शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"
2
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार
3
Raja Raghuvanshi : सस्पेन्स वाढला! राजा आणि सोनमचं मेघालयमध्ये झालं भांडण? भावाला आल्या धमक्या
4
Fact Check: पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचं निधन? व्हायरल व्हिडीओमागील सत्य समोर!
5
३० लाखांच्या होम लोनवर वाचतील ४.६३ लाख; आपली कर्जाची रक्कम टाका आणि पाहा किती होईल बचत?
6
Astrology: राहू दशा सुरु झाली हे कसं ओळखावं? राहूमुळे कोणकोणती हानी होते? वाचा!
7
'सुनील तटकरेंनी राजीनामा द्यायला पाहिजे, त्यांनी दिला तर मी नक्की देईन', आमदार महेंद्र थोरवेंचा घणाघात
8
स्कूटरवरून आले, सामान हॉटेलमध्ये ठेवलं अन्...; राजा आणि सोनम बेपत्ता होण्यापूर्वीच्या CCTV व्हिडीओमध्ये काय?
9
“२ तास गोंधळ, मतमोजणी हायजॅक, मोदींचा वाराणसीत जवळपास पराभवच झाला होता”; कुणाचा दावा?
10
एकटं राहायला आवडतं? उषा नाडकर्णी म्हणाल्या, "आमच्या इमारतीत राज ठाकरेंची मावशी..."
11
म्युच्युअल फंड गुंतवणूकदाराचा अचानक मृत्यू झाला तर पैशांचं काय होतं? पाहा महत्त्वाची माहिती आणि प्रक्रिया
12
Astrology: पत्रिका मंगळाची असेल तर सगळेच अमंगल होते का? काय आहे त्यावर उपाय? वाचा!
13
Rahul Gandhi: महाराष्ट्र विधानसभेत 'मॅच फिक्सिंग', राहुल गांधींचा आरोप; भाजपचा पलटवार!
14
Jyoti Malhotra : ज्योती मल्होत्राबाबत मोठा खुलासा; पाकिस्तानमधील रिटायर्ड सब-इन्स्पेक्टरच्या होती संपर्कात
15
COVID19: कोरोना वाढतोय, काळजी घ्या! २४ तासांत ४ मृत्यू, सक्रीय रुग्णांची संख्या ५००० च्या वर!
16
“२०१४, २०१७ ला काय घडले यात रस नाही, आम्ही मागे वळून पाहत नाही”; प्रस्तावावर राऊतांचे विधान
17
'उद्धव ठाकरेंना गर्दीचं मतांमध्ये परिवर्तन करण्यात यश', शरद पवार राज ठाकरेंबद्दल काय म्हणाले?
18
Vedashree Toraskar : जलपरी! समुद्रातील आव्हान पेललं, अटल सेतू ते गेटवेपर्यंत पोहून ११ व्या वर्षी रचला इतिहास
19
‘हमासचा खात्मा करण्याची इच्छा, पण अयशस्वी ठरले’; मौलाना अरशद मदनी म्हणाले, गाझातील एक लाख शहिदांनी...
20
संजय राऊतांचे RSSचे सरसंघचालक मोहन भागवतांना पत्र; म्हणाले, “विरोधकांचा आवाज दडपायला...”

कृपा करुन माझ्यावरील निर्बंध हटवा - रविंद्र गायकवाड

By admin | Updated: April 7, 2017 11:07 IST

शिवसेनेचे खासदार रविंद्र गायकवाड यांनी गुरुवारी संसदेत झालेल्या गोंधळानंतर नागरी उड्डाण मंत्री अशोक गजपति राजू यांनी पत्र लिहित चप्पलमार घटनेबाबात खेद व्यक्त केला आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 7 - शिवसेनेचे खासदार रविंद्र गायकवाड यांनी गुरुवारी संसदेत झालेल्या गोंधळानंतर नागरी उड्डाण मंत्री अशोक गजपति राजू यांनी पत्र लिहिलं. या पत्रात त्यांनी एअर इंडियाच्या विमानात झालेल्या चप्पल मारहाणीच्या घटनेबाबात खेद व्यक्त केला आहे. सोबत एअरलाइन्सकडून त्यांच्यावर लावण्यात आलेली बंदीही हटवण्याची विनंती केली आहे. दरम्यान एअर इंडियाकडून अद्यापही गायकवाड यांच्यावर बंदी कायम असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 
 
गायकवाड यांनी अशोक गजपति राजू यांनी लिहिलेल्या पत्रात असे नमूद करण्यात आले आहे की, 23 मार्च रोजी एअर इंडियाच्या विमानात झालेल्या घटनेवर खेद व्यक्त करतो. घडलेला प्रकार हा जाणूनबुजून करण्यात आलेला नव्हता, की ज्यामुळे परिस्थितीत बिघाड होईल. शिवाय, झालेल्या घटनेला कोण जबाबादार हे संपूर्ण चौकशी झाल्यानंतर सत्य समोर येईल. मात्र, या घटनेच्या उदाहरणावरुन भविष्यात अशा घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, हेदेखील निश्चित केले पाहिजे. 
 
एअललाईन्सकडून लावण्यात आलेल्या बंदीमुळे आपली कर्तव्य आणि जबाबदारी पार पाडू शकत नसल्याचंही गायकवाड यांनी पत्रात नमूद केले आहे. या  पार्श्वभूमीवर विमान प्रवेशबंदी हटवण्यासाठी त्यांनी अशोक गजपति राजू यांना विनंती केली आहे. 
तर दुसरीकडे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जोपर्यंत गायकवाड कर्मचा-यांची बिनशर्त माफी मागत नाहीत, तोपर्यंत त्यांच्यावरील विमान प्रवेश बंदी हटवण्यात येणार नसल्याचे सांगण्यात येत आहे.