शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

पक्षाने विचार करूनच दिली पार्थला उमेदवारी; अजित पवारांचं स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2019 01:50 IST

मावळमधील कार्यकत्यांनीही धरला होता आग्रह

बारामती : पक्षाकडे विविध कार्यकर्ते उमेदवारी मागतात. उमेदवारीसाठी आग्रहदेखील धरतात. वेगवेगळ्या मतदारसंघांतून कार्यकर्त्यांची वेगवेगळी मागणी होत असते. त्याचप्रमाणे मावळमध्येदेखील कार्यकर्त्यांनी विशेषत: शेतकरी कामगार पक्षाच्या जयंत पाटलांनी ‘पार्थ’ला उमेदवारी दिल्यास मताधिक्य देण्याचे राष्ट्रवादीच्या वरिष्ठांना सांगितले होते. त्यामुळे पक्षाने विचार करूनच पार्थला उमेदवारी दिल्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.बारामती येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यानंतर पवार यांनी पार्थ पवार यांना दिलेल्या उमेदवारीबाबत भूमिका मांडली. यावेळी पवार म्हणाले, राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेस व मित्र पक्षांचे लोकसभा निवडणुकीचे जागा वाटप झाल्यानंतर मावळ मतदार संघातून उरण, पनवेल, कर्जत-खालापूर या भागातील विशेषत: शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंतराव पाटील व त्यांच्या असंख्य सहकारीमित्रांनी राष्ट्रवादीच्या वरिष्ठांची भेट घेतली. पार्थला उमेदवारी दिल्यास परिसरातून चांगल्या प्रकारचे मताधिक्य देवू असे सांगितले. मावळ लोकसभा मतदार संघ झाल्यापासून सुरूवातीला शिवसेनेचे गजानन बाबर खासदार झाले. त्यानंतर श्रीरंग बारणे खासदार झाले.मागील निवडणुकीत राष्ट्रवादीच्या मतांची विभागणी झाली. कारण आमचेच सहकारी लक्ष्मणराव जगताप शेकाप तून उभे राहिले. तर राष्ट्रवादीकडून राहुल नार्वेकर उभे राहिले. अतिशय कमी वेळ मिळाला. हा मतदार संघ सर्वाधिक सुशिक्षितांचा मतदार संघ म्हणून ओळखला जातो. राज्य सरकारच्या तिजोरीत सर्वाधिक कर देणारे पुणे व रायगड जिल्हा आहे,आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या मतदारांची संख्या पिंपरी-चिंचवड, हिंजवडी, वाकड या भागात जास्त आहे.या मतदारांमध्ये उच्चशिक्षित,इंग्रजी चांगले समजणारा व बोलणारा उमेदवार हवा, अशी कार्यकर्त्यांची भावना होती. त्यामुळे पक्षाने विचार करून पार्थला उमेदवारी दिल्याचे पवार म्हणाले.सुजय विखेंसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची केव्हाही जागा सोडण्याची तयारी होती. याबाबत जयंत पाटील यांच्यासह आपण स्वत: सुजय यांच्याशी चर्चा देखील केली होती. हे चुकीचे असल्यास आपण म्हणेल ते ऐकन. मी जे बोलतो ते खरे बोलतो, हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. आम्ही कधीही जागा सोडण्यास तयार होतो. त्यांनी राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडणूक लढविणार असते, तरी त्यांना उमेदवारी दिली असती. मात्र राष्ट्रवादीचे लोक त्यांचे काम करणार नाहीत. त्याचा मला त्रास होईल, असे सुजय यांनी आपणास सांगितल्याचे पवार म्हणाले.वाऱ्याची दिशा ओळखून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी माघार घेतली, हा विरोधकांचा दावा राजकीय आहे. त्यांना राजकारण समजत नसावे. पवारसाहेब १४ वेळा निवडून आले आहेत. ते कोणत्याही मतदार संघातून निवडून येऊ शकतात. त्यांच्या नावावर आमच्यासारखे अनेकजण निवडून येतात. शिवाय ‘साहेबांचा’ राज्यसभेचा कार्यकाळ शिल्लक आहे,त्यांनी लोकसभा लढविली असती तर राज्यसेभेची जागा रिक्त झाली असती. त्यामुळे त्यांनी लोकसभेतून घेतलेल्या माघारी बाबत विरोधक राजकारणातून चुकीची वक्तव्य करत आहेत. घोड मैदान लांब नाही. राज्यातील ४८ जागांचे मे महिना अखेर चित्र स्पष्ट होईल, असे पवार म्हणाले. गेले दोन दिवस बाहेर असल्याने माढा मतदार संघातील उमेदवारीच्या निणर्याबाबत माहिती नाही. त्याबद्दल पवार साहेबांसह जयंत पाटील, धनंजय मुंडे आदी वरिष्ठ नेते माढा मतदार संघातील प्रमुखांशी चर्चा करीत आहेत.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस