शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

स्वत:ला राजे समजणाऱ्यांना जनतेने घरी बसवावं; 'त्या' घटनेवर प्रकाश आंबेडकर संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2024 16:16 IST

लोकशाहीत मर्यादेत राहून निवडून आलेल्या आमदाराने स्वत:वर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

बीड - उल्हासनगरची घटना दुर्दैवी आहे. राजकारणाची पातळी पूर्णपणे घसरली आहे. जिथे मसल पॉवर नव्हतं, तिथे मसल पॉवर यायला लागले, सत्ता हा पैसा असेच जोडले. या घटनेचा सर्वांनी निषेध करायला पाहिजे. तुमचे लोकशाहीत कितीही मतभेद असले तरी तुम्ही राजे नाही. तुम्हाला लोक राजे बनवतात. तेव्हा लोकशाहीत मर्यादेत राहून निवडून आलेल्या आमदाराने स्वत:वर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. असे स्वत:ला राजे समजायला लागलेत अशांना घरी बसवावं असं आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी जनतेला केले. 

बीड येथे पत्रकारांशी प्रकाश आंबेडकरांनी संवाद साधला. त्यात ते म्हणाले की, एक-दोन घटनेवरून गृहमंत्री अपयशी झालेत की पूर्ण यंत्रणा कोलमडली आहे हा प्रश्न आहे. प्रत्येकवेळी घटना घडली त्यानंतर राजीनामा द्यावा अशी मागणी होते. परंतु ती घटना घडणार नाही याकडे लक्ष दिले पाहिजे. त्यानंतरही अशा घटना घडल्या तर ते अपयशी ठरतायेत असं म्हणता येईल असं त्यांनी सांगितले. 

तर बीड येथे संताचा कार्यक्रम आहोत. त्यामुळे कुणी ना कुणी येणारच. भाजपाकडून देवेंद्र फडणवीस येतायेत. त्याच्यामुळे आम्ही एकत्र आलोय हे बोलणं अर्थ नाही. या घटनेतून फार अर्थ काढण्याची गरज नाही. मला जे काही करायचे ते उघड करत असतो. मला भाजपासोबत जायचं असं आमच्या पक्षाने ठरवले तर थांबवणार कोण?. पण मागच्या दाराने, पडद्यामागे, टेबलाखाली असं राजकारण करत नाही. जे आहे ते लोकांसमोर, पारदर्शकतेने करतो. म्हणून वंचित बहुजन आघाडीवर लोकांचा विश्वास आहे असंही प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं. 

जागावाटपाआधी भूमिका स्पष्ट होणं गरजेचे

महाविकास आघाडीत नव्याने चर्चेला सुरुवात झाली. त्यात महत्त्वाच्या मुद्द्यावर पक्षाची भूमिका काय आहे ते समजावून घेणे गरजेचे आहे. मराठा आंदोलन, ओबीसी आरक्षण आणि शेतकरी यांच्यासह २५ मुद्द्यांवर चर्चा व्हायला हवी. जागावाटपाच्या अगोदर आपल्या पक्षांची भूमिका कळायला हवी. आपण किती मुद्द्यांवर एकत्र आहोत, वेगळे आहोत त्यातून पुढे कसं जायचे हे बैठकीत ठरले. त्यानंतर या मुद्द्यांवर प्रत्येक पक्ष चर्चा करून पुढील बैठकीत विचार होईल. एक एक टप्प्याने पुढे गेलो तर आपल्याला मार्ग काढता येईल अशी माहिती प्रकाश आंबेडकरांनी दिली. 

मराठा आरक्षणावर शिंदे समितीच्या रिपोर्टनंतर निर्णय

सरकारने कुणबी समुहाच्याबाबतीत अधिसूचना काढली. मराठा आरक्षणाबाबत शिंदे समितीचा अहवाल आल्यानंतर भूमिका घेणार असं सरकारने म्हटलंय. १६ फेब्रुवारीपर्यंत अधिसूचनेवर हरकती मागितल्या आहेत. लाखो हरकती आल्यानंतर ते सरकार ऐकणार कधी हा प्रश्न आहे असंही प्रकाश आंबेडकरांनी जरांगेंच्या आंदोलनावर म्हटलं. 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरGanpat Gaikwadगणपत गायकवाडMahesh Gaikwadमहेश गायकवाड