शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; दिंडोरी अन् कल्याणमध्ये सभा, मुंबईत होणार रोड शो
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे ना घर आहे, ना गाडी; कर भरला ३ लाखांवर, ३ कोटींची एकूण संपत्ती
3
उद्धव ठाकरे माझाही कार्यक्रम करणार होते; 'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत CM शिंदेंचा हल्लाबोल
4
उद्धव ठाकरेंचा भाजपा आमदार फोडायचा, फडणवीसांना अटक करण्याचा होता डाव: CM शिंदे
5
धारावीतच घर, दुकान मिळणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
6
राहुल गांधींच्या प्रचारासाठी काँग्रेसचा नवा फंडा; भाषणांसोबत रील्स ठरल्या भारी
7
वसई-विरार पलीकडे मराठी माणूस का गेला? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सवाल
8
यंदाची निवडणूक देशाचे भवितव्य ठरवणारी; कांजूरमार्ग येथील सभेत शरद पवार यांचे मत
9
मजबूत अर्थव्यवस्थेसाठी स्थिर सरकार आवश्यक; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे मत
10
मध्यमवर्गीयांची पिळवणूक हेच काँग्रेसचे धोरण; पीयूष गोयल यांची टीका
11
पालिकेच्या मान्यताप्राप्त ऑडिटरचाच स्ट्रक्चरल स्टेबिलिटीचा रिपोर्ट! धक्कादायक माहिती समोर
12
रोड शो, रथयात्रांमुळे वाहतूककोंडी; वाहतुकीचे नियोजन करता करता मुंबईत पोलिसांच्या येते नाकीनऊ
13
धीरज वाधवानला सीबीआयकडून अटक; १७ बँकांकडून घेतलेल्या कर्जापैकी ३४ हजार कोटींचा अपहार
14
दिल्ली कॅपिटल्स जिंकले, राजस्थान रॉयल्सचे प्ले ऑफचे तिकीट पक्के झाले! गणित बिघडले
15
Rakhi Sawant : राखी सावंतची प्रकृती बिघडली, रुग्णालयातील फोटो व्हायरल, नेमकं काय झालंय?
16
जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल
17
छत्रपतींचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांना मराठी माणूस धडा शिकवेल; काँग्रेसची घणाघाती टीका
18
इस्रायलच्या अडचणी वाढणार? आंतरराष्ट्रीय न्यायालयात होणार सुनावणी
19
पेटीएमवर UPI Lite Wallet कसे अ‍ॅक्टिव्हेट करायचे? जाणून घ्या प्रोसेस...
20
"गेल्या १० वर्षात देशाची प्रगती, आता भारताला कुणीच..."; रश्मिका मंदानानं केलं मुंबईच्या 'अटल सेतू'चं कौतुक!

मुख्यमंत्र्यांची कामगिरी चांगली की वाईट?; जाणून घ्या जनतेची 'मन की बात'

By कुणाल गवाणकर | Published: January 15, 2021 9:12 PM

देशातील टॉप ५ मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा समावेश

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्याची सूत्रं हाती घेऊन जवळपास सव्वा वर्षांचा कालावधी होत आला आहे आहे. या कालावधीत सरकारला कोरोना संकटाचा सामना करावा लागला. याशिवाय अभिनेत्री कंगना राणौत, पत्रकार अर्णब गोस्वामी, सक्तवसुली संचलनालयाची कारवाई, सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरण यावरून विरोधकांनी ठाकरे सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र यानंतरही सरकारची कामगिरी चांगली झाल्याचं एबीपी न्यूज आणि सी व्होटरनं केलेल्या सर्वेक्षणातून समोर आलं आहे.२०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात अभूतपूर्व घडामोडी घडल्या. मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरून शिवसेनेनं भारतीय जनता पक्षाची साथ सोडत थेट काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन केली. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं. त्यामुळे राज्यातील सर्वात मोठा पक्ष असूनही भाजपला विरोधी पक्षात बसावं लागलं. यानंतर कोरोना पाठोपाठ अवकाळी पाऊस, त्यामुळे निर्माण झालेली पूरपरिस्थिती अशा संकटांचा सामना राज्याला करावा लागला. या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या सर्वेक्षणात मुख्यमंत्री ठाकरेंची कामगिरी चांगली झाल्याचं आकडेवारी सांगते.“घरी बसलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना नारळ देऊन शरद पवारांनी सत्तेची सूत्रे हाती घ्यावी”मुख्यमंत्री ठाकरेंच्या कामगिरीबद्दल जनतेनं समाधान व्यक्त केलं आहे. राज्यातील ४६ टक्के लोक मुख्यमंत्र्यांच्या कामावर खूप समाधानी आहेत. तर ३२ टक्के लोक समाधानी आहेत. २० टक्के जनता ठाकरेंच्या कारभारावर असमाधानी आहे. देशात सर्वाधिक चांगली कामगिरी करणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या यादीत उद्धव ठाकरे पाचव्या स्थानी आहेत. या यादीत ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक पहिल्या क्रमांकावर आहेत. त्यांच्या कारभारावर ७९ टक्के लोकांनी समाधान व्यक्त केलं आहे. या यादीत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल दुसऱ्या (७८ टक्के), आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी तिसऱ्या (६७ टक्के) स्थानी आहेत. तर उद्धव ठाकरेंच्या कामकाजावर ५८ टक्के लोक संतुष्ट आहेत. विशेष म्हणजे पहिल्या ५ मुख्यमंत्र्यांमध्ये भाजपचा एकही मुख्यमंत्री नाही.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेArvind Kejriwalअरविंद केजरीवालcorona virusकोरोना वायरस बातम्याEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयKangana Ranautकंगना राणौतarnab goswamiअर्णब गोस्वामी