शहरं
Join us  
Trending Stories
1
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
2
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
3
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
4
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
5
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
6
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
7
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
8
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
9
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
10
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
11
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
12
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
13
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
14
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
15
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
16
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
17
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
18
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
19
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
20
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट

"गेल्या 3-4 वर्षांत 8 कोटी नवे रोजगार निर्माण झाले...", बेरोजगारीच्या मुद्यावरून PM मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2024 23:27 IST

"आरबीआयने नोकऱ्यांसंदर्भात नुकताच एक अहवाल जारी केला आहे. त्या अहवालानुसार, गेल्या 3-4 वर्षांत देशात जवळपास 8 कोटी नवे रोजगार निर्माण झाले आहेत. या आकडेवारीने खोटी माहिती पसरवणाऱ्यांची तोंड बंद केली आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (13 जुलै 2024) मुंबई दौऱ्यादरम्यान नेस्को सेंटरमध्ये जवळपास 3 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे लोकार्पन आणि भूमिपूजन केले. यावेळी त्यांनी देशात नोकऱ्या निर्माण करण्यासाठी केंद्र सरकारने केलेल्या कामाची माहिती देत विरोधकांवर जोरदार निशाणा साधला.

देशात जवळपास 8 कोटी नवे रोजगार निर्माण झाले -पंतप्रधान मोदी म्हणाले, "आरबीआयने नोकऱ्यांसंदर्भात नुकताच एक अहवाल जारी केला आहे. त्या अहवालानुसार, गेल्या 3-4 वर्षांत देशात जवळपास 8 कोटी नवे रोजगार निर्माण झाले आहेत. या आकडेवारीने खोटी माहिती पसरवणाऱ्यांची तोंड बंद केली आहेत. हे लोक (विरोधक) गुंतवणुकीला, पायाभूत सुविधांना आणि देशाच्या विकासाला विरोध करतात. मात्र आता त्यांचा बुरखा फाटत आहे."

पंतप्रधान मोदी म्हणाले, "एनडीए सरकारचे विकास मॉडेल वंचितांना प्राधान्य देणारे आहे. आम्ही अनेक दशकांपासून शेवटच्या रांगेत असलेल्यांना प्राधान्य देत आहोत. नव्या सरकारचा शपथविधी होताच, आम्ही गरीबांसाठी पक्की घरे आणि शेतकऱ्यांशी संबंधित मोठे निर्णय घेतले आहेत."

"महाराष्ट्रातील महायुती सरकारही अशाच बांधिलकीने काम करत आहे. महाराष्ट्र सरकारने दरवर्षी 10 लाख तरुणांना कौशल्य प्रशिक्षण देण्याचा संकल्प केला आहे, याचा मला आनंद वाटला. कनेक्टिव्हिटीच्या पायाभूत सुविधांचा पर्यटन, कृषी आणि उद्योगांना मोठा फायदा होत आहे. रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. यामुळे महिलांनाही सुरक्षा, सुविधा आणि सन्मान मिळतो. अर्थात एनडीए सरकारची ही कामे गरीब, शेतकरी, स्त्री शक्ती आणि युवाशक्तीला सशक्त करण्यासाठी आहे," असेही मोदी म्हणाले.

अटल सेतूच्या मुद्यावरून विरोधकांवर निशाणा -अटल सेतूला भेगा गेल्याचे म्हणत काँग्रेसने भाजपला लक्ष्य केले होते. हाच धागा धर पंतप्रधान मोदींनी विरोधकांवर निशाणा साधला. “मुंबईतील लोकांचे जीवनमान सुधारणे हा आमचा उद्देश आहे. यामुळे मुंबई परिसरातील कनेक्टिविटी चांगली केली जात आहे. मुंबईतील कोस्टल रोड आणि अटल सेतूचे काम पूर्ण झाले आहे. आणि अटल सेतूसंदर्भात चुकीची माहिती पसरवण्यात आली होती, हेही आपल्याला माहीतच असेल," असे मोदी म्हणाले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMumbaiमुंबईEmployeeकर्मचारीBJPभाजपा