शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

पंतप्रधान मोदी तुमचे वडील नव्हते, मग...; ठाकरेंच्या मुलाखतीवर भाजपानं सुनावलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2022 10:06 IST

सूडाचं राजकारण नको म्हणता मग देवेंद्र फडणवीसांना नोटीस, राणेंवर अजामीन पत्र गुन्हा दाखल केला. खासदार नवनीत राणा यांनी हनुमान चालीसा पठण करणार नाही असं म्हटलं तरी १४ दिवस जेलमध्ये टाकलं असा टोला भाजपाने उद्धव ठाकरेंना लगावला.

मुंबई - कौटुंबिक मुलाखत द्यायची आणि इतरांना गद्दार म्हणायचं. २०१९ च्या निकालानंतर तुमच्याबाबत जनता हेच बोलत होती. माझ्या वडिलांचे फोटो लावू नका असं म्हणता, पंतप्रधान मोदी तर तुमचे वडील नव्हते मग निवडणुकीत त्यांचे फोटो का लावले? असा परखड सवाल भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना विचारला आहे. सामनाला दिलेल्या मुलाखतीवर भाजपा नेत्यांनी तोंडसुख घेतले. 

भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, शिवसेना संपवायची आहे असाच आरोप ३५ वर्षापूर्वी हिंदुह्द्रयसम्राट बाळासाहेब ठाकरेंबाबत कोल्हापूरच्या सभेत शिवसेना नेत्यांनी शरद पवारांबाबत केला होता. शिवसेना मोडायचा, संपवायचा डाव शरद पवारांचा आहे. कोण कोणावर आरोप करतो याची सत्यता जनतेला पडताळायची असते. आजची मुलाखत रश्मी ठाकरेंचा सामना, त्याचे संपादक आणि पक्षप्रमुख अशी आहे. त्यामुळे ही कौटुंबिक मुलाखत आहे. यात कुठलेही अडचणीचे ठरतील असे प्रश्न विचारण्यात येणार नाही हे अपेक्षित होते. ही मुलाखत जनतेच्या मनात आपली प्रतिमा बनवण्याचा, सहानभुती मिळवण्याचा एक प्रयत्न आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच विरोधी पक्ष हा संवेदनशील आणि सुसंस्कृत असावा असं म्हणता. इतरांना गद्दार बोलता. मुलाखतीत म्हणता माझ्या वडिलांचे फोटो लावून मत मागितले. मग २०१९ मध्ये निवडणुकीत बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचेही फोटो होते. मोदी तुमचे वडील नव्हते. मग तुम्ही फोटो का लावता? सूडाचं राजकारण नको म्हणता मग देवेंद्र फडणवीसांना नोटीस, राणेंवर अजामीन पत्र गुन्हा दाखल केला. खासदार नवनीत राणा यांनी हनुमान चालीसा पठण करणार नाही असं म्हटलं तरी १४ दिवस जेलमध्ये टाकलं. सोशल मीडियावर पोस्ट केली म्हणून माजी सैनिकांचा डोळा फोडायचा. स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत अपमानास्पद भाष्य काँग्रेसनं करूनही तोंडाला फेविकॉल लावून गप्प बसायचं असा टोलाही भाजपाने उद्धव ठाकरेंना लगावला.

काय झाडी, काय डोंगर...; उद्धव ठाकरेंनी शहाजीबापू पाटलांना विचारला खोचक सवाल

दरम्यान, हुकुमशहाचं राजकारण गेली अडीच वर्ष महाराष्ट्र पाहत होता. जनता सार्वभौम्य आहे. जनतेच्या मनाविरोधात तुम्ही गेला. मग तेव्हा राजीनामे का दिले नाहीत? जनतेने काँग्रेस-राष्ट्रवादीचे ९८ निवडून दिले त्यांना तुम्ही सत्तेत बसवलं. चुकीच्या माणसांची बाजू घेऊन त्यांना प्रोत्साहित करत होता. आईनं मुलासाठी स्वयंपाक केला अशी बातमी कधी होऊ शकत नाही. मात्र हे एकमेव मुख्यमंत्री होते जे मंत्रालयात गेल्यानंतर बातमी होते. सहानुभूती घेण्याचा प्रयत्न हा राजकीय डाव आहे. कौटुंबिक मुलाखत द्यायची आणि इतरांना खंजीर खुपसला, गद्दार म्हणायचं हे मनसोक्त म्हणायचं असंही भाजपाने सुनावलं

मुंबईत पराभूत व्हावं लागेलमुंबई महापालिकेत उद्धव ठाकरेंना पराभूत व्हावेच लागेल. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेला. भाजपाशी साथ सोडली तेव्हा किती हजार कोटी खर्च झाले? जनतेच्या मनात खूप प्रश्न आहेत त्यामुळे त्याची उत्तरं मिळालीच नाही असा टोलाही भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरेंना विचारला.    

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारBJPभाजपाUddhav Thackerayउद्धव ठाकरे