शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
2
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
3
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
4
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
5
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
6
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
7
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
8
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
9
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
10
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
11
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
12
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
13
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
14
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
15
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
16
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
17
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
18
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
19
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
20
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी

शरद पवारांचा महाराष्ट्र दौरा 'महाजनादेश'ला थेट आव्हान ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2019 11:10 IST

राष्ट्रवादी सोडणारे बहुतांशी नेते भाजपमध्येच गेले आहेत. परंतु, पवारांनी अचाकन घेतलेला स्टॅन्ड आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीची मरगळ झटकून टाकणारा ठरण्याची शक्यता आहे.

मुंबई - पाच वर्षे सत्तेपासून दूर असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रमुख नेते सोडून गेल्याने गलीगात्र झाला. त्यात जे नेते पक्षात आहेत, त्यांना चौकशीची भीती वाटत असून असे नेते सरकारविरुद्ध बोलणे टाळत आहे. अशा स्थितीत राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनीच मैदानात उतरणे पसंत केले असून वयाच्या ७९व्या वर्षी त्यांची सोलापूरमध्ये दिसलेली जिद्द सत्ताधारी पक्षाच्या महाजनादेशच्या मत्त्वकांक्षेला आव्हान देणारी आहे.

२०१४ पासून राष्ट्रवादीतून आतापर्यंत ३० हून अधिक नेत्यांना पलायन केले आहे. यामध्ये बहुतांशी नेते विद्यमान आमदार होते. या नेत्यांना आपल्यात सामावून घेतल्याने राष्ट्रवादी खिळखीळी करण्याची योजना सत्ताधारी भाजपची होती. अर्थात यामध्ये त्यांना यशही आले. राष्ट्रवादी सोडणारे बहुतांशी नेते भाजपमध्येच गेले आहेत. परंतु, पवारांनी अचाकन घेतलेला स्टॅन्ड आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीची मरगळ झटकून टाकणारा ठरण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादीने नुकतीच खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात शिवस्वराज्य यात्रा काढली होती. या यात्रेत कोल्हेंच्या साथीला विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार होते. परंतु, अजित पवार यांच्या अटकेचे वॉरंट निघाल्याने ते शिवस्वराज्य यात्रासोबत पूर्णवेळ राहु शकले नाही. या यात्रेत शरद पवार नव्हते. परंतु, आता पवारांनी स्वतंत्र मैदानात उतरण्याचा निश्चय केला असून सोलापुरातून त्याची सुरुवात केली आहे.

मी महाराष्ट्र दौऱ्यावर आहे. आता घरी जाणार नाही. मी घरच्यांना सांगितलंय की तुमचं तुम्ही बघा; मला आता काही लोकांकडे बघायचं आहे, अशा शब्दांत शरद पवार यांनी गयारामांना गर्भित इशारा दिला. त्यांचा हा इशारा केवळ गयारामांना नसून सत्ताधारी भाजप-शिवसेनेला देखील आहे. यावेळी त्यांनी भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांच्यावर देखील कडाडून टीका केली. ज्यांनी कष्ट घेतले त्यांनी या जिल्ह्याचा इतिहास बदलला. आज या इतिहासाचे मानकरी होण्याऐवजी दुसऱ्यांच्या दारात सुभेदारी स्वीकारण्याची भूमिका काही लोकांनी स्वीकारली आहे, असा टोला पवारांनी मोहिते-पाटील यांचा नामोल्लेख न करता लगावला.