शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

"गेल्या 3-4 वर्षांत 8 कोटी नवे रोजगार निर्माण झाले...", बेरोजगारीच्या मुद्यावरून PM मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2024 23:27 IST

"आरबीआयने नोकऱ्यांसंदर्भात नुकताच एक अहवाल जारी केला आहे. त्या अहवालानुसार, गेल्या 3-4 वर्षांत देशात जवळपास 8 कोटी नवे रोजगार निर्माण झाले आहेत. या आकडेवारीने खोटी माहिती पसरवणाऱ्यांची तोंड बंद केली आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (13 जुलै 2024) मुंबई दौऱ्यादरम्यान नेस्को सेंटरमध्ये जवळपास 3 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे लोकार्पन आणि भूमिपूजन केले. यावेळी त्यांनी देशात नोकऱ्या निर्माण करण्यासाठी केंद्र सरकारने केलेल्या कामाची माहिती देत विरोधकांवर जोरदार निशाणा साधला.

देशात जवळपास 8 कोटी नवे रोजगार निर्माण झाले -पंतप्रधान मोदी म्हणाले, "आरबीआयने नोकऱ्यांसंदर्भात नुकताच एक अहवाल जारी केला आहे. त्या अहवालानुसार, गेल्या 3-4 वर्षांत देशात जवळपास 8 कोटी नवे रोजगार निर्माण झाले आहेत. या आकडेवारीने खोटी माहिती पसरवणाऱ्यांची तोंड बंद केली आहेत. हे लोक (विरोधक) गुंतवणुकीला, पायाभूत सुविधांना आणि देशाच्या विकासाला विरोध करतात. मात्र आता त्यांचा बुरखा फाटत आहे."

पंतप्रधान मोदी म्हणाले, "एनडीए सरकारचे विकास मॉडेल वंचितांना प्राधान्य देणारे आहे. आम्ही अनेक दशकांपासून शेवटच्या रांगेत असलेल्यांना प्राधान्य देत आहोत. नव्या सरकारचा शपथविधी होताच, आम्ही गरीबांसाठी पक्की घरे आणि शेतकऱ्यांशी संबंधित मोठे निर्णय घेतले आहेत."

"महाराष्ट्रातील महायुती सरकारही अशाच बांधिलकीने काम करत आहे. महाराष्ट्र सरकारने दरवर्षी 10 लाख तरुणांना कौशल्य प्रशिक्षण देण्याचा संकल्प केला आहे, याचा मला आनंद वाटला. कनेक्टिव्हिटीच्या पायाभूत सुविधांचा पर्यटन, कृषी आणि उद्योगांना मोठा फायदा होत आहे. रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. यामुळे महिलांनाही सुरक्षा, सुविधा आणि सन्मान मिळतो. अर्थात एनडीए सरकारची ही कामे गरीब, शेतकरी, स्त्री शक्ती आणि युवाशक्तीला सशक्त करण्यासाठी आहे," असेही मोदी म्हणाले.

अटल सेतूच्या मुद्यावरून विरोधकांवर निशाणा -अटल सेतूला भेगा गेल्याचे म्हणत काँग्रेसने भाजपला लक्ष्य केले होते. हाच धागा धर पंतप्रधान मोदींनी विरोधकांवर निशाणा साधला. “मुंबईतील लोकांचे जीवनमान सुधारणे हा आमचा उद्देश आहे. यामुळे मुंबई परिसरातील कनेक्टिविटी चांगली केली जात आहे. मुंबईतील कोस्टल रोड आणि अटल सेतूचे काम पूर्ण झाले आहे. आणि अटल सेतूसंदर्भात चुकीची माहिती पसरवण्यात आली होती, हेही आपल्याला माहीतच असेल," असे मोदी म्हणाले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMumbaiमुंबईEmployeeकर्मचारीBJPभाजपा