शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
5
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
6
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
7
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
8
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
9
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
10
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
11
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
12
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
13
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
14
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
15
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
16
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
17
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
18
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
19
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...

स्वत:ला राजे समजणाऱ्यांना जनतेने घरी बसवावं; 'त्या' घटनेवर प्रकाश आंबेडकर संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2024 16:16 IST

लोकशाहीत मर्यादेत राहून निवडून आलेल्या आमदाराने स्वत:वर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

बीड - उल्हासनगरची घटना दुर्दैवी आहे. राजकारणाची पातळी पूर्णपणे घसरली आहे. जिथे मसल पॉवर नव्हतं, तिथे मसल पॉवर यायला लागले, सत्ता हा पैसा असेच जोडले. या घटनेचा सर्वांनी निषेध करायला पाहिजे. तुमचे लोकशाहीत कितीही मतभेद असले तरी तुम्ही राजे नाही. तुम्हाला लोक राजे बनवतात. तेव्हा लोकशाहीत मर्यादेत राहून निवडून आलेल्या आमदाराने स्वत:वर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. असे स्वत:ला राजे समजायला लागलेत अशांना घरी बसवावं असं आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी जनतेला केले. 

बीड येथे पत्रकारांशी प्रकाश आंबेडकरांनी संवाद साधला. त्यात ते म्हणाले की, एक-दोन घटनेवरून गृहमंत्री अपयशी झालेत की पूर्ण यंत्रणा कोलमडली आहे हा प्रश्न आहे. प्रत्येकवेळी घटना घडली त्यानंतर राजीनामा द्यावा अशी मागणी होते. परंतु ती घटना घडणार नाही याकडे लक्ष दिले पाहिजे. त्यानंतरही अशा घटना घडल्या तर ते अपयशी ठरतायेत असं म्हणता येईल असं त्यांनी सांगितले. 

तर बीड येथे संताचा कार्यक्रम आहोत. त्यामुळे कुणी ना कुणी येणारच. भाजपाकडून देवेंद्र फडणवीस येतायेत. त्याच्यामुळे आम्ही एकत्र आलोय हे बोलणं अर्थ नाही. या घटनेतून फार अर्थ काढण्याची गरज नाही. मला जे काही करायचे ते उघड करत असतो. मला भाजपासोबत जायचं असं आमच्या पक्षाने ठरवले तर थांबवणार कोण?. पण मागच्या दाराने, पडद्यामागे, टेबलाखाली असं राजकारण करत नाही. जे आहे ते लोकांसमोर, पारदर्शकतेने करतो. म्हणून वंचित बहुजन आघाडीवर लोकांचा विश्वास आहे असंही प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं. 

जागावाटपाआधी भूमिका स्पष्ट होणं गरजेचे

महाविकास आघाडीत नव्याने चर्चेला सुरुवात झाली. त्यात महत्त्वाच्या मुद्द्यावर पक्षाची भूमिका काय आहे ते समजावून घेणे गरजेचे आहे. मराठा आंदोलन, ओबीसी आरक्षण आणि शेतकरी यांच्यासह २५ मुद्द्यांवर चर्चा व्हायला हवी. जागावाटपाच्या अगोदर आपल्या पक्षांची भूमिका कळायला हवी. आपण किती मुद्द्यांवर एकत्र आहोत, वेगळे आहोत त्यातून पुढे कसं जायचे हे बैठकीत ठरले. त्यानंतर या मुद्द्यांवर प्रत्येक पक्ष चर्चा करून पुढील बैठकीत विचार होईल. एक एक टप्प्याने पुढे गेलो तर आपल्याला मार्ग काढता येईल अशी माहिती प्रकाश आंबेडकरांनी दिली. 

मराठा आरक्षणावर शिंदे समितीच्या रिपोर्टनंतर निर्णय

सरकारने कुणबी समुहाच्याबाबतीत अधिसूचना काढली. मराठा आरक्षणाबाबत शिंदे समितीचा अहवाल आल्यानंतर भूमिका घेणार असं सरकारने म्हटलंय. १६ फेब्रुवारीपर्यंत अधिसूचनेवर हरकती मागितल्या आहेत. लाखो हरकती आल्यानंतर ते सरकार ऐकणार कधी हा प्रश्न आहे असंही प्रकाश आंबेडकरांनी जरांगेंच्या आंदोलनावर म्हटलं. 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरGanpat Gaikwadगणपत गायकवाडMahesh Gaikwadमहेश गायकवाड