शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

जळगावच्या बाजारात डाळींच्या दरात २०० रुपयांनी वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 11:49 IST

बाजारगप्पा : ज्या शेतकऱ्यांना पैशांची गरज आहे असेच शेतकरी आपला माल बाजारात आणून विकून मोकळे होत आहेत.

- अजय पाटील   (जळगाव)

यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने जिल्ह्यात उडीद व मुगाच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. उडीद-मुगाच्या शेंगांमध्ये दाणा तयार होण्याचा प्रक्रियेदरम्यानच पावसाने पाठ फिरविली होती. त्यामुळे गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा जळगावच्या बाजारात येणाऱ्या आवकमध्ये मोठी घट दिसून येत आहे. सण-उत्सव सुरू असतानाच बाजारात डाळींची आवक घटल्याने त्यांच्या दरात शंभर ते दोनशे रुपयांची वाढ झाली आहे. 

गेल्या आठवड्यात मूग डाळींचा दर ६,४०० ते ६,६०० रुपये प्रतिक्किंटल इतका होता. सध्या मूग डाळींचा दर दोनशे रुपयांनी वाढला असून, ६,६०० तो ७,००० रुपये इतका झाला आहे. उडदाचा दर ५,४०० रुपये प्रतिक्विंटल इतका आहे. भाव वाढल्याने शेतकरी माल बाजारात आणतील, अशी शक्यता होती. मात्र, भाव वाढले असले तरी ज्या प्रमाणात मालाची आवक वाढायला हवी होती, तितकी आवक बाजारात दिसून येत नाही. उडीद-मुगामधील ओलाव्याचे प्रमाणदेखील कमी झाले आहे. डाळींचा दर्जादेखील चांगला असल्याने दर वाढले आहेत. 

शहरातील बाजार समितीमध्येदेखील आवक घटली असून, उडदाची आवक २ हजार क्विंटल तर मुगाची आवक ७०० क्विंटल इतकी आहे. पितृपक्ष संपल्यानंतर आता नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली असून, पुढे दिवाळी आहे. त्यादरम्यान, डाळींच्या दरात वाढ झाल्याने शेतकऱ्याला दिलासा मिळाला आहे. तूर डाळीच्या दरातदेखील प्रतिक्विंटल १५० रुपयांची, तर चना डाळीतही २०० रुपयांची वाढ झाल्याची माहिती दाणा बाजार असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण पगारिया यांनी दिली आहे. डाळींव्यतिरीक्त गहू व तांदळाचे दर स्थिर आहेत. मात्र, दिवाळीपर्यंत मागणीत मोठी वाढ होण्याची शक्यता असल्याने दरातदेखील वाढ होण्याची शक्यता आहे. 

सध्या बाजारात सोयाबीनची आवकदेखील कमी आहे. आॅक्टोबर महिन्यात सोयाबीन काढण्यास सुरुवात होते. मात्र, अद्याप बाजारात सोयाबीनची आवकदेखील वाढलेली नाही. सध्या २,८०० ते ३,००० रुपये प्रतिक्विंटल इतके सोयाबीनचे भाव आहेत. त्यामुळे भावात वाढ होईल या अपेक्षेने शेतकरी आपला माल बाजारात आणत नसल्याचे चित्र आहे. ज्या शेतकऱ्यांना पैशांची गरज आहे असेच शेतकरी आपला माल बाजारात आणून विकून मोकळे होत आहेत.

शासकीय उडीद-मूगखरेदी केंद्र सुरू करण्यास शासनाने मंजुरी दिल्यानंतरदेखील खरेदी केंद्र सुरू झालेले नाही. अनेक शेतकरी हे केंद्र सुरू होईल याच अपेक्षेने आपला माल बाजारात आणत नसल्याचेदेखील दिसून येत आहे. त्यामुळे हंगाम संपल्यानंतर खरेदी केंद्र सुरू करण्यात येतील का? असा सवाल केला जात आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत गव्हाच्या भावात ५० रुपये प्रतिक्विंटलने वाढ झाली आहे. १४७ गहू २,४०० ते २,५०० रुपयांवरून २,४५० ते २,५५० रुपये प्रतिक्विंटल, लोकवन गव्हाचे भाव २,३५० ते २,४५० रुपये, शरबती गहू २,५५० ते २,६५० रुपये आणि चंदोसीचे भाव ३,६५० ते ३,८५० रुपयांवर पोहोचले आहेत.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र