शहरं
Join us  
Trending Stories
1
अर्धे मतदार गेले तरी कुठे? महाराष्ट्रात ५४.३३ टक्के, तर देशात सरासरी ६०.३९ टक्के मतदान
2
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ
3
मी दारू पितो, माझ्याकडे परवाना नाही; तरीही वडिलांनीच कार दिली; ‘ब्रह्मा ग्रुप’चे विशाल अग्रवाल यांच्यासह चार जणांवर गुन्हा
4
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; मृतांमध्ये परराष्ट्रमंत्र्यांसह अधिकाऱ्यांचाही समावेश
5
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
6
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
7
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
8
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
9
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
10
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
11
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
12
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
13
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
14
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
16
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
17
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
18
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
19
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
20
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप

पोस्टमनचा बेजबाबदारपणा, केली शेकडो आधार कार्डची शेकोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2017 8:18 PM

अमरावती -  चिखलदरा  परिसरातील नागरिकांचे आलेले शेकडो आधारकार्ड वितरित न करता निलंबित पोस्टमनने घरात ठेवले. थंडीचे दिवस पाहता त्याच्या मुलाने पहाटे त्याची शेकोटी पेटवून हात शेकण्यासाठी वापर केल्याचा धक्कादायक प्रकार तालुक्यातील काटकुंभ येथे गुरुवारी पहाटे ७.३० वाजता काही नागरिकांमुळे उघडकीस आला.गुरूवारी सकाळी ७.३० वाजताच्या दरम्यान निलंबित पोष्टमनच्या मुलाने घरानजीक शेकोटी पेटविल्याने ...

अमरावती -  चिखलदरा  परिसरातील नागरिकांचे आलेले शेकडो आधारकार्ड वितरित न करता निलंबित पोस्टमनने घरात ठेवले. थंडीचे दिवस पाहता त्याच्या मुलाने पहाटे त्याची शेकोटी पेटवून हात शेकण्यासाठी वापर केल्याचा धक्कादायक प्रकार तालुक्यातील काटकुंभ येथे गुरुवारी पहाटे ७.३० वाजता काही नागरिकांमुळे उघडकीस आला.गुरूवारी सकाळी ७.३० वाजताच्या दरम्यान निलंबित पोष्टमनच्या मुलाने घरानजीक शेकोटी पेटविल्याने परिसरातील काही नागरिकांचे त्याकडे लक्ष गेले. निरीक्षण केले असता आधारकार्ड जाळत असल्याचे दिसले. त्यावर संशय बळावला. आधार कार्ड, एटीएम कार्ड जाळत असल्याचे दिसल्याने नागरिकांनी विझवून आधारकार्ड बाजूला काढले. आतापर्यंत किमान चारशेच्यावर आधारकार्ड जाळल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.दस्तऐवज गेले कुठे ?काटकुंभ परिसरातील नागरिकांचा व्यवहार आजही मोठ्या प्रमाणात पोष्ट कार्यालयावर अवलंबून आहे. परिणामी विद्यार्थ्यांना परीक्षेचे वेळापत्रक, हॉल तिकीट, आधारकार्ड, एटीएम कार्ड, शासकीय दस्तावेज आदी संबंधीत कार्यालयातून पाठविवरही नागरिकांना ते मिळतच नसल्याची ओरड वर्षभरापासून सुरू आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.चिखलदरा तालुक्यातील काटकुंभ येथील पोस्टमन प्रकाश रामदयाल मालवीय हा सहा महिन्यांपासून निलंबित आहे. त्याने काटकुंभ येथील शेतात मळणीसाठी ठेवलेल्या सोयाबीन गंजीला पेटवून दिले होते. नागरिकांनी त्याला चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले होते. त्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले.

काटकुंभ येथे आधारकार्ड जाळण्यात आले काय, याची माहिती घेतली जात आहे. नागरिकांची अजूनपर्यंत तक्रार आलेली नाही. आम्ही तपास सुरू केला आहे.- जहीर अहमद,पोस्ट मास्तर, परतवाडा

टॅग्स :Adhar Cardआधार कार्डMaharashtraमहाराष्ट्र