शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
2
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
3
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
4
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
5
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
7
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
8
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
9
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
10
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
11
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
12
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
13
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
14
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
15
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
16
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
17
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
18
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

कलम 370; सक्तीचा घेतलेला निर्णय : प्रकाश आंबेडकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2019 18:22 IST

जम्मू काश्मीरच्या जनतेला प्रेमानेही जिंकता आले असते.

मुंबई - जम्मू काश्मीरमधील 370 कलम हटवण्याचे विधयेक मोदी सरकारकडून राज्यसभेत ठेवण्यात आले आहे. त्यांनतर राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. कुठे या निर्णयाचे स्वागत होत आहे, तर काही ठिकाणी विरोध. जम्मू काश्मीरच्या जनतेला प्रेमानेही जिंकता आले असते. तर कलम 370 रद्द करण्याचा निर्णय हा चुकीच्या वेळी आणि सक्तीचा आहे. अशा शब्दात वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी या निर्णयावरून सरकारवर जोरदार टीका केली.

सरकारकडून कलम 370 हटवण्याच्या निर्णयामुळे देशभरात आनंद व्यक्त केला जात आहे. दुसरीकडे मात्र विरोधकांनी या निर्णयावर सरकारवर टीका केली आहेत. प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा मोदी सरकावर जोरदार दिला केली आहे. देश आर्थिक संकटात सापडला आहे. अशावेळी हा निर्णय घेणे चुकीचे आहे. चुकीच्या वेळी सक्तीचा निर्णय घेतला असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी भाजप सरकारवर केला आहे. तसेच भाजप आणि संघाने आपला राजकीय अजेंडा राबवण्यासाठीच कलम 370 हटवण्याच्या निर्णय घेतला असल्याचे सुद्धा आंबेडकर म्हणाले.

जम्मू-काश्मीरच्या विभाजन करण्याची घोषणा करत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्या संदर्भातील घटनादुरुस्ती विधेयक राज्यसभेत मांडलं. सरकारच्या या निर्णयामुळं जम्मू-काश्मीर व लडाख हे स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश होणार आहेत. तसेच या वर्षीच्या अखेरपर्यंत काश्मीरमध्ये निवडणुका होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Article 370कलम 370Amit Shahअमित शहाPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरJammu Kashmirजम्मू-काश्मीर