शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'उत्सव'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
2
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
3
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
4
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
5
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
6
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
7
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
8
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
9
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
10
५० हजारांना मुलीची खरेदी; जबरीने लग्न
11
ईएमआय की एसआयपी? तुम्हाला कोण करेल श्रीमंत?
12
कफ सिरपने जीव घेणारी यंत्रणाच ‘विषारी’
13
बांबू मेंटॅलिटी असेल तर यश तुमचेच आहे...
14
परीक्षेचा अटॅक: ताण, चिंता इतकी वाढते की ज्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 12:32 IST

Pappu Yadav On Raj Thackeray: मराठी भाषेवरून राजकीय तणाव वाढलेला असताना बिहारच्या नेत्याने राज ठाकरेंना इशारा दिला आहे.

मराठी भाषेवरून राजकीय तणाव वाढलेला असताना बिहारच्या जन अधिकार पक्षाचे प्रमुख पप्पू यादव यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरेंवर जोरदार टीका केली. राज ठाकरेंनी परप्रातींयाबाबत घेतलेली भूमिका अनादरपूर्ण असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच मुंबईत येऊन राज ठाकरेंना चांगलाच धडा शिकवू, असाही इशारा त्यांनी दिला. 

मराठी बोलण्याच्या मद्द्यावरून मनसे कार्यकर्त्यांनी मीरा-भाईंदरमध्ये एका व्यापाऱ्याला मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी नराजी व्यक्त केली. याच मुद्द्यावरून पप्पू यादव यांनी राज ठाकरेंवर हल्लाबोल केला. माध्यमांशी बोलताना पप्पू यादव म्हणाले की, बिहार आणि उत्तर प्रदेशातील लोकांनी मुंबई आणि महाराष्ट्राच्या विकासात मोठे योगदान दिले आहे. राज ठाकरे त्यांच्या पोकळ धमक्या आणि अहंकाराने त्यांचा अपमान करू शकत नाहीत. मुंबईत येऊन त्यांना चांगलाच धडा शिकवू, असा इशारा त्यांनी दिला.

पुढे पप्पू यादव म्हणाले की, अशी विधाने भारताच्या एकतेला आणि अखंडतेला हानी पोहोचवतात. मुंबई संपूर्ण देशाची आहे. ती कोणाचीही वैयक्तिक मालमत्ता नाही. भारताच्या कानाकोपऱ्यातील लोक तिथे काम करतात आणि राहतात. राज ठाकरे यांचे द्वेषाचे राजकारण आता सहन केले जाणार नाही."

मीरा भाईंदरमध्ये मराठीत न बोलणाऱ्या एका व्यापाऱ्याला मनसैनिकांनी चोप दिला होता. त्यानंतर परिसरातील अमराठी व्यापाऱ्यांनी मनसेच्या विरोधात मोर्चा काढला आणि व्यापाऱ्याला मारहाण करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कडक कारवाई करण्याची मागणी केली. त्यानंतर पोलिसांनी मनसेच्या सात कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. 

टॅग्स :MumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्रRaj Thackerayराज ठाकरेBiharबिहार