शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवारांना शह देण्याची तयारी, राज्यभरात अजित पवार गटाची मोर्चेबांधणी, केली मोठी घोषणा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2023 23:21 IST

Ajit Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील आमदारांचा गट राज्यातील युती सरकारमध्ये सहभागी झाला होता. तेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर वर्चस्व मिळवण्यासाठी अजित पवार गट आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील गट यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील आमदारांचा गट राज्यातील युती सरकारमध्ये सहभागी झाला होता. तेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर वर्चस्व मिळवण्यासाठी अजित पवार गट आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील गट यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू आहे. दरम्यान, शरद पवार यांना शह देऊन राज्यात पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटानं मोठं पाऊल उचललं आहे.राज्यात पक्ष संघटना वाठवण्यासाठी राज्य सरकारमध्ये सहभागी झालेल्या अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटातील ९ मंत्री आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, खासदार सुनील तटकरे यांनी ही घोषणा केली असून, एका पत्रकाच्या माध्यमातून ही घोषणा करण्यात आली आहे.

या पत्रकात दिलेल्या माहितीनुसार राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर पुणे, सातारा, सांगली व सोलापूर जिल्ह्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांच्यावर भंडारा, गोंदिया, वर्धा, अमरावती आणि नागपूरची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यावर नाशिक, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यांची जबाबदारी असेल. तर दिलीप वळसे पाटील यांच्याकडे अकोला, वाशीम, छत्रपती संभाजीनगर आणि बुलढाणा जिल्ह्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

हसन मुश्रीफ यांच्यावर कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि अहमदनगर जिल्ह्यांची जबाबदारी असेल. तर धनंजय मुंडे यांच्याकडे बीड, परभणी, नांदेड आणि जालना जिल्ह्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. संजय बनसोडे यांच्यावर हिंगोली, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यांची जबाबदारी असेल.  अदिती तटकरे यांच्यावर रायगड, रत्नागिरी, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. अनिल पाटील यांच्याकडे जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. धर्मारावबाबा आत्राम यांच्याकडे गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ या जिल्ह्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवार