शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

निकालाआधीच शिवसेनेकडून दबावतंत्राला सुरुवात ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2019 17:32 IST

खासदार संजय राऊत यांनी देखील शिवसेनेशिवाय भाजपला राज्य करता येणार नाही असं म्हटलं आहे. त्यामुळे निकालाआधीच शिवसेनेकडून दबावतंत्र सुरू करण्यात आलं का, असा सवाल उपस्थित होत आहे.

मुंबई - विधानसभा निवडणुकीत यंदा पुन्हा एकदा कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळेल अशी स्थिती नाही. किंबहुना भाजप व्यतिरिक्त कोणताही प्रमुख पक्ष बहुमताच्या आकड्यापेक्षा अधिक जागाही लढवत नाही. त्यामुळे स्पष्ट बहुमताची शक्यता कमी आहे. तर सर्वाधिक जागा लढवत असलेल्या भाजपलाही बहुमत मिळेल असं चित्र मतचाचण्यांमध्ये दिसले नाही. त्यामुळे शिवसेनेने निकालाआधीपासूनच दबावतंत्र सुरू केले आहे.

2014 मध्ये राज्यात त्रिशंकू स्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी भाजपने सत्तेचा दावा केला. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी निकालाच्या दिवशीच भाजपला पाठिंबा दिला होता. त्यामुळे शिवसेनेचे महत्त्व झपाट्याने कमी झाले. या पाठिंब्यावर भाजपने राज्यात सत्ता स्थापन केली. तर शिवसेना विरोधी बाकावर विराजमान झाली. तरी भाजपने शिवसेनेला सरकारमध्ये घेतले. परंतु, सत्तेत सहभागी झालेल्या शिवसेनेला मनासारखी मंत्रीपदे मिळाली नाही. किंबहुना पाच वर्षे शिवसेनेने भाजपवर टीका करण्यातच घालवले.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने पुन्हा एकदा शिवसेनेला सोबत घेण्याचा इरादा केला. त्यानुसार दोन्ही पक्ष एकत्र लढत आहेत. मात्र अनेक ठिकाणी उभय पक्षांचे बंडखोर एकमेकांना शह देण्याचा प्रयत्न सुरू आहे. या बंडखोरांना पक्षांचा पाठिंबा असल्याचे सांगण्यात येते. तर नितेश राणे यांच्याविरुद्ध शिवसेनेने उमेदवार दिला. त्यामुळे युती असली तरी उभय पक्षात धुसफूस सुरूच असल्याचे स्पष्ट होते.

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार असून मत चाचण्यांमध्ये स्पष्ट बहुमत कोणत्याही एका पक्षाला नसल्याचे सांगण्यात आहे. त्यानुसार शिवसेनेने उपमुख्यमंत्रीपदासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. खासदार संजय राऊत यांनी देखील शिवसेनेशिवाय भाजपला राज्य करता येणार नाही असं म्हटलं आहे. त्यामुळे निकालाआधीच शिवसेनेकडून दबावतंत्र सुरू करण्यात आलं का, असा सवाल उपस्थित होत आहे.