शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

एमआयएम सोबत असूनही प्रकाश आंबेडकरांना मुस्लीम मतांची चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2019 15:15 IST

आगामी विधानसभा निवडणुकीत बहुजन मतांबरोबर मुस्लीम मतांना आपल्याकडे वळवण्यासाठी आंबेडकर यांचे प्रयत्न सुरु असल्याची चर्चा आहे.

मुंबई - लोकसभा निवडणुकीत माजी खासदार प्रकाश आंबेडकर आणि एमआयएम प्रमुख असुद्दिन ओवेसी यांनी एकत्र येत वंचित बहुजन आघाडीची स्थापना करत निवडणूक लढवली. मात्र औरंगाबाद वगळता कुठेही त्यांना आपला उमेदवार निवडून आणता आला नाही. विशेष म्हणजे खुद्द प्रकाश आंबेडकर यांचा अकोला आणि सोलापूर दोन्ही ठिकाणाहून पराभव झाला. औरंगाबाद वगळता इतरत्र मुस्लीम समाजाची मते कमी प्रमाणात मिळाली, त्यामुळे आपला आणि वंचित बहुजन आघडीच्या उमेदवारांचा पराभव झाला असल्याचा दावा आंबडेकर यांनी केला होता. तर आता विधानसभेत सुद्धा याची पुनरावृत्ती होण्याची चिंता आंबडेकर यांना असल्याची बोलले जात आहे.

लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक चर्चेत आलेल्या वंचित आघाडीला प्रत्यक्षात मात्र, अपेक्षाप्रमाणे कामगिरी करता आली नाही. विशेष म्हणजे खुद्द आंबेडकर यांचा दोन्ही ठिकाणाहून पराभव झाला होता. तर, मुस्लीम समाजाने औरंगाबाद वगळता बाकी ठिकाणी वंचित आघीडला मतदान केलं नसल्याचा खुलासा आंबेडकर यांनी केला होता. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत पुन्हा मुस्लीम मते मिळाली नाही तर, वंचित आघाडीला राज्यात खात उघडणे सुद्धा शक्य होणार नाही. त्यामुळे सद्या प्रकाश आंबेडकर मुस्लीम भागात विविध कार्यक्रमातून संपर्क साधताना दिसत आहे.

आजही काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग मुस्लीम समाजात आहे. सोलापूरमध्ये लोकसभा निवडणुकीत याच मुस्लीम समाजाने वंचित बहुजन आघाडीपेक्षाकाँग्रेसला मोठी पसंती दिली. त्यामुळेच आंबेडकर यांना पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे एमआयएम सोबत असूनही मुस्लीम मते मिळत नसल्याने आंबेडकर यांची चिंता वाढली असल्याचे बोलले जात आहे.

शनिवारी आंबेडकर यांनी औरंगाबाद येथे मुस्लीम समाज भव्य प्रवेश सोहळ्याचे आयोजन केले होते. यावेळी त्यांनी भाजपपेक्षा थेट काँग्रेसवर जोरदार टीका केली. आजच्या परिस्थितीत काँग्रेस हा पक्ष भाजप-शिवसेनेला पराभूत करू शकत नाही. मात्र जर मुस्लीम समाज हा वंचित सोबत आला तर नक्कीच राज्यात युती सरकारला घरी बसवणार असल्याचा दावा सुद्धा त्यांनी यावेळी केला. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत बहुजन मतांबरोबर मुस्लीम मतांना आपल्याकडे वळवण्यासाठी आंबेडकर यांचे प्रयत्न सुरु असल्याची चर्चा आहे.