शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
3
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
4
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
5
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
6
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
7
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
8
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
9
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
10
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
11
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
12
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
13
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
14
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
15
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
16
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
17
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
18
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
19
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवारांचा महाराष्ट्र दौरा 'महाजनादेश'ला थेट आव्हान ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2019 11:10 IST

राष्ट्रवादी सोडणारे बहुतांशी नेते भाजपमध्येच गेले आहेत. परंतु, पवारांनी अचाकन घेतलेला स्टॅन्ड आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीची मरगळ झटकून टाकणारा ठरण्याची शक्यता आहे.

मुंबई - पाच वर्षे सत्तेपासून दूर असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रमुख नेते सोडून गेल्याने गलीगात्र झाला. त्यात जे नेते पक्षात आहेत, त्यांना चौकशीची भीती वाटत असून असे नेते सरकारविरुद्ध बोलणे टाळत आहे. अशा स्थितीत राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनीच मैदानात उतरणे पसंत केले असून वयाच्या ७९व्या वर्षी त्यांची सोलापूरमध्ये दिसलेली जिद्द सत्ताधारी पक्षाच्या महाजनादेशच्या मत्त्वकांक्षेला आव्हान देणारी आहे.

२०१४ पासून राष्ट्रवादीतून आतापर्यंत ३० हून अधिक नेत्यांना पलायन केले आहे. यामध्ये बहुतांशी नेते विद्यमान आमदार होते. या नेत्यांना आपल्यात सामावून घेतल्याने राष्ट्रवादी खिळखीळी करण्याची योजना सत्ताधारी भाजपची होती. अर्थात यामध्ये त्यांना यशही आले. राष्ट्रवादी सोडणारे बहुतांशी नेते भाजपमध्येच गेले आहेत. परंतु, पवारांनी अचाकन घेतलेला स्टॅन्ड आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीची मरगळ झटकून टाकणारा ठरण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादीने नुकतीच खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात शिवस्वराज्य यात्रा काढली होती. या यात्रेत कोल्हेंच्या साथीला विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार होते. परंतु, अजित पवार यांच्या अटकेचे वॉरंट निघाल्याने ते शिवस्वराज्य यात्रासोबत पूर्णवेळ राहु शकले नाही. या यात्रेत शरद पवार नव्हते. परंतु, आता पवारांनी स्वतंत्र मैदानात उतरण्याचा निश्चय केला असून सोलापुरातून त्याची सुरुवात केली आहे.

मी महाराष्ट्र दौऱ्यावर आहे. आता घरी जाणार नाही. मी घरच्यांना सांगितलंय की तुमचं तुम्ही बघा; मला आता काही लोकांकडे बघायचं आहे, अशा शब्दांत शरद पवार यांनी गयारामांना गर्भित इशारा दिला. त्यांचा हा इशारा केवळ गयारामांना नसून सत्ताधारी भाजप-शिवसेनेला देखील आहे. यावेळी त्यांनी भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांच्यावर देखील कडाडून टीका केली. ज्यांनी कष्ट घेतले त्यांनी या जिल्ह्याचा इतिहास बदलला. आज या इतिहासाचे मानकरी होण्याऐवजी दुसऱ्यांच्या दारात सुभेदारी स्वीकारण्याची भूमिका काही लोकांनी स्वीकारली आहे, असा टोला पवारांनी मोहिते-पाटील यांचा नामोल्लेख न करता लगावला.