शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
2
दोन मुलांची आई १७ वर्षांच्या तरुणाच्या प्रेमात पडली, वर्ष झालं पिच्छा सोडेना, अखेर तरुणाने 'असा' शिकवला धडा! 
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
खळबळजनक! ४ लाख फॉलोअर्स असलेल्या महिला इन्फ्लुएन्सरचा कारमध्ये सापडला मृतदेह
5
"पाकिस्तान्यांचा नानांना भलताच कळवळा?, तुमचा आणि तुमच्या मालकाचा डीएनए एकच...देशद्रोह"
6
Astro Tips: शुक्र केतू युती सुखाने जगू देत नाही; आयुष्यात होते मोठे नुकसान!
7
पाकिस्तानचा हा कट्टर शत्रू तयार करतोय आत्मघातकी ड्रोनची फौज; इस्लामाबाद असो वा कराची, क्षणात होईल माती-माती!
8
'आता आणखी खेळाडू निवृत्त होतील...'; वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने केला धक्कादायक दावा
9
"लिव्ह इनमध्ये राहण्याचा खूप फायदा", मराठी अभिनेत्रीने मांडले विचार; म्हणाली, "आपले खरे रंग..."
10
आरोग्य विमा घेताना फसगत नको! 'हे' ६ प्रश्न विचाराच, अन्यथा पैसे वाया जातील!
11
लग्नाच्या ३ वर्षांनंतर आलिया भटने नावात केला मोठा बदल; हॉटेलमधील 'त्या' फोटोमुळे चर्चांना उधाण
12
डिसेंबरपासून बंद पडलंय 'या' शेअरचं ट्रेडिंग; किंमत फक्त १० रुपये, आता समोर आली मोठी अपडेट 
13
IND vs ENG : टीम इंडियातील या स्टार खेळाडूसाठी गांगुलीनं घेतला BCCI निवडकर्त्यांशी पंगा! म्हणाला...
14
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी कॅनडात खलिस्तानवाद्यांवर जोरदार कारवाई, अनेकांना अटक...
15
Raj Kushwaha : "सोनम वयाने मोठी, बॉस होती, राज फक्त नोकर"; आईने घेतली लेकाची बाजू, म्हणाली...
16
विशेष लेख: मोठ्या पवारांची भाजपच्या दारावर टकटक?
17
'PM मोदींनी आपला हट्टीपणा सोडावा', असीम मुनीरच्या अमेरिका दौऱ्यावरुन काँग्रेसची टीका
18
आजचा अग्रलेख - किती मुले केव्हा? की नकोच?
19
राज कुशवाह तर मोहरा, सोनमचं खरं प्रेम कुणीतरी दुसरंच...? राजा रघुवंशी प्रकरणात नवा 'ट्विस्ट'

अमित शहा, मोदींनी सोनिया गांधींना 'गोगलगाय' करून टाकलं : प्रकाश आंबेडकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2020 14:30 IST

एनआरसी, एनपीआरवरून केंद्र सरकारला देशात अराजकता निर्माण करायची असल्याचा आरोप आंबेडकर यांनी यावेळी केला.

मुंबई : एनआरसी, एनपीआरवरून केंद्र सरकारला देशात अराजकता निर्माण करायची आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना गोगलगाय करून टाकलं असल्याचं विधान वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. औरंगाबाद येथे वंचीत बहुजन आघाडीच्या वतीने एनआरसी,एनपीए, सीएएच्या विरोधात भटक्या विमुक्त आदिवासी परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.

नागरिकत्व कायद्यावरून आंबेडकर यांनी यावेळी केंद्रसरकारवर जोरदार निशाणा साधला. या देशात राहण्यासाठी तुम्हाला हे सिद्ध करावे लागणार आहे की, तुमचा जन्म या देशात झाला आहे. त्यासाठी तुमच्या जन्म नोंदीचा दाखला द्यावा लागणार आहे. जर तो नसेल तर तुमच्या आई-वडील किंवा आजोबांचा जन्म दाखला दाखवा लागणार आहे. ते कुठून आणणार. तर एनआरसी, एनपीआरवरून केंद्र सरकारला देशात अराजकता निर्माण करायची असल्याचा आरोप आंबेडकर यांनी यावेळी केला.

मोदींचा जन्म भारतात झाला असल्याने त्यांना नागरिकत्व देण्यात आला असल्याचं माहिती अधिकारातून समोर आले आहे. मग आमचा जन्म काय पाकिस्तान मध्ये झाला का ? असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी उपस्थित केला. तर अमित शहा आणि नरेंद्र मोदी या दोन्ही नेत्यांनी सोनिया गांधींना गोगलगाय करून ठेवलं असून, काँग्रेस पक्षाचं अस्तीत्वचं संपून टाकलं आहे. त्यामुळे ही लढाई आपल्यालाच लढावी लागणार, असल्याचेही आंबेडकर यावेळी म्हणाले.