शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

महाराष्ट्र कुठे नेवून ठेवलाय हे राज्यातील जनतेला माहिती आहे, रावसाहेब दानवेंचा पवारांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2017 20:30 IST

कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? असा प्रश्न माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात करून सरकारवर टीका केली होती. त्यास भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी उत्तर दिले.

पिंपरी : कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? असा प्रश्न माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात करून सरकारवर टीका केली होती. त्यास भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी उत्तर दिले. ‘राज्य सरकारच्या पारदर्शी कारभारावर जनतेला भरोसा आहे.  शरद पवार हे देशातील मोठं नेतृत्व आहे. त्यांच्यावर टीका टिप्पणी करणार नाही. आम्ही काय केलंय आणि महाराष्ट्र कुठे नेवून ठेवलाय हे राज्यातील जनतेला माहिती आहे, असे दानवे यांनी पिंपरीत पत्रकारांशी बोलताना सांगितले.

 पिंपरी-चिंचवडमधील भारतीय जनता पक्ष जिल्हा कार्यकारणी बैठक झाली.बैठकीला प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अमर साबळे, आमदार लक्ष्मण जगताप, महापौर नितीन काळजे आदी उपस्थित होते.

 बैठकीनंतर पत्रकारांशी ते बोलत होते.  पुण्यातील एका कार्यक्रमात पवार यांनी भाजपावर टीका केली होती. ‘देशातील अर्थव्यवस्था कोलमडली असून, तीन वर्षांपूर्वी हेच लोक कुठे नेवून ठेवलाय महाराष्ट्र माझा? असा प्रश्न विचारत होते. आता त्यांनीच तीन वर्षांत कुठे नेवून ठेवलाय महाराष्ट्र हे शोधण्याची गरज आहे, अशा टीका केली होती. त्यावर दानवे म्हणाले, ‘‘ प्रत्येक पक्षाचे मूल्यमापन करायचे झाले तर निवडणूक हे माध्यम आहे. राज्यात झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि इतर निवडणुकांच्या निकालातून जनतेने आमचे मूल्यमापन केले आहे. ’’

शिवसेनेची फारकत, नारायण राणेंचा प्रवेश यावर दानवे म्हणाले, ‘‘ राज्यात राजकीय घडामोडी झाल्या तरी पक्षावर याचा परिणाम होणार नाही. आमचा पक्ष पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल. सरकारला कुठल्याही प्रकारचा धोका नाही.राजकीय घडामोडीकडे अजिबात लक्ष देत नाहि. शिवसेनेचे मंत्री बैठकिला  येतात. त्यांचा पक्ष वाढविण्यासाठी त्याचे प्रयत्न सुरू आहेत.  शिवसेनेचा आम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास नाही. नारायण राणेंच्या दिल्ली भेटी दरम्यान राजकीय चचार्ही झाल्या,त्या चचेर्ला मूर्त स्वरूप मिळाल की लवकरच भूमिका स्पष्ट करू. ४३ हजार कोटींची कर्ज माफी दिली. ९९ लाख शेतकºयांना त्याचा लाभ होईल. कर्ज माफीच्या निकषात काही बदल करायचे झाल्यास करू. आॅक्टोबरमध्ये पैसे जमा होतील. राज ठाकरेच्या टिकांना उत्तर देणार नाही, पण सर्वाना व्यक्त होण्याचा अधिकार आहे. सोशल मीडियावर कुणी व्यक्त होत असेल तर आम्हीही व्यक्त होतो.’’

टॅग्स :Raosaheb Danweiरावसाहेब दानवेBJPभाजपाSharad Pawarशरद पवारMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार