शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

एमआयएम सोबत असूनही प्रकाश आंबेडकरांना मुस्लीम मतांची चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2019 15:15 IST

आगामी विधानसभा निवडणुकीत बहुजन मतांबरोबर मुस्लीम मतांना आपल्याकडे वळवण्यासाठी आंबेडकर यांचे प्रयत्न सुरु असल्याची चर्चा आहे.

मुंबई - लोकसभा निवडणुकीत माजी खासदार प्रकाश आंबेडकर आणि एमआयएम प्रमुख असुद्दिन ओवेसी यांनी एकत्र येत वंचित बहुजन आघाडीची स्थापना करत निवडणूक लढवली. मात्र औरंगाबाद वगळता कुठेही त्यांना आपला उमेदवार निवडून आणता आला नाही. विशेष म्हणजे खुद्द प्रकाश आंबेडकर यांचा अकोला आणि सोलापूर दोन्ही ठिकाणाहून पराभव झाला. औरंगाबाद वगळता इतरत्र मुस्लीम समाजाची मते कमी प्रमाणात मिळाली, त्यामुळे आपला आणि वंचित बहुजन आघडीच्या उमेदवारांचा पराभव झाला असल्याचा दावा आंबडेकर यांनी केला होता. तर आता विधानसभेत सुद्धा याची पुनरावृत्ती होण्याची चिंता आंबडेकर यांना असल्याची बोलले जात आहे.

लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक चर्चेत आलेल्या वंचित आघाडीला प्रत्यक्षात मात्र, अपेक्षाप्रमाणे कामगिरी करता आली नाही. विशेष म्हणजे खुद्द आंबेडकर यांचा दोन्ही ठिकाणाहून पराभव झाला होता. तर, मुस्लीम समाजाने औरंगाबाद वगळता बाकी ठिकाणी वंचित आघीडला मतदान केलं नसल्याचा खुलासा आंबेडकर यांनी केला होता. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत पुन्हा मुस्लीम मते मिळाली नाही तर, वंचित आघाडीला राज्यात खात उघडणे सुद्धा शक्य होणार नाही. त्यामुळे सद्या प्रकाश आंबेडकर मुस्लीम भागात विविध कार्यक्रमातून संपर्क साधताना दिसत आहे.

आजही काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग मुस्लीम समाजात आहे. सोलापूरमध्ये लोकसभा निवडणुकीत याच मुस्लीम समाजाने वंचित बहुजन आघाडीपेक्षाकाँग्रेसला मोठी पसंती दिली. त्यामुळेच आंबेडकर यांना पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे एमआयएम सोबत असूनही मुस्लीम मते मिळत नसल्याने आंबेडकर यांची चिंता वाढली असल्याचे बोलले जात आहे.

शनिवारी आंबेडकर यांनी औरंगाबाद येथे मुस्लीम समाज भव्य प्रवेश सोहळ्याचे आयोजन केले होते. यावेळी त्यांनी भाजपपेक्षा थेट काँग्रेसवर जोरदार टीका केली. आजच्या परिस्थितीत काँग्रेस हा पक्ष भाजप-शिवसेनेला पराभूत करू शकत नाही. मात्र जर मुस्लीम समाज हा वंचित सोबत आला तर नक्कीच राज्यात युती सरकारला घरी बसवणार असल्याचा दावा सुद्धा त्यांनी यावेळी केला. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत बहुजन मतांबरोबर मुस्लीम मतांना आपल्याकडे वळवण्यासाठी आंबेडकर यांचे प्रयत्न सुरु असल्याची चर्चा आहे.