शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
3
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
6
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
7
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
8
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
9
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
10
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
11
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
12
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
13
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
14
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
15
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
16
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
17
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
18
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
19
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
20
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
Daily Top 2Weekly Top 5

  वीज दरवाढ आणि वस्तुस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2018 01:35 IST

वीज दरवाढीच्या याचिकेनंतर गदारोळ सुरू आहे; तो महावितरणची थकीत वसुली व त्यावरील व्याज-दंडव्याजाची सुमारे ३० हजार कोटींविषयी. हे ३० हजार कोटी वसूल करण्यासाठी वीजदर ३५ टक्क्यांनी वाढणार आहेत, असा आरोप होत आहे .

- विश्वास पाठकवीज दरवाढीच्या याचिकेनंतर गदारोळ सुरू आहे; तो महावितरणची थकीत वसुली व त्यावरील व्याज-दंडव्याजाची सुमारे ३० हजार कोटींविषयी. हे ३० हजार कोटी वसूल करण्यासाठी वीजदर ३५ टक्क्यांनी वाढणार आहेत, असा आरोप होत आहे . हा केवळ कांगावा आहे. थकीत वसुलीसाठी दरवाढ ही बाब कोणत्याही कायद्यात बसत नाही. त्यामुळे त्याच्या वसुलीसाठी दरवाढ होणार आहे, असे म्हणणे चुकीचे आहे.वस्तुस्थिती अशी आहे की महावितरणने वर्ष २०१८-१९साठी वीजदरात १५ टक्के म्हणजेच ३० हजार कोटींची दरवाढ आयोगाकडे मागितली आहे. आणि २०१९-२०मध्ये कुठलीही दरवाढ मागितलेली नाही. हे ३० हजार व थकीत वसुलीचा आकडापण ३० हजार असल्याने बुद्धिभेद करण्यास वाव मिळत आहे. आता ही ३० हजारांची दरवाढ का मागितली आहे हे तपासून पाहू या. सन २०१५पर्यंत महावितरण आयोगाकडे दरवर्षी प्रस्ताव घेऊन जात असे. प्रस्तावात नेहमीच भविष्याचा वेध असतो. बरेचसे आराखडे व अंदाज असतात. कालावधीच्या शेवटी त्याचा हिशेब होतो व आयोग खर्चाला मंजुरी देते. जसे आपण भारताचा अर्थसंकल्प सादर करतो व वर्षाअखेर तो तुटीचा की शिलकी हे काळच ठरवितो. वीज क्षेत्रात, २०१५नंतर पाच वर्षांचे ‘मल्टी ईअर टॅरीफ’ ही संकल्पना अस्तित्वात आली. म्हणजेच महावितरणने २०१५ साली पाच वर्षांसाठी साधारणत: ३ लाख कोटींचा प्रस्ताव सादर केला. आणि आता जी प्रस्तावित दरवाढ २०१८-१९मध्ये मागितली आहे ती ह्या पाच वर्षांसाठी अंदाजित व प्रत्यक्ष खर्चामध्ये तफावत म्हणून मागितलेली दरवाढ आहे. म्हणजेच ३ लाख कोटींच्या समोर ३० हजार कोटी म्हणजे १० टक्के एवढी तफावत जी स्वीकारण्यासारखीच आहे. अगदी प्रोफेशनल कंपन्यांमध्येदेखील आॅडिटेड व अनआॅडिटेड आकड्यांमध्ये २० टक्के तफावत स्वीकारार्ह असते.हे ३० हजार कुठून आले हे समजून घेऊ या. महावितरणने पाच वर्षांचा आराखडा मांडताना काही अंदाज मांडले होते; जे आयोगाने तपासून, सुधारणा करून ठरावीक खर्चाला मान्यता दिली. त्यात आणि वस्तुस्थितीमध्ये बदल झाला. जसे संचलन व सुव्यवस्थेवरील खर्चात ५ हजार कोटींची तूट, उच्चदाब औद्योगिक ग्राहकांच्या वापरात झालेली घट, कृषी ग्राहकांच्या वापरात झालेली वाढ, ओपन एक्सेसमध्ये स्थलांतरित झालेले ग्राहक, वेळेत वसुलीची परवानगी न मिळाल्याने ४ हजार कोटींची कॅरिंग कॉस्ट आदी.उच्चदाब औद्योगिक ग्राहक, वाणिज्यिक ग्राहक यांच्या भरोशावर शेतकरी वर्गाला आपण क्रॉससबसिडीच्या माध्यमातून स्वस्तात वीजपुरवठा करीत असतो. त्यामुळे कृषी ग्राहकांमध्ये वाढ व औद्योगिक ग्राहकांच्या वापरात घट झाली व खर्चाची तूट निर्माण होते. त्याकरिता आयोगाकडे धाव घ्यावी लागते. हे केवळ महाराष्ट्रातच नाही, तर देशातल्या सर्वच राज्यांमध्ये किंबहुना अनेक देशांत हाच पॅटर्न आहे. कृषी वीजवापर हा महाराष्ट्रात सर्वांत जास्त आहे ही बाब उल्लेखनीय आहे. म्हणूनच महाराष्ट्रात इतर ग्राहकांना वीजदर इतर राज्यांच्या तुलनेत जास्त मोजावा लागतो.(लेखक हे महावितरण, महानिर्मिती, महापारेषण आणि एमएसईबी सूत्रधारी कंपनीचे संचालक आहेत.)

टॅग्स :electricityवीजMaharashtraमहाराष्ट्र