शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
2
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
3
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
4
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
5
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
6
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
7
प्राध्यापकानेच रचला विभागप्रमुखाच्या हत्येचा कट, माजी विद्यार्थ्यांना दिली सुपारी, विमानाने बोलावले शूटर, अखेर...  
8
Gulabjamun Recipe: ना मावा, ना मिल्कपावडर; घरच्या साहित्यात १५ मिनिटांत करा फर्स्ट क्लास गुलाबजाम 
9
आसिफ अली झरदारींनी काश्मीरबाबत ओकली गरळ; पाकिस्तानी स्वातंत्र्यदिनी भारताला तोडण्याची भाषा
10
“नाल्यांमुळे RSS गंगा प्रदुषित झाली”; भाजपात आयाराम संस्कृतीवर स्वामी गोविंददेवगिरींची टीका
11
नवऱ्यापासून सुटका झाली, पण घटस्फोटानंतर थायरॉइड कॅन्सरने जखडलं; अभिनेत्रीने सांगितला कठीण काळ
12
पाकिस्तानने चीनसारखीच रॉकेट फोर्स उभारली; स्वातंत्र्यदिनी घोषणाही करून टाकली, पण...
13
मध्यरात्री प्रियकरासोबत गुपचूप पळून चालली होती पत्नी, आवाज झाला अन् पती उठला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण... 
14
शिवसेना कुणाची? अखेर तारीख ठरली; सुप्रीम कोर्टात 'या' दिवशी होणार अंतिम सुनावणी
15
जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा मिळणार? सरन्यायाधीश म्हणाले- पहलगामकडे दुर्लक्ष करू शकत नाही
16
अर्जुन तेंडुलकरची होणारी पत्नी चालवते आलिशान पेट सलून, कुत्र्यांना आंघोळ घालण्यासाठी घेते एवढे पैसे 
17
रॉकेट बनले Muthoot Finance कंपनीचे शेअर्स, १० टक्क्यांपेक्षा अधिक तेजी; टार्गेट प्राईजही वाढवली
18
छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणला अजित पवारांनी दिली मोठी जबाबदारी
19
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
20
कर भरण्याचे टेन्शन सोडा! आता फक्त २४ रुपयांमध्ये भरा इन्कम टॅक्स, कोणी आणली खास ऑफर?

पोलीस २४ तास ऑन ड्युटी इलेक्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2019 06:04 IST

निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली की, निवडणूक यंत्रणेप्रमाणेच पोलिसांवरील ताण आणखी वाढतो.

- जितेंद्र कालेकरनिवडणुकीची आचारसंहिता लागू झाली की, निवडणूक यंत्रणेप्रमाणेच पोलिसांवरील ताण आणखी वाढतो. प्रचाराच्या काळात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू असतात. तसेच प्रचारासाठी होणारी बॅनरबाजी आणि हल्लीच्या काळात व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टिष्ट्वटर या समाजमाध्यमांद्वारे पसरवल्या जाणाऱ्या वादग्रस्त पोस्ट यावर पोलिसांना बारीक नजर ठेवावी लागते. त्याची शहानिशा करून बेकायदा पोस्ट किंवा विधाने करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई किंवा नोटीस बजावण्याची निष्पक्ष भूमिका बजवावी लागते.

याशिवाय, दोन वेगवेगळ्या पक्षांच्या रॅली, सभा एकाचवेळी एका ठिकाणी आमने-सामने येऊ नयेत म्हणूनही काळजी घ्यावी लागते. त्यासाठी संबंधित परिमंडळांचे पोलीस उपायुक्त, सहायक पोलीस आयुक्त तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभ्यास करतात. त्यानंतरही सभेच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्ताची नियुक्ती करणे, सभा शांततेत पार पडून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये म्हणून बंदोबस्ताची आखणी या यंत्रणेला करावी लागते.

सत्ताधारी किंवा विरोधकांचा स्टार प्रचारक, मोठा नेता किंवा अभिनेता अथवा मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, पंतप्रधान येणार असतील तर अशा नेत्यांच्या बंदोबस्ताची विशेष काळजी घ्यावी लागते. तेथे घातपातविरोधी पथकाकडून तपासणी, व्हीआयपींची सुरक्षाही पोलिसांना हाताळावी लागते. त्याही आधी राजकीय गुन्हेगार नियंत्रणात राहण्यासाठी त्यांना प्रतिबंधात्मक कारवाईची नोटीस बजावण्याची प्रक्रिया तसेच न्यायालयाने फरारी घोषित केलेले गुंड, तडीपार गुन्हेगार, अभिलेखावरील गुन्हेगार यांची वेळोवेळी पडताळणी करून त्यांचा मागोवा घेत त्यांना अटक करण्याची कारवाई करावी लागते.

अनेकदा असे अनेक गुन्हेगार एखाद्या राजकीय नेत्याच्या किंवा राजकीय पक्षाच्या आश्रयालाही आलेले असतात. अशावेळी कोणाचीही तमा न बाळगता त्यांच्यावर कारवाई करण्याची जबाबदारी पोलिसांवरच असते. शिवाय, निवडणूक काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून दारूअड्ड्यांवर कारवाई तसेच वैयक्तिक सुरक्षेसाठी परवानाधारक शस्त्र घेणाºयांची शस्त्रे सयुक्तिक कारण वगळता जमा करण्याचे कामही पोलिसांनाच करावे लागते.

ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यात अशी ३५० तर डायघर पोलीस ठाण्यात ८० परवानाधारक शस्त्रे आहेत. बँक, ज्वेलर्स आणि धोका असलेल्या व्यक्तींनाच शस्त्रे जमा न करण्यासाठी पोलीस आयुक्तांकडून मुभा दिली जाते. राजकीय लोकांनीही ही शस्त्रे जमा करायची असतात. यासाठी पोलिसांना पाठपुरावा करावा लागतो. जे जमा करणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई करणे क्रमप्राप्त असते.प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रप्रमुख हा केवळ मतदान कसे होते, तिथे उद्भवणाºया त्रुटींकडे तो लक्ष देतो. याउलट पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्यावर मात्र तेथील सुरक्षेची जबाबदारी असते.

मतदानकेंद्राच्या ठिकाणी मतदारांव्यतिरिक्त मतदान प्रतिनिधींव्यतिरिक्त राजकीय पक्षांपैकी कोणीही १०० मीटरच्या आत येऊ नये म्हणून विशेष लक्ष ठेवावे लागते. यावरून पोलीस आणि राजकीय कार्यकर्त्यांमध्ये किंवा दोन वेगवेगळ्या राजकीय पक्षांमध्येही वाद उद्भवतात. हे वाद उफाळू नये म्हणून बंदोबस्तावरील पोलिसांना सतत लक्ष ठेवावे लागते. याशिवाय मतदानयंत्र अर्थात ईव्हीएमची सुरक्षा हाही या बंदोबस्तामधील महत्त्वाचा भाग असतो. मतदानाच्या वेळी या ईव्हीएम मशीन सुरक्षितरीत्या मतदानकेंद्रांवर आणणे, तिथून त्या परत स्ट्राँगरूममध्ये नेण्याचे जोखमीचे कर्तव्य बजावावे लागते. प्रत्यक्ष मतदानाच्या काही दिवसआधी या मशीन जिल्हाधिकारी कार्यालयात येतात. तिथेही पोलिसांचा खडा पहारा असतो.

मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर म्हणजे २१ आॅक्टोबरला मतदानाची प्रक्रिया झाल्यानंतर २४ आॅक्टोबरला मतमोजणी होणार आहे. तेव्हा मतदान ते मतमोजणी या काळातही या ईव्हीएमची पोलिसांना विशेष काळजी घ्यावी लागते. निकालाच्या दिवशी जल्लोषाच्या वातावरणात घोषणाबाजीमुळे पुन्हा जुने वाद उफाळून येण्याची शक्यता असते. या परिस्थितीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलिसांना सतत सजग राहावे लागते. त्यामुळेच निवडणुकीपूर्वी लोकांनी निर्भयपणे मतदान करण्यासाठी पोलिसांचे पथसंचलनही केले जाते. संपूर्ण प्रक्रिया पार पडेपर्यंत पोलीस कॉन्स्टेबल ते पोलीस आयुक्त किंवा अधीक्षक या पातळीवर सर्वच पोलीस हे डोळ्यांत तेल घालून कार्यरत असतात. या संपूर्ण कामाचा त्यांच्यावर प्रचंड ताण असतो.

एवढा ताणतणाव सहन करूनही अनेकदा पोलिसांना सत्ताधारी, विरोधकांच्या टीकेचे धनी व्हावे लागते. अर्थात, काहीही झाले तरी ड्युटी फर्स्ट... पोलीस कर्तव्य आधी...असे म्हणत ही यंत्रणा कार्यरत असते. हा सर्व आमच्या कामाचा व कर्तव्याचा एक भाग समजून या ताणाकडे फारसे लक्ष देत नसल्याचे ठाण्यातील पोलीस सांगतात. पोलिसांच्या सुरक्षेमुळेच निर्भय वातावरणात निवडणुका होतात, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

लोकसभा असो की विधानसभा निवडणूक, आचारसंहिता लागू झाल्यापासून निवडणूक यंत्रणेबरोबर किंवा त्याहीपेक्षा जास्त तास कार्यरत असते ती पोलीस यंत्रणा. निवडणूक काळात दोन विरोधकांमधील आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी चालू असतात. अशावेळी तणाव वाढू न देता कायदा-सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी तसेच निकालानंतरही कोणताही वाद उफाळून येऊ नये म्हणून ही यंत्रणा डोळ्यांत तेल घालून सलग ३० ते ४८ तास कार्यरत असते. याबाबत घेतलेला हा आढावा... 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Policeपोलिस