शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
2
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
3
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
4
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
5
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
6
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
7
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
8
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
9
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
10
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
11
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
12
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
13
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
14
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
15
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
16
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
17
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
18
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
19
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
20
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार

मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेला आंदोलकांची धास्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2019 09:53 IST

जनतेची प्रश्न आणि समस्या मांडण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी जाणाऱ्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना पोलीस ताब्यात घेत आहे.

मुंबई - विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेल्या महाजनादेश यात्रेला ठिकठिकाणी होत असलेल्या विरोध पाहता आंदोलकांना पोलीस नजरकैदेत ठेवत असल्याचे समोर आले आहे. ज्या-ज्या जिल्ह्यात ही यात्रा जात आहे. तिथे विरोधी पक्षातील कार्यकर्ते,सामाजिक कार्यकर्ते आणि शेतकरी नेत्यांना पोलीस स्थानबद्ध करत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेशाला आंदोलकांची भीती वाटत आहे का? अशी चर्चा पाहायला मिळत आहे.

भाजपच्या जनादेशाला आंदोलकांची भीती वाटत असल्याने पोलिसांचा वापर करून विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात येत असल्याचा आरोप विरोधक करत आहे. त्यातच जिथे-जिथे मुख्यमंत्री यांची महाजनादेश यात्रा जात आहे. त्याआधीच पोलीस आंदोलकांना ताब्यात घेत असल्याचे पहायला मिळत आहे. मंगळवारी औरंगाबादेत महाजनादेश यात्रापूर्वीच पोलिसांनी १८ जणांना ताब्यात घेतले होते. त्याआधी खामगाव,बीड,यवतमाळ,अकोला याशिवाय अनेक ठिकाणी पोलिसांनी शेकडो लोकांना ताब्यात घेतले होते.

एकीकडे जनादेश घेवून जाणार असल्याचे मुख्यमंत्री आपल्या प्रत्येक सभेत सांगत आहे. मात्र दुसरीकडे त्याच जनतेचे आवाज दाबण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याचा आरोप होत आहे. जनतेची प्रश्न आणि समस्या मांडण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी जाणाऱ्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना पोलीस ताब्यात घेत आहे. एक प्रकारे त्यांचा आवाज दाबण्याचा हा प्रकार असल्याचा दावा विरोधकांनी केला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेशाला आंदोलकांची भीती वाटत असल्याचे बोलले जात आहे.