शहरं
Join us  
Trending Stories
1
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
2
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
3
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
4
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
5
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
6
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
7
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
8
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?
9
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
10
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
11
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
12
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर
13
४२ वर्षांच्या लढ्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंच झाले आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या: सरन्यायाधीश
14
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स्ड व्याज; पाहा कोणती आहे स्कीम
15
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
16
RTIच्या सराईतांचा खेळ आता खल्लास! १० हजार अपील फेटाळले; राज्य माहिती आयोगाचा चाप
17
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
18
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
19
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
20
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला

मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेला आंदोलकांची धास्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2019 09:53 IST

जनतेची प्रश्न आणि समस्या मांडण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी जाणाऱ्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना पोलीस ताब्यात घेत आहे.

मुंबई - विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेल्या महाजनादेश यात्रेला ठिकठिकाणी होत असलेल्या विरोध पाहता आंदोलकांना पोलीस नजरकैदेत ठेवत असल्याचे समोर आले आहे. ज्या-ज्या जिल्ह्यात ही यात्रा जात आहे. तिथे विरोधी पक्षातील कार्यकर्ते,सामाजिक कार्यकर्ते आणि शेतकरी नेत्यांना पोलीस स्थानबद्ध करत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेशाला आंदोलकांची भीती वाटत आहे का? अशी चर्चा पाहायला मिळत आहे.

भाजपच्या जनादेशाला आंदोलकांची भीती वाटत असल्याने पोलिसांचा वापर करून विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात येत असल्याचा आरोप विरोधक करत आहे. त्यातच जिथे-जिथे मुख्यमंत्री यांची महाजनादेश यात्रा जात आहे. त्याआधीच पोलीस आंदोलकांना ताब्यात घेत असल्याचे पहायला मिळत आहे. मंगळवारी औरंगाबादेत महाजनादेश यात्रापूर्वीच पोलिसांनी १८ जणांना ताब्यात घेतले होते. त्याआधी खामगाव,बीड,यवतमाळ,अकोला याशिवाय अनेक ठिकाणी पोलिसांनी शेकडो लोकांना ताब्यात घेतले होते.

एकीकडे जनादेश घेवून जाणार असल्याचे मुख्यमंत्री आपल्या प्रत्येक सभेत सांगत आहे. मात्र दुसरीकडे त्याच जनतेचे आवाज दाबण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याचा आरोप होत आहे. जनतेची प्रश्न आणि समस्या मांडण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी जाणाऱ्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना पोलीस ताब्यात घेत आहे. एक प्रकारे त्यांचा आवाज दाबण्याचा हा प्रकार असल्याचा दावा विरोधकांनी केला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेशाला आंदोलकांची भीती वाटत असल्याचे बोलले जात आहे.