शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर, कोणाला किती पैसे मिळणार?
2
'तिकीट वाटप'वरून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये पाटणा एअरपोर्टवर तुफान हाणामारी, व्हिडीओ व्हायरल!
3
भीषण संघर्षानंतर पाकिस्तानची शस्रसंधीसाठी अफगाणिस्तानला विनवणी, दोन्ही देशांत ४८ तासांसाठी युद्धविराम
4
जैसलमेर दुर्घटनेनंतर आता जयपूरमध्ये धावत्या बसला आग, परिसरात खळबळ!
5
प्रसिद्ध लेखिका अर्चना शंभरकर यांचे निधन, वयाच्या ५२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!
6
Bihar Elections: मैथिली ठाकूर यांचा मतदारसंघ ठरला, कुणाची तिकिटं कापली; भाजपची दुसरी यादी जाहीर
7
फूड डिलिव्हरी ॲपला २१ लाखांचा चुना, २ वर्षे फुकट जेवला; तरुणाचा झुगाड पाहून चक्रावून जाल!
8
सांगलीत 'भोसले टोळी'चा धुमाकूळ; भरदिवसा घरफोड्या करून ४७ तोळे सोने लंपास
9
Silver Supply Crunch: जास्त पैसे देऊन विकत घ्यायला तयार, पण लोकांना बाजारात चांदी मिळेना?
10
सासूसोबत अफेअर, अश्लील व्हिडीओ आणि..., जावयाच्या हत्येची धक्कादायक कहाणी समोर
11
रोहित शर्मा मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर; ५४ धावा करताच सौरव गांगुलीला टाकणार मागे!
12
डॉक्टर पतीने केली पत्नीची हत्या, भासवला नैसर्गिक मृत्यू , अखेर ६ महिन्यांनी असं फुटलं बिंग 
13
'खट्याळ सासू नाठाळ सून' सिनेमात निवेदिता सराफ यांना होती पहिली पसंती, पण नंतर वर्षा उसगांवकर यांची लागली वर्णी
14
Ghost Town Visitor: हा फोटो काढायला दहा वर्षे लागली अन् ठरला 'फोटोग्राफर ऑफ द ईयर'; सगळी स्टोरी काय?
15
आई-वडील, दोन मुली, एक मुलगा...; जैसलमेर बस दुर्घटनेत अख्खं कुटुंब जळून खाक!
16
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
17
1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर
18
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
19
Ranji Trophy : पुणेकर झाला महाराष्ट्र संघाचा 'कणा'; ऋतुराज गायकवाडचं शतक थोडक्यात हुकलं, पण...
20
"आम्ही त्यांचं नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू" इस्रायलची हमासला धमकी!

निकालाआधीच शिवसेनेकडून दबावतंत्राला सुरुवात ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2019 17:32 IST

खासदार संजय राऊत यांनी देखील शिवसेनेशिवाय भाजपला राज्य करता येणार नाही असं म्हटलं आहे. त्यामुळे निकालाआधीच शिवसेनेकडून दबावतंत्र सुरू करण्यात आलं का, असा सवाल उपस्थित होत आहे.

मुंबई - विधानसभा निवडणुकीत यंदा पुन्हा एकदा कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळेल अशी स्थिती नाही. किंबहुना भाजप व्यतिरिक्त कोणताही प्रमुख पक्ष बहुमताच्या आकड्यापेक्षा अधिक जागाही लढवत नाही. त्यामुळे स्पष्ट बहुमताची शक्यता कमी आहे. तर सर्वाधिक जागा लढवत असलेल्या भाजपलाही बहुमत मिळेल असं चित्र मतचाचण्यांमध्ये दिसले नाही. त्यामुळे शिवसेनेने निकालाआधीपासूनच दबावतंत्र सुरू केले आहे.

2014 मध्ये राज्यात त्रिशंकू स्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी भाजपने सत्तेचा दावा केला. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी निकालाच्या दिवशीच भाजपला पाठिंबा दिला होता. त्यामुळे शिवसेनेचे महत्त्व झपाट्याने कमी झाले. या पाठिंब्यावर भाजपने राज्यात सत्ता स्थापन केली. तर शिवसेना विरोधी बाकावर विराजमान झाली. तरी भाजपने शिवसेनेला सरकारमध्ये घेतले. परंतु, सत्तेत सहभागी झालेल्या शिवसेनेला मनासारखी मंत्रीपदे मिळाली नाही. किंबहुना पाच वर्षे शिवसेनेने भाजपवर टीका करण्यातच घालवले.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने पुन्हा एकदा शिवसेनेला सोबत घेण्याचा इरादा केला. त्यानुसार दोन्ही पक्ष एकत्र लढत आहेत. मात्र अनेक ठिकाणी उभय पक्षांचे बंडखोर एकमेकांना शह देण्याचा प्रयत्न सुरू आहे. या बंडखोरांना पक्षांचा पाठिंबा असल्याचे सांगण्यात येते. तर नितेश राणे यांच्याविरुद्ध शिवसेनेने उमेदवार दिला. त्यामुळे युती असली तरी उभय पक्षात धुसफूस सुरूच असल्याचे स्पष्ट होते.

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार असून मत चाचण्यांमध्ये स्पष्ट बहुमत कोणत्याही एका पक्षाला नसल्याचे सांगण्यात आहे. त्यानुसार शिवसेनेने उपमुख्यमंत्रीपदासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. खासदार संजय राऊत यांनी देखील शिवसेनेशिवाय भाजपला राज्य करता येणार नाही असं म्हटलं आहे. त्यामुळे निकालाआधीच शिवसेनेकडून दबावतंत्र सुरू करण्यात आलं का, असा सवाल उपस्थित होत आहे.