शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

सावज चालून आले आणि मोठी शिकार साधली गेली..! शिवसेनेसोबतच वैचारिक मतभेद आणि शत्रुत्वही वाढले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2021 12:42 IST

अध्यक्षांच्या दालनात काय घडले, हे सभागृहात सांगण्याची परंपरा नाही. त्यामुळे तिकडे काय घडले हे सभागृहात कोणी बोलणार नाही या समजुतीत भाजप नेते राहिले.

अतुल कुलकर्णी -मुंबई : सावज टप्प्यात येईपर्यंत शिकार करायची नाही, असे सुधाकरराव नाईक म्हणायचे. मात्र, सोमवारी सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारच्या टप्प्यात आयतेच सावज चालून आले आणि भाजपच्या १२ आमदारांच्या निलंबनाची शिकार त्यांना साधता आली. या एकाच घटनेमुळे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस तिन्ही पक्षांनी खूप काही साध्य केले. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सरकार राहील की जाईल, या प्रश्नाला आता आमदारांचे निलंबन मागे घेईपर्यंत तरी पूर्णविराम लागला आहे.  अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सरकारची मोठी राजकीय सरशी झाली.या सगळ्यात पडद्याआड अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी कळीची भूमिका निभावली. इम्पिरिकल डाटा’ केंद्राने त्वरित द्यावा, असा ठराव तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी विधानसभेत मंजूर केला. गदारोळात सभागृहाचे कामकाज तहकूब झाले. त्यानंतर जाधव उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या दालनात गेले. त्या वेळी ते दोघेच तेथे होते. मात्र, अचानक विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तेथे आले. त्यांच्या पाठोपाठ गिरीश महाजन, संजय कुटे, आशीष शेलार व अन्य दोन आमदारही गेले. फडणवीस गुस्स्यातच होते. त्यांना आलेला राग पाहून भाजपच्या आमदारांनाही चेव चढला. त्यातच शिवसेनेचे अकोले बाळापूरचे आमदार नितीन देशमुख आत आले. त्यांच्यात आणि गिरीश महाजन यांच्यात हातापाई झाली. मंत्री गुलाबराव पाटील, आ. दिलीप बनकर, आ. सुहास कांदे हेही आत घुसले. आत गेलेल्यांनी दालनाचे दार आतून बंद केले. वाद वाढत गेला. आवाज चढत गेले. त्याचवेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे व जलसंपदा मंत्री जयंत पाटील बाहेरून दार ठोठावत होते. पाच ते सात मिनिटांनी दार उघडले गेले तेव्हा आतमध्ये चुकीचे घडल्याचे आशीष शेलार यांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ भास्कर जाधव यांची माफी मागितली. पण जाधव यांनी आधी लाथा मारता आणि नंतर माफी का मागता, असे सुनावले. तर मंत्री नवाब मलिक मुख्यमंत्री ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे गेले. आपण आता गप्प बसलो तर ही मारामारी रस्त्यांवर सुरू होईल. तातडीने निलंबन केले पाहिजे, असा सूर त्यांनी लावला. संसदीय कार्यमंत्री अनिल परब स्वत: सचिव राजेंद्र भागवत यांच्या दालनात गेले. तेथे गोंधळ करणाऱ्या आमदारांची यादी तयार केली गेली. ती घेऊन परब धावतच मुख्यमंत्र्यांकडे गेले. अध्यक्षांच्या दालनात काय घडले, हे सभागृहात सांगण्याची परंपरा नाही. त्यामुळे तिकडे काय घडले हे सभागृहात कोणी बोलणार नाही या समजुतीत भाजप नेते राहिले. मात्र मलिक यांनी ते सभागृहाला कळाले पाहिजे असे सांगून घटनाक्रम ‘रेकॉर्डवर’ आणण्याचा सल्ला दिला. त्याला सरकारमधील ज्येष्ठ नेत्यांनी दुजोरा दिला व पुन्हा तालिका अध्यक्ष म्हणून जाधव सभागृहात आले.  अध्यक्षांनी आपबीती सांगितली पाहिजे, अशी मागणी मलिक यांनी केली. जाधव यांनी अध्यक्षांच्या आसनावरून घटनाक्रम सांगितला. हे असे विधानसभेत पहिल्यांदा घडले. यात भाजपची रणनीती फसली. फडणवीस यांनी विधानसभेतही, ‘एक दोन लोकांचे शब्द चांगले नव्हते, त्याबद्दल आम्ही माफीही मागितली’ असे सांगून घडला प्रकार मान्यच केला.दरवेळी भाजप आक्रमक होते आणि आपण ‘बॅकफूट’वर जातो. आतासुद्धा कारवाई केली नाही तर काम करणे अवघड होईल, अशी चर्चा तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांमध्ये झाली. दोनच दिवसांपूर्वी फडणवीस यांनी आमचे शिवसेनेशी शत्रुत्व नाही, पण वैचारिक मतभेद आहेत, असे सांगितले होते पण आजच्या घटनेने शत्रुत्व आणि वैचारिक मतभेदांची दरी दोन्हीत वाढ झाल्याचे दिसले.

या घटनेचा महाविकास आघाडीला फायदा -

- शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या घटनेने आणखी जवळ आली. सरकारच्या स्थिरतेचा प्रश्न दूर झाला.- १२ आमदारांचे निलंबन रद्द करायचे असेल तर सत्ताधाऱ्यांची ‘बार्गेनिंग’ ताकद वाढली.- या घटनेने भाजपचे संख्याबळ १०६ वरून ९४ झाले आहे. २८८ सदस्य संख्या असणाऱ्या विधानसभेत काँग्रेसच्या एका आमदाराचे निधन झाले आहे. आता बहुमत सिद्ध करण्यासाठी १३८ आमदारांची गरज आहे. अशा स्थितीत शिवसेना ५६, राष्ट्रवादी ५३ आणि काँग्रेस ४३ असे एकूण १५२ सदस्य सभागृहात आहेत. शिवाय अन्य ९ सदस्य सरकार सोबत आहेत. त्यामुळे सरकार राहणार की जाणार, या चर्चेला काही काळ तरी विराम मिळाला आहे.    - ओबीसींचा इम्पिरिकल डाटा केंद्राकडून मागवण्याच्या विषयावर एवढा राडा झाला. त्यामुळे भाजप केंद्राच्या बाजूने व ओबीसींच्या विरोधी आहे, असे म्हणायला सत्ताधारी मोकळे झाले.-त्यातच मराठा आरक्षणाचा ठराव सभागृहात मंत्री अशोक चव्हाण मांडत असताना त्यावर बोलण्याची संधी गमावून भाजपने मराठा समाजाच्या बाजूने बोलण्याचीही संधी गमावली.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाVidhan Bhavanविधान भवनBJPभाजपाShiv Senaशिवसेना