शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
3
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
4
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
5
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
6
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
7
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
8
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
9
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
10
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
11
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
12
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
13
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
14
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
15
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
16
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
17
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
18
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
19
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
20
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?

महाराष्ट्र कुठे नेवून ठेवलाय हे राज्यातील जनतेला माहिती आहे, रावसाहेब दानवेंचा पवारांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2017 20:30 IST

कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? असा प्रश्न माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात करून सरकारवर टीका केली होती. त्यास भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी उत्तर दिले.

पिंपरी : कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? असा प्रश्न माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात करून सरकारवर टीका केली होती. त्यास भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी उत्तर दिले. ‘राज्य सरकारच्या पारदर्शी कारभारावर जनतेला भरोसा आहे.  शरद पवार हे देशातील मोठं नेतृत्व आहे. त्यांच्यावर टीका टिप्पणी करणार नाही. आम्ही काय केलंय आणि महाराष्ट्र कुठे नेवून ठेवलाय हे राज्यातील जनतेला माहिती आहे, असे दानवे यांनी पिंपरीत पत्रकारांशी बोलताना सांगितले.

 पिंपरी-चिंचवडमधील भारतीय जनता पक्ष जिल्हा कार्यकारणी बैठक झाली.बैठकीला प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अमर साबळे, आमदार लक्ष्मण जगताप, महापौर नितीन काळजे आदी उपस्थित होते.

 बैठकीनंतर पत्रकारांशी ते बोलत होते.  पुण्यातील एका कार्यक्रमात पवार यांनी भाजपावर टीका केली होती. ‘देशातील अर्थव्यवस्था कोलमडली असून, तीन वर्षांपूर्वी हेच लोक कुठे नेवून ठेवलाय महाराष्ट्र माझा? असा प्रश्न विचारत होते. आता त्यांनीच तीन वर्षांत कुठे नेवून ठेवलाय महाराष्ट्र हे शोधण्याची गरज आहे, अशा टीका केली होती. त्यावर दानवे म्हणाले, ‘‘ प्रत्येक पक्षाचे मूल्यमापन करायचे झाले तर निवडणूक हे माध्यम आहे. राज्यात झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि इतर निवडणुकांच्या निकालातून जनतेने आमचे मूल्यमापन केले आहे. ’’

शिवसेनेची फारकत, नारायण राणेंचा प्रवेश यावर दानवे म्हणाले, ‘‘ राज्यात राजकीय घडामोडी झाल्या तरी पक्षावर याचा परिणाम होणार नाही. आमचा पक्ष पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल. सरकारला कुठल्याही प्रकारचा धोका नाही.राजकीय घडामोडीकडे अजिबात लक्ष देत नाहि. शिवसेनेचे मंत्री बैठकिला  येतात. त्यांचा पक्ष वाढविण्यासाठी त्याचे प्रयत्न सुरू आहेत.  शिवसेनेचा आम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास नाही. नारायण राणेंच्या दिल्ली भेटी दरम्यान राजकीय चचार्ही झाल्या,त्या चचेर्ला मूर्त स्वरूप मिळाल की लवकरच भूमिका स्पष्ट करू. ४३ हजार कोटींची कर्ज माफी दिली. ९९ लाख शेतकºयांना त्याचा लाभ होईल. कर्ज माफीच्या निकषात काही बदल करायचे झाल्यास करू. आॅक्टोबरमध्ये पैसे जमा होतील. राज ठाकरेच्या टिकांना उत्तर देणार नाही, पण सर्वाना व्यक्त होण्याचा अधिकार आहे. सोशल मीडियावर कुणी व्यक्त होत असेल तर आम्हीही व्यक्त होतो.’’

टॅग्स :Raosaheb Danweiरावसाहेब दानवेBJPभाजपाSharad Pawarशरद पवारMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार