शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

आधीच्या सरकारने शिक्षकांना गुलाम करण्याचा प्रयत्न केला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2020 05:16 IST

संजय राऊत यांची टीका । शिक्षक भारतीचे राज्यव्यापी अधिवेशन

मुंबई : मागील पाच वर्षांत शिक्षण क्षेत्रात विष पेरण्याचा प्रयत्न झाला. या काळात पाठ्यपुस्तकातले धडे आणि इतिहास बदलला, त्यातून विद्यार्थ्यांची डोकी खराब करण्याचा प्रयत्न झाला. इतकेच काय तर शिक्षकाला राजकीय कार्यकर्ता बनवून गुलाम करण्याचा प्रयत्न झाल्याची टीका शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केली. आमदार कपिल पाटील यांनी शनिवारी आयोजित केलेल्या शिक्षक भारतीच्या राज्यव्यापी अधिवेशनात राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत फटकेबाजी केली.शिक्षकांचा वापर राजकीय स्वार्थासाठी न करता त्यांना महाराष्ट्र घडविण्याचे त्यांचे काम करू दिले जावे अशी अपेक्षाही राऊत यांनी व्यक्त केली. शिक्षकांच्या मागण्या पूर्ण होण्यासाठी मंत्रालयाबाहेर त्याचे होर्डिंग लावावे म्हणजे मुख्यमंत्र्यांना मागण्यांचे गांभीर्य लक्षात येईल असा सल्लाही दिला. शरद पवार हे उत्तम राज्यकर्ते असून शिक्षकांच्या १००हून अधिक मागण्यांचे पत्र त्यांनी पाहिले आहे. त्यावर लाल, हिरव्या शाईने खुणाही केल्या आहेत. त्यामुळे शिक्षकांचे प्रश्न लवकरच मार्गी लागतील, असा विश्वासही राऊत यांनी व्यक्त केला.तर, शिक्षकांचे सारे प्रश्न एकाच वेळी सोडविता येणार नाहीत. मात्र त्यांचा प्राधान्यक्रम ठरवून त्यावर तातडीने कारवाई करता येईल, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले. नवीन पिढी घडवण्याची जबाबदारी ज्यांच्या शिरावर आहे, त्यांच्या भवितव्याचे प्रश्न मला अत्यंत महत्त्वाचे वाटतात. म्हणूनच गेल्या पाच वर्षांत मी इतर कोणत्याही मंत्र्यांकडे गेलो नाही, पण शिक्षणमंत्र्यांना मात्र भेटलो, असे पवार म्हणाले.चित्र बदलणारराज्यात शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण झालेले आहे. आता पाडेवस्त्यांवरील शिक्षणाकडे लक्ष देणे ही राज्यकर्त्यांची जबाबदारी आहे. मात्र इथे उलटे होऊन राज्यातील १३०० शाळा बंद करण्याचा घाट घातला गेला, हे दुर्दैवी आहे. आपल्या सरकारच्या काळात आपण हे बदलू, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिक्षकांना दिला.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतTeacherशिक्षक