शहरं
Join us  
Trending Stories
1
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
2
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
3
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
4
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
5
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
6
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
7
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
8
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
9
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
10
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
11
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

एफआयआर घेण्यास पोलीस करतात टाळाटाळ, वर्षभरात ६४९ तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 04:43 IST

मुख्यमंत्री, वरिष्ठ पोलीस अधिका-यांनी कितीही वेळा स्पष्ट आदेश दिले असले तरी नागरिकांची तक्रार, फिर्याद दाखल करून घेण्याबाबत पोलिसांकडून टाळाटाळ होते, हे राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाकडे आलेल्या तक्रारीवरून स्पष्ट झाले आहे.

मुंबई : मुख्यमंत्री, वरिष्ठ पोलीस अधिका-यांनी कितीही वेळा स्पष्ट आदेश दिले असले तरी नागरिकांची तक्रार, फिर्याद दाखल करून घेण्याबाबत पोलिसांकडून टाळाटाळ होते, हे राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाकडे आलेल्या तक्रारीवरून स्पष्ट झाले आहे. गेल्या वर्षभरात प्राधिकरणाकडे तब्बल ६४९ अर्ज दाखल झाले असून त्यापैकी १९६ तक्रारींची सोडवणूक करण्यात आली आहे.प्राधिकरणाचे अध्यक्ष व उच्च न्यायालयातील निवृत्त न्या. ए.व्ही. पोतदार, सदस्य व निवृत्त आयपीएस अधिकारी पी.के. जैन आणि सदस्य सचिव असलेले अप्पर महासंचालक (आस्थापना) राजेंद्र सिंह यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन वर्षभरातील कार्यवाहीचा आढावा घेतला.सर्वोच्च न्यायालयाने पोलिसांकडून होणाºया अन्यायाप्रकरणी दाखल असलेल्या एका खटल्याबाबत २२ सप्टेंबर २००६ रोजी दिलेल्या निर्देशानुसार २०१४ महाराष्टÑ पोलीस अधिनियमांतर्गत त्यात सुधारणा करून राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाची तरतूद करण्यात आली. प्रत्यक्षात ती २ जानेवारी २०१७ पासून कार्यान्वित झाली आहे. सध्या या प्राधिकरणासह अडीच महिन्यांपासून पुण्यात विभागीय तक्रार प्राधिकरण सुरू झाले आहे. त्याशिवाय औरंगाबाद, नागपूर, नवी मुंबई, अमरावती व नाशिक या ठिकाणी विभागीय प्राधिकरण कार्यरत केली जाणार आहेत. गेल्या वर्षभरात प्राधिकरणाकडे आलेल्या ६४९ तक्रारींपैकी १९६ तक्रारींची निर्गत, तर २५९ प्रकरणांची सुनावणी सुरू आहे. १९४ प्रकरणांची तपासणी सुरू असल्याचे अध्यक्ष पोतदार यांनी सांगितले. बहुतांश तक्रारी या पोलिसांकडून फिर्याद दाखल न करून घेणे, अधिकाराचा गैरवापर करणे आदीबाबत आहेत.अर्जदाराने प्रतिज्ञापत्रासह तक्रार दिल्यानंतर त्याची छाननी करून आवश्यकतेनुसार सुनावणी घेतली जाते. त्यासाठी संबंधित पोलीस ठाणे, अधिकाºयांकडे विचारणा करून खुलासा मागविण्यात येतो. त्यानंतर संबंधित पोलीस अधिकारी दोषी आढळल्यास त्याविरुद्ध कारवाई करण्याची शिफारस प्राधिकरणाकडून केली जात आहे. शासनाला या आदेशाची अंमलबजावणी करणे किंवा त्याबाबतचे स्पष्टीकरण सादर करणे अनिवार्य आहे. त्याचप्रमाणे चौकशीमध्ये अर्जदाराने मुद्दामहून खोटी तक्रार केल्याचे स्पष्ट झाल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली जाते. मात्र न्यायालय, राज्य मानवी हक्क आयोग किंवा लोकायुक्तांकडे एखादा खटला प्रलंबित असल्यास त्याची सुुनावणी प्राधिकरणाकडून केली जात नाही, असे पी.के. जैन यांनी सांगितले.गेल्या वर्षी कुर्ल्यामध्ये एका विद्यार्थ्याला विनाकारण पोलीस ठाण्यात बसवून मानसिक त्रास देण्यात आल्याचे एका प्रकरणातून स्पष्ट झाले. त्यामुळे त्याबाबत दोषी आढळणाºया अधिकाºयाची विभागीय चौकशी करून त्याबाबतची नोंद सेवा पटलात केली जावी, असे आदेश देण्यात आले होते, असे सदस्य जैन यांनी सांगितले.प्राधिकरणाचे अधिकार : नागरिकांनी दाखल केलेल्या तक्रारीची शहानिशा करून संबंधित दोषी अधिकाºयावर खातेनिहाय चौकशी, वेतन कपात करण्याची शिफारस प्राधिकरण करू शकते. या आदेशाची अंमलबजावणी करणे शासनाला बंधनकारक आहे. त्याचप्रमाणे एखाद्या घटनेबाबत स्वत:हून तक्रार दाखल करून घेऊन संबंधिताविरुद्ध सुनावणी घेऊन कारवाई करण्याची तरतूद कायद्यात असल्याचे अध्यक्ष ए.व्ही. पोतदार यांनी सांगितले.तक्रारी करण्याचे आवाहन : पोलीस कॉन्स्टेबलपासून ते अप्पर अधीक्षक दर्जापर्यंतच्या अधिकाºयाविरुद्ध तक्रारीची सुनावणी घेण्याचे अधिकार प्राधिकरणाला आहेत. त्यामुळे नागरिकांनी निर्भीडपणे तक्रार करण्याचे आवाहन अध्यक्ष न्या. पोतदार व सदस्य पी.के. जैन यांनी केले. तक्रारीचे प्रमाण वाढल्यानंतर पोलिसांकडून होणारी एफआयआर दाखल करण्यातील दिरंगाई कमी होईल, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Policeपोलिस