शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

सावज चालून आले आणि मोठी शिकार साधली गेली..! शिवसेनेसोबतच वैचारिक मतभेद आणि शत्रुत्वही वाढले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2021 12:42 IST

अध्यक्षांच्या दालनात काय घडले, हे सभागृहात सांगण्याची परंपरा नाही. त्यामुळे तिकडे काय घडले हे सभागृहात कोणी बोलणार नाही या समजुतीत भाजप नेते राहिले.

अतुल कुलकर्णी -मुंबई : सावज टप्प्यात येईपर्यंत शिकार करायची नाही, असे सुधाकरराव नाईक म्हणायचे. मात्र, सोमवारी सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारच्या टप्प्यात आयतेच सावज चालून आले आणि भाजपच्या १२ आमदारांच्या निलंबनाची शिकार त्यांना साधता आली. या एकाच घटनेमुळे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस तिन्ही पक्षांनी खूप काही साध्य केले. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सरकार राहील की जाईल, या प्रश्नाला आता आमदारांचे निलंबन मागे घेईपर्यंत तरी पूर्णविराम लागला आहे.  अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सरकारची मोठी राजकीय सरशी झाली.या सगळ्यात पडद्याआड अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी कळीची भूमिका निभावली. इम्पिरिकल डाटा’ केंद्राने त्वरित द्यावा, असा ठराव तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी विधानसभेत मंजूर केला. गदारोळात सभागृहाचे कामकाज तहकूब झाले. त्यानंतर जाधव उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या दालनात गेले. त्या वेळी ते दोघेच तेथे होते. मात्र, अचानक विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तेथे आले. त्यांच्या पाठोपाठ गिरीश महाजन, संजय कुटे, आशीष शेलार व अन्य दोन आमदारही गेले. फडणवीस गुस्स्यातच होते. त्यांना आलेला राग पाहून भाजपच्या आमदारांनाही चेव चढला. त्यातच शिवसेनेचे अकोले बाळापूरचे आमदार नितीन देशमुख आत आले. त्यांच्यात आणि गिरीश महाजन यांच्यात हातापाई झाली. मंत्री गुलाबराव पाटील, आ. दिलीप बनकर, आ. सुहास कांदे हेही आत घुसले. आत गेलेल्यांनी दालनाचे दार आतून बंद केले. वाद वाढत गेला. आवाज चढत गेले. त्याचवेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे व जलसंपदा मंत्री जयंत पाटील बाहेरून दार ठोठावत होते. पाच ते सात मिनिटांनी दार उघडले गेले तेव्हा आतमध्ये चुकीचे घडल्याचे आशीष शेलार यांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ भास्कर जाधव यांची माफी मागितली. पण जाधव यांनी आधी लाथा मारता आणि नंतर माफी का मागता, असे सुनावले. तर मंत्री नवाब मलिक मुख्यमंत्री ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे गेले. आपण आता गप्प बसलो तर ही मारामारी रस्त्यांवर सुरू होईल. तातडीने निलंबन केले पाहिजे, असा सूर त्यांनी लावला. संसदीय कार्यमंत्री अनिल परब स्वत: सचिव राजेंद्र भागवत यांच्या दालनात गेले. तेथे गोंधळ करणाऱ्या आमदारांची यादी तयार केली गेली. ती घेऊन परब धावतच मुख्यमंत्र्यांकडे गेले. अध्यक्षांच्या दालनात काय घडले, हे सभागृहात सांगण्याची परंपरा नाही. त्यामुळे तिकडे काय घडले हे सभागृहात कोणी बोलणार नाही या समजुतीत भाजप नेते राहिले. मात्र मलिक यांनी ते सभागृहाला कळाले पाहिजे असे सांगून घटनाक्रम ‘रेकॉर्डवर’ आणण्याचा सल्ला दिला. त्याला सरकारमधील ज्येष्ठ नेत्यांनी दुजोरा दिला व पुन्हा तालिका अध्यक्ष म्हणून जाधव सभागृहात आले.  अध्यक्षांनी आपबीती सांगितली पाहिजे, अशी मागणी मलिक यांनी केली. जाधव यांनी अध्यक्षांच्या आसनावरून घटनाक्रम सांगितला. हे असे विधानसभेत पहिल्यांदा घडले. यात भाजपची रणनीती फसली. फडणवीस यांनी विधानसभेतही, ‘एक दोन लोकांचे शब्द चांगले नव्हते, त्याबद्दल आम्ही माफीही मागितली’ असे सांगून घडला प्रकार मान्यच केला.दरवेळी भाजप आक्रमक होते आणि आपण ‘बॅकफूट’वर जातो. आतासुद्धा कारवाई केली नाही तर काम करणे अवघड होईल, अशी चर्चा तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांमध्ये झाली. दोनच दिवसांपूर्वी फडणवीस यांनी आमचे शिवसेनेशी शत्रुत्व नाही, पण वैचारिक मतभेद आहेत, असे सांगितले होते पण आजच्या घटनेने शत्रुत्व आणि वैचारिक मतभेदांची दरी दोन्हीत वाढ झाल्याचे दिसले.

या घटनेचा महाविकास आघाडीला फायदा -

- शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या घटनेने आणखी जवळ आली. सरकारच्या स्थिरतेचा प्रश्न दूर झाला.- १२ आमदारांचे निलंबन रद्द करायचे असेल तर सत्ताधाऱ्यांची ‘बार्गेनिंग’ ताकद वाढली.- या घटनेने भाजपचे संख्याबळ १०६ वरून ९४ झाले आहे. २८८ सदस्य संख्या असणाऱ्या विधानसभेत काँग्रेसच्या एका आमदाराचे निधन झाले आहे. आता बहुमत सिद्ध करण्यासाठी १३८ आमदारांची गरज आहे. अशा स्थितीत शिवसेना ५६, राष्ट्रवादी ५३ आणि काँग्रेस ४३ असे एकूण १५२ सदस्य सभागृहात आहेत. शिवाय अन्य ९ सदस्य सरकार सोबत आहेत. त्यामुळे सरकार राहणार की जाणार, या चर्चेला काही काळ तरी विराम मिळाला आहे.    - ओबीसींचा इम्पिरिकल डाटा केंद्राकडून मागवण्याच्या विषयावर एवढा राडा झाला. त्यामुळे भाजप केंद्राच्या बाजूने व ओबीसींच्या विरोधी आहे, असे म्हणायला सत्ताधारी मोकळे झाले.-त्यातच मराठा आरक्षणाचा ठराव सभागृहात मंत्री अशोक चव्हाण मांडत असताना त्यावर बोलण्याची संधी गमावून भाजपने मराठा समाजाच्या बाजूने बोलण्याचीही संधी गमावली.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाVidhan Bhavanविधान भवनBJPभाजपाShiv Senaशिवसेना