शहरं
Join us  
Trending Stories
1
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
2
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
3
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
4
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
5
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
6
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
7
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
8
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
9
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
10
Operation Sindoor Live Updates: शस्त्रसंधी झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची संरक्षण मंत्र्यांसह तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक
11
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
12
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
13
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
14
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
15
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
16
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
17
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
18
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
19
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
20
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती

त्र्यंबकेश्वर येथे शासकीय यंत्रणेची सज्जता

By admin | Updated: August 4, 2016 21:21 IST

येथे श्रावण महिन्याचे विशेष महत्त्व असून, तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त सुमारे चार ते पाच लाख भाविक येथे येत असतात. यासाठी नियोजन करण्यासाठी नगरपालिका सभागृहात

ऑनलाइन लोकमतत्र्यंबकेश्वर, दि. ४ : येथे श्रावण महिन्याचे विशेष महत्त्व असून, तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त सुमारे चार ते पाच लाख भाविक येथे येत असतात. यासाठी नियोजन करण्यासाठी नगरपालिका सभागृहात एका खास बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष विजया लढ्ढा होत्या.

त्र्यंबकेश्वर येथे चारही सोमवारांबरोबरच संपूर्ण महिनाभर भाविकांचा ओघ राहणार असल्याने भाविक एसटी बस, खासगी वाहने अन्य प्रवासी बस आदिंचा वापर करून श्रावण महिन्यासाठी त्र्यंबकला येत असतात. या गर्दीमुळे पोलीस यंत्रणेवर वाहनांचे नियोजन, कायदा आणि सुव्यवस्था राखणे आदि कामांसाठी सर्वात जास्त ताण येतो. हे सर्व करण्यासाठी जादा पोलीस बळ असावे लागते. सर्व खासगी वाहने खंबाळे, अंबोली, पहिने व तळवाडे वाहनतळावर थांबविण्यात येतील व तेथून बसने शहरात स्वतंत्रपणे एस.टी. बसने येता येईल.

गावात कुठलेही वाहन आणता येणार नाही, मात्र एसटी बस शहरात येतील हे नियोजन फक्त श्रावण सोमवारी असेल. बाकी जशी गर्दी वाढेल तसे नियोजन असेल, अशी माहिती पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी दिली. परिक्रमा फेरी मार्गावरदेखील पुरेसा बंदोबस्त असेल. त्यामुळे केवळ हौसेखातर व फेरीच्या नावाखाली येणारे, नशिले, मादक पदार्थ सेवन करून ‘पिकनिक’साठी व छेडछाड करणाऱ्यांना चाप बसणार आहे.

त्र्यंबकेश्वर येथे येणाऱ्या भाविकांची आरोग्य व्यवस्था ग्रामीण रुग्णालयातर्फे घेण्यात येईल. पहिला, दुसरा आणि चौथ्या सोमवारी रुग्णालयात असलेल्या नियमित तीन वैद्यकीय अधिकारी-१, वैद्यकीय अधीक्षक-१ व अन्य कर्मचाऱ्यांमार्फत व्यवस्था करण्यात येईल. त्यासाठी पुरेसा औषधसाठा उपलब्ध असेल तर तिसऱ्या सोमवारी मात्र चार ठिकाणी फिरते आरोग्य पथक तैनात करण्यात येईल. या शिवाय पाणीपुरवठा सुरळीतपणे होईल. त्र्यंबक नगरपालिका व मजीप्रातर्फे थोडा क्लोरिनचा डोस वाढविण्यात येईल. सर्व यंत्रणांनी सतर्क राहून श्रावण सोमवार यशस्वीपणे पार पाडावेत, असे आवाहन नगराध्यक्ष विजया लढ्ढा यांनी केले. त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याच्या वतीने कुशावर्त तीर्थावर जवळपास २५ जीवरक्षक असणार आहेत. त्यामुळे कुशावर्तावर सहसा बुडण्याचा धोका राहणार नाही. तरीदेखील भाविकांनी दोरीच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले आहे. येत्या ११ आॅगस्टला सिंहस्थ पर्वकाल संपणार असल्याने पहिल्या सोमवारी, मंगळवारी व बुधवारी कदाचित भाविकांची सिंहस्थ स्नानासाठी गर्दी होण्याचा अंदाज आहे. प्रशासनाने मात्र श्रावण नियोजनाची पूर्णपणे जय्यत तयारी केली आहे. यावेळी नगरसेवक, अधिकारी वर्ग उपस्थित होते. त्र्यंबकेश्वर मंदिर, जव्हार फाट्यावरील बसस्थानक, सापगाव फाटा (जेथून फेरीचा परतीचा मार्ग आहे) व कुशावर्त तीर्थ या ठिकाणी फिरते आरोग्य पथक असेल. १०८ रुग्णवाहिका येथील दोन रुग्णवाहिकेसह नऊ रुग्णवाहिकांची व्यवस्था केली आहे त्यामुळे कोणतीच गैरसोय होणार नाही. जादा वैद्यकीय कर्मचाऱ्यांसह पुरेसा औषधसाठा, रुग्णालयात अ‍ॅडमिट करण्याची व्यवस्था असेल, अशी माहिती डॉ. भागवत लोंढे यांनी दिली. त्र्यंबक पालिका गावातील स्वच्छता, पथदीप, पुरेसे पाणी आदि जबाबदारी पार पाडणार आहे. अधिकारी आदि फिरणार असल्याने भाविकांची कुठलीही गैरसोय होणार नाही.एस.टी. महामंडळातर्फे तिसऱ्या सोमवारव्यतिरिक्त नेहमीच्या टायमिंग १५० गाड्यांव्यतिरिक्त ५० जादा बसेस रविवार, सोमवार या दोन दिवसांत सोडण्यात येतील. तात्पुरत्या स्वरूपात जव्हार फाट्यावरील बसस्थानक सुरू करून तेथूनच गाड्यांचे नियोजन केले जाईल, अशी माहिती शरद झोले यांनी दिली. ते म्हणाले, भाविकांची गैरसोय होणार नाही याची खबरदारी घेण्यात येईल, पुरेशा बसेस उपलब्ध आहेत.पोलिसांची अधिक कुमकत्र्यंबक पोलिसांनी केलेल्या नियोजनासाठी वरिष्ठांकडे पहिला, दुसरा आणि चौथ्या सोमवारी एक पोलीस उपअधीक्षक, १२ पोलीस निरीक्षक, २४ सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, ३००- पोलीस कर्मचारी, ७५ महिला पोलीस कर्मचारी, २०० पोलीस कर्मचारी, तर तिसऱ्या श्रावण सोमवारी चार पोलीस उपअधीक्षक, १६ पोलीस निरीक्षक, ६४ सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, ७०० पोलीस कर्मचारी, त्यात महिला पोलीस कर्मचारीदेखील असतील व ३०० होमगार्ड्सची मागणी केली आहे.