शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

पवार हाफीज सईदप्रमाणे बरळू लागले आहेत - उद्धव ठाकरे

By admin | Updated: June 11, 2014 15:30 IST

महाराष्ट्रातील दारूण पराभवानंतर शरद पवारांचा ताळतंत्र सुटला असून ते पाकिस्तानच्या हाफीज सईदप्रमाणे काहीही बरळू लागले आहेत, अशी टीका शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंनी सामनातून पवारांवर केली आहे.

ऑनलाइन टीम
मुंबई, दि. ११ -  महाराष्ट्रातील दारूण पराभवानंतर शरद पवारांचा ताळतंत्र सुटला असून ते पाकिस्तानच्या हाफीज सईदप्रमाणे काहीही बरळू लागले आहेत, अशी टीका शिवसेना कार्याध्यक्ष  उद्धव ठाकरेंनी 'सामना'तून पवारांवर केली आहे. फेसबुकवरील महापुरुष विटंबना प्रकरणाने हिंसक वळण घेतल्यानंतर त्यातून पुण्यातील एका तरुणाची हत्या झाली होती. त्याबद्दल बोलताना 'दिल्लीत मोदींचे सरकार आल्यामुळे महाराष्ट्रातील अशा शक्तींनी डोके वर काढले आहे व त्यांची हिंमत वाढली' असे वक्तव्य राष्ट्रवादीच काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले होते. त्याच पार्श्वभूमीवर शिवसनेचे मुखपत्र असणा-या सामनातून शरद पवारांवर तोफ डागण्यात आली आहे. 
महाराष्ट्रात जी हत्या झाली त्याचा मोदींशी काही संबंध नाही. राज्यात पवारांचे राज्य, त्यांच्या पक्षाचा गृहमंत्री असताना अशी हत्या होणे हे त्यांच्या सरकाराचे अपयश असल्याची टीका लेखात करण्यात आली आहे. पुण्यात नरेंद्र दाभोलकरांच्या झालेल्या हत्येला वर्ष होत आले तरीही पवारांच्या सरकारला दाभोलकरांचे मारेकरी अद्याप शोधता आलेले नाहीत, असेही लेखात म्हटले आहे. तसेच पवारांचे ‘उजवे हात’ जितेंद्र आव्हाड हे मुंब्रा परिसरात पोलिसांना गुंडापुंडांवर कारवाई करू देत नाहीत. कारण हे गुंड एका विशिष्ट धर्माचे असतात. पोलिसांना अर्वाच्य शिव्या देऊन त्यांना हाकलून दिले जाते. राज्यात मोदींचे सरकार नाही तरीही अशा आव्हाडी प्रवृत्तीच्या लोकांची हिंमत वाढते, यावर पवारांचे काय म्हणणे आहे? असा सवालही लेखात विचारण्यात आला आहे. 
पुण्यात झालेल्या खुनाची जबाबादारी ही राज्य सरकारवर असून मोदींवर त्यांचे खापर फोडून पवार स्वत:चे हसे करून घेत आहेत. पवारांनी अतिरेकी हाफीज सईदप्रमाणे वाट्टेल तशी गरळ ओकू नये व स्वत:ची उरलीसुरली प्रतिष्ठा धुळीस मिळवू नये, असेही लेखात म्हटले आहे.