शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
5
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
6
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
7
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
8
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
9
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
10
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
11
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
12
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
13
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
14
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
15
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
16
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
17
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
18
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
19
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
20
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक

Maharashtra Politics: महाविकास आघाडीच्या महामोर्चात सहभागी का झाले नाही? प्रकाश आंबेडकरांनी स्पष्टच सांगितले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2022 19:00 IST

Maharashtra News: महाविकास आघाडीत सामील होण्यासाठी प्रयत्नशील असलेले प्रकाश आंबेडकर महामोर्चात सहभागी का झाले नाहीत, यावरून राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

Maharashtra Politics: छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारींसह भाजप नेत्यांनी केलेली अपमानास्पद विधाने, सीमावादप्रश्न, महागाईल, बेरोजगारी यांसह अनेक मुद्द्यांवर महाविकास आघाडीने मुंबईत महामोर्चा काढला. या मोर्चात तीनही पक्षाचे हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते. याशिवाय महाविकास आघाडीचे अनेक आघाडीचे नेते मोर्चात होते. मात्र, महाविकास आघाडीत सामील होऊ इच्छिणारे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर या महामोर्चात सहभागी झाले नव्हते. यावर आंबेडकर यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. 

प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, भाजपवर मीच जास्त टीका करतो. चाळीस वर्षे राजकारणात आहे, पण डाग नाही. सगळे डागळलेले आहेत. भाजपचा सामाजिक आणि राजकीय लढ्यात सहभाग नाही. त्यामुळे त्यांच्याकडे सिम्बॉल्स नाही, त्यामुळे जे सिम्बॉल्स आहे, त्याला काळे फासण्याचे काम सुरू आहे, अशी घणाघाती टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली. 

महाविकास आघाडीच्या महामोर्चात सहभागी का झाले नाही?

महाविकास आघाडीच्या महामोर्चावर बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, हा मोर्चा महाविकास आघाडीचा आहे. आम्हाला घ्यायला मतभेद आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा आम्हाला घ्यायला विरोध आहे. त्यामुळे आमच्या जाण्याचा संबंध येत नाही. आम्हाला सोबत घेण्याबाबत उद्धव ठाकरे यांनी निर्णय घ्यावा. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला गरिबाला सत्तेत येऊच द्यायचे नाही. हा मोर्चा शिवसेनेचा आहे, नावाला फक्त काँग्रेस आणि राष्ट्रवादी आहे. उद्धव ठाकरे यांनी फक्त असे कळवले होते की, आम्ही वंचितला महाविकास आघाडीमध्ये घ्यायचा विचार करू. पण, अजित पवार म्हणाले की, हा प्रश्न अजून विचाराधीन आहे. याचाच अर्थ नाही असा होतो, असे स्पष्ट मत प्रकाश आंबेडकर यांनी मांडले. 

दरम्यान, सीमावाद प्रकरणी राष्ट्रवादी आणि काँग्रेस दोषी आहेत. त्यामुळे आम्ही शिवसेनेच्या सोबत जाण्यास तयार आहोत. पण राष्ट्रवादी-काँग्रेस यांच्यासोबत जाण्यापेक्षा एकटे लढू, भाजपासोबतही आम्ही जाणार नाही. आता अविकसित गावे शिवसेनेवर आरोप करण्याची शक्यता आहे. कारण ते राष्ट्रवादीचे नाकर्तेपण आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रवादीचे शिंतोडे शिवसेना आपल्यावर का उडवून घेत आहे? असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केला. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरMahavikas Aghadiमहाविकास आघाडीVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडी