शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

वंचित-महाआघाडीमध्ये तोडगा निघेपर्यंत एमआयएम वेटिंगवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2019 12:02 IST

एमआयएमला किती जागा सोडायच्या यावर अजूनही निर्णय होऊ शकला नाही

मुंबई - लोकसभा निवडणुकीत माजी खासदार प्रकाश आंबेडकर आणि एमआयएम प्रमुख अससोद्दिन ओवेसी यांनी एकत्र येत वंचित बहुजन आघाडीची स्थापना करून निवडणूक लढवली. लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीत सुद्धा वंचित बहुजन आघाडी आपले उमेदवार रिंगणात उतरवणार आहे. मात्र वंचित आणि एमआयएम यांच्यातील जागावाटपाचा तिढा सुटत नसल्याने एमआयएमची चिंता वाढली आहे. तर महाआघाडी सोबत जाणेबाबतीच्या चर्चेवर अंतिम निर्णय होईपर्यंत एमआयएमला प्रकाश आंबेडकर वेटिंगवर ठेवत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

विधानसभा निवडणुकीत उमेदवार रिंगणात उतरवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने इच्छुक उमेदवार यांच्या मुलाखती सुद्धा सुरु केल्या आहेत. मात्र एमआयएमला किती जागा सोडायच्या यावर अजूनही निर्णय होऊ शकला नाही. एमआयएमने काही दिवसांपूर्वी ९८ जागांचा प्रस्ताव वंचित बहुजन आघाडीकडे दिला होता. त्यावेळी वंचितच्या कोअर कमिटीने यावर लवकरच निर्णय घेण्याचा आश्वासन दिले होते. मात्र तीन आठवडे उलटूनही अद्यापही यावर निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी एमआयएमच्या सोबत राहणार का ? यावरून एमआयएमच्या गटात चिंतेचे वातावरण निर्माण झाली आहे.

दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत वंचित बहुजन आघाडी जाण्याच्या मुद्यावरून दोन्ही बाजूचे नेते सकारात्मक आहे. मात्र प्रकाश आंबेडकर यांनी जागावाटपाचा महाआघाडीला दिलेला प्रस्ताव काँग्रेसला मान्य नाही. असे असले तरीही वंचित बहुजन आघाडीने विधानसभा निवडणुकीत महाआघाडीत यावे यासाठी काँग्रेसकडून प्रयत्न सुरूच आहे. त्यामुळे महाआघाडी सोबतचा निर्णय अंतिम होईपर्यंत एमआयएमला जागावाटप बाबत शब्द देण्यासा आंबेडकर टाळत असल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे एमआयएममध्ये मात्र यावरून चिंतेचे वातावरण पाहायला  मिळत आहे.

काही दिवसांपूर्वी दिल्लीत अससोद्दिन ओवेसी, प्रकाश आंबडेकर आणि इम्तियाज जलील यांच्यात बैठक झाली होती. यावेळी एमआयएमला किती जागा हव्या आहेत, याचा प्रस्ताव द्यावा असा निर्णय घेण्यात आला होता. त्यांनतर एमआयएमने ९८ जागांचा प्रस्ताव वंचित आघाडीकडे दिला होता. मात्र त्यावर अजूनही कोणताच निर्णय एमआयएमला कळवण्यात आला नाही. त्यामुळे एमआयएमकडून इच्छुक असलेल्या उमेदवार यांची चिंता वाढली आहे.