शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

प्राध्यापक नीरज हातेकर यांनी जाहीर केली स्वेच्छा निवृत्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2017 12:47 IST

मुंबई, दि. 31- परीक्षांचे रखडलेले निकाल जाहीर करण्याची 31 जुलैची डेडलाइन गाठण्याचे मुंबई विद्यापीठाकडून प्रयत्न होत असताना, विद्यापीठातील वरिष्ठ अधिकारी विद्यापीठ सोडून जाण्याच्या तयारीत आहेत. मुंबई विद्यापीठातील अर्थशास्त्र आणि सार्वजनिक धोरण विभागाचे प्रमुख नीरज हातेकर यांनी स्वेच्छा निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. विद्यापीठातील समस्या म्हणजे, 'उपयोगात न येणारा निराशाजनक लढा,' असं ...

ठळक मुद्देपरीक्षांचे रखडलेले निकाल जाहीर करण्याची 31 जुलैची डेडलाइन गाठण्याचे मुंबई विद्यापीठाकडून प्रयत्न होत असताना, विद्यापीठातील वरिष्ठ अधिकारी विद्यापीठ सोडून जाण्याच्या तयारीत आहेत. मुंबई विद्यापीठातील अर्थशास्त्र आणि सार्वजनिक धोरण विभागाचे प्रमुख नीरज हातेकर यांनी स्वेच्छा निवृत्तीचा निर्णय घेतला आहेविद्यापीठातील समस्या म्हणजे, 'उपयोगात न येणारा निराशाजनक लढा,' असं म्हणत नीरज हातेकर यांनी स्वेच्छा निवृत्ती जाहीर केली आहे. 

मुंबई, दि. 31- परीक्षांचे रखडलेले निकाल जाहीर करण्याची 31 जुलैची डेडलाइन गाठण्याचे मुंबई विद्यापीठाकडून प्रयत्न होत असताना, विद्यापीठातील वरिष्ठ अधिकारी विद्यापीठ सोडून जाण्याच्या तयारीत आहेत. मुंबई विद्यापीठातील अर्थशास्त्र आणि सार्वजनिक धोरण विभागाचे प्रमुख नीरज हातेकर यांनी स्वेच्छा निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. विद्यापीठातील समस्या म्हणजे, 'उपयोगात न येणारा निराशाजनक लढा,' असं म्हणत नीरज हातेकर यांनी स्वेच्छा निवृत्ती जाहीर केली आहे. 

मुंबई विद्यापाठीतील अनेक मुद्द्यांवर विद्यापीठाच्या बाजूने बोलणारे तसंच वेळप्रसंगी विद्यापीठाच्याविरूद्ध बोलणारे, अशी नीरज हातेकर यांची ओळख आहे. सोमवारी सकाळी नीरज हातेकर यांनी फेसबुकवर पोस्ट लिहून त्यांच्या स्वेच्छा निवृत्तीचा निर्णय जाहीर केला आहे. 'निराशाजनक आणि बेपर्वा विद्यापीठाचा भाग असण्यापेक्षा विद्यापीठाच्या बाहेर राहून मी विद्यापीठाच्या हिताचं काम करू शकतो, याची मला जाणीव झाली आहे. दररोज अशा प्रणालीचा आदर करताना अस्वस्थ वाटत असल्याचं हातेकर यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हंटलं आहे. 'मुंबई विद्यापीठात सध्या जे काही चाललं आहे, ते अत्यंत त्रासदायक आहे आणि विद्यापीठाने एकत्र येऊन आता काम करावं, अशी वेळ आली आहे. शांत बसण्याची वेळ आता संपली आहे. असंही नीरज हातेकर यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हंटलं आहे. 

मुंबई विद्यापीठाचे 153 परीक्षांचे निकाल जाहीरमुंबई विद्यापीठाचे 153 परीक्षांचे निकाल जाहीर झाले आहेत. 90 टक्के  मूल्यांकन पूर्ण झाल्याचा दावा विद्यापीठाकडून करण्यात आला आहे. मुंबई विद्यापीठाला ४७७ अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर करण्यासाठी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी ३१ जुलैची डेडलाइन दिली होती. पण ३० जुलैच्या रात्रीपर्यंत विद्यापीठाने केवळ १५३ अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर केल्याने तब्बल ३२४ अभ्यासक्रमांचे निकाल शिल्लक आहेत. तसंच सव्वातीन लाख उत्तरपत्रिका अजूनही तपासलेल्या नाहीत. आतापर्यंत विद्यापीठाने कमी विद्यार्थी संख्या असलेल्या १४८ अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर केलं आहे. पण आता एका दिवसात सव्वातीन लाख उत्तरपत्रिका तपासून ३२४ अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर करणे हे अशक्यप्रायच असल्याने मुंबई विद्यापीठाला देण्यात आलेली डेडलाइन चुकल्याचंच स्पष्ट होत आहे. 

विद्यापीठाने प्राध्यापकांना रविवारीही उत्तरपत्रिका तपासणीच्या कामासाठी बोलावले होते. पण रविवार असल्यामुळे जवळपास ५ हजारांपैकी फक्त ९३९ प्राध्यापक उत्तरपत्रिका तपासणीला आले. प्राध्यापकांची संख्या रोडावल्याने उत्तरपत्रिका तपासणीचा वेग रविवारी मंदावला होता. फक्त २४ हजार ३४९ उत्तरपत्रिकांची तपासणी रविवारी पूर्ण झाली. त्यामुळे अजूनही सुमारे ३ लाख २५ हजार १९५ उत्तरपत्रिकांची तपासणी होणे बाकी आहे. १ लाख २५ हजार ३५७ उत्तरपत्रिकांचे मॉडरेशनही अजून झालेले नाही. तपासणी बाकी असलेल्या उत्तरपत्रिकांमध्ये २ लाख ६३ हजार ८१५ उत्तरपत्रिका या वाणिज्य शाखेच्या असल्याची माहिती मिळाली आहे. मुंबई विद्यापीठाने अधिक विद्यार्थीसंख्या असलेल्या वाणिज्य आणि कला शाखेचा निकाल अद्याप जाहीर केलेला नाही. तसेच विधिचा निकालही लागलेला नाही. गेल्या दोन दिवसांपासून विज्ञान शाखेचा निकाल जाहीर करणार असल्याचे विद्यापीठ सांगत असूनही रविवारी रात्री उशिरापर्यंत निकाल जाहीर करण्यात विद्यापीठाला यश आलेले नाही. निकालाच्या डेडलाइनला शेवटचे दोन दिवस उरले असताना, शनिवार आणि रविवारी मिळून फक्त छोट्या अभ्यासक्रमांचे निकाल मुंबई विद्यापीठाने जाहीर केले आहेत.