prime Minister Narendra Modi is trying to break the country, change the constitution of the country says Nana Patole) 

तिरंगा गौरव यात्रेमध्ये नाना पटोले व भाई जगताप यांच्या समवेत मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा, मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष व माजी खासदार संजय निरुपम, ऑल इंडिया महिला काँग्रेसच्या सचिव जेनेट डिसुझा, माजी आमदार अशोक जाधव, मुंबई काँग्रेसचे कोषाध्यक्ष भूषण पाटील, सहकोषाध्यक्ष अतुल बर्वे, सरचिटणीस संदेश कोंडविलकर, जिल्हाध्यक्ष क्लाइव्ह डायस, उत्तर पश्चिम मुंबई जिल्हा काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळेस मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नाना पटोले म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आता देश तोडू पाहत आहेत, देशाचे संविधान बदलू पाहत आहेत. ज्या देशाला मागील 70 वर्षांत काँग्रेसने प्रगतीपथावर आणले. त्या देशाला तोडण्याचे पाप देशात कोरोना सारखे संकट आणणारे नरेंद्र मोदी करत असतील, तर ते आम्ही कदापी होऊ देणार नाही. ज्या स्वातंत्र्यवीरांनी या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले, त्यांच्या कर्तृत्वाला सलाम करणे व त्यातून जनतेने प्रेरणा घेणे हेच या तिरंगा यात्रेचे उद्दिष्ट आहे 

यावेळी भाई जगताप म्हणाले की, ज्या स्वातंत्र्यवीरांनी व थोर महात्म्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिले, त्यांना अभिवादन करण्यासाठी आज काँग्रेसतर्फे तिरंगा गौरव यात्रेचे आयोजन आपण केले आहे. 

मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष व माजी खासदार संजय निरुपम यावेळेस बोलताना म्हणाले की, आज आपल्या देशाच्या 75 व्या स्वातंत्र्यदिना दिवशी ही तिरंगा गौरव यात्रा काढण्याचे कारण म्हणजे, इंग्रजांशी लढा देऊन देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात काँग्रेस पक्षाचे मोठे योगदान आहे. गेली 70 वर्षे काँग्रेसने हे स्वातंत्र्य अबाधित ठेवले आहे, हे या मुंबई शहराला आणि देशातील जनतेला सांगण्यासाठीच काँग्रेसतर्फे ही तिरंगा गौरव यात्रा काढण्यात आली आहे. आणि या स्वातंत्र्याला गालबोट लावण्याचा कुणी प्रयत्न केला, तर ते वाचविण्यासाठी आम्ही काँग्रेस कार्यकर्ते उभे आहोत.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसIndependence Dayस्वातंत्र्य दिनMumbaiमुंबईbhai jagtapअशोक जगतापNarendra Modiनरेंद्र मोदी